मन चंगा तो कठौती में गंगा! संत रोहिदास पुण्यतिथी: समता आणि भक्तीचा वारसा देणारे सत्पुरुष!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2026 07:05 IST2026-04-16T07:01:01+5:302026-04-16T07:05:01+5:30

चित्तोडची  राणी मीराबाई ज्यांच्या विचारांनी प्रभावित झाली आणि जे आज समस्त कष्टकरी वर्गाचे आदर्श आहेत, असे संत रोहिदास यांची आज पुण्यतिथी. 

The Ganga in the depths of the heart heals the mind! Sant Rohidas's death anniversary: A saint who left a legacy of equality and devotion! | मन चंगा तो कठौती में गंगा! संत रोहिदास पुण्यतिथी: समता आणि भक्तीचा वारसा देणारे सत्पुरुष!

मन चंगा तो कठौती में गंगा! संत रोहिदास पुण्यतिथी: समता आणि भक्तीचा वारसा देणारे सत्पुरुष!

भारतीय मध्ययुगीन संत परंपरेतील एक तेजस्वी तारा म्हणजे संत रोहिदास. ज्या काळात समाजात जातीभेद आणि अस्पृश्यतेचे सावट होते, त्या काळात त्यांनी भक्तीच्या माध्यमातून मानवी मूल्यांची रुजवण केली. "प्रत्येक माणसात परमेश्वर आहे," हा विचार त्यांनी आपल्या कृतीतून सिद्ध करून दाखवला. १६ एप्रिल २०२६ रोजी थोर संत, समाजसुधारक आणि समतेचा संदेश देणारे संत रोहिदास (संत रविदास) यांची पुण्यतिथी आहे, त्यांच्या कार्याचा आढावा घेणारा लेख. 

१. "मन चंगा तो कठौती में गंगा" – आंतरिक शुद्धतेचा मंत्र

संत रोहिदास यांचे सर्वात प्रसिद्ध वचन म्हणजे "मन चंगा तो कठौती में गंगा". याचा अर्थ असा की, जर तुमचे मन शुद्ध असेल आणि तुमचे विचार पवित्र असतील, तर प्रत्यक्ष गंगा तुमच्याजवळ (तुमच्या पात्रात) आहे. भक्तीसाठी तीर्थयात्रेला जाण्यापेक्षा स्वतःच्या अंतर्मनाला शुद्ध करणे महत्त्वाचे आहे, ही शिकवण त्यांनी दिली.

२. श्रम हीच भक्ती (Work is Worship)

संत रोहिदास हे व्यवसायाने चर्मकार होते. त्यांनी आपल्या परंपरागत व्यवसायाला कधीही कमी मानले नाही. चप्पल शिवण्याचे काम करत असतानाही त्यांचे मुखाने सतत भगवंताचे नामस्मरण चालत असे. "आपले काम प्रामाणिकपणे करणे हीच देवाची खरी सेवा आहे," असे ते मानत. म्हणूनच आजही ते कष्टकरी आणि कामगार वर्गासाठी मोठे प्रेरणास्थान आहेत.

३. जातीभेदावर प्रहार आणि समतेचा संदेश

संत रोहिदास यांनी जन्म-आधारित श्रेष्ठत्वाला कडाडून विरोध केला. त्यांनी सांगितले की, कोणताही माणूस त्याच्या जन्मावरून नाही, तर त्याच्या गुणांवरून आणि कर्मावरून श्रेष्ठ ठरतो. त्यांच्या याच समतेच्या विचारांमुळे चित्तोडची राणी मीराबाई यांनी त्यांना आपले गुरू मानले होते.

४. वैश्विक विचार आणि सन्मान

संत रोहिदास यांच्या विचारांची व्याप्ती इतकी मोठी होती की, शिखांच्या 'गुरु ग्रंथ साहिब' या पवित्र ग्रंथामध्ये त्यांच्या ४० पदांचा (भजनांचा) समावेश करण्यात आला आहे. ही त्यांच्या महानतेची सर्वात मोठी पावती आहे.

आजच्या युगात जिथे स्वार्थ आणि भेदभाव वाढताना दिसत आहेत, तिथे संत रोहिदास यांचे 'समता' आणि 'पवित्र मन' हे विचार दीपस्तंभासारखे वाट दाखवतात. त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या विचारांचे आचरण करणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.

Web Title : संत रोहिदास: पुण्यतिथि पर समानता और भक्ति की विरासत

Web Summary : संत रोहिदास समानता के प्रतीक थे, जिन्होंने आंतरिक शुद्धता और ईमानदारीपूर्ण कार्य का समर्थन किया। जाति को नकारते हुए, उन्होंने उपदेश दिया कि भक्ति और अच्छे कर्म ही सच्चे मूल्य को परिभाषित करते हैं। उनके उपदेश गुरु ग्रंथ साहिब में हैं, जो प्रेरणा देते हैं।

Web Title : Saint Rohidas: Legacy of Equality and Devotion on his Death Anniversary

Web Summary : Saint Rohidas, a beacon of equality, championed inner purity and honest work. Rejecting caste, he preached that devotion and good deeds define true worth. His teachings, enshrined in the Guru Granth Sahib, continue to inspire.