शहरं
Join us  
Trending Stories
1
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
2
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
3
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
4
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
5
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
6
Beed: जेलमध्ये चाललंय काय? तिसऱ्या दिवशीही कुख्यात गुन्हेगारांचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल!
7
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
8
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
9
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
10
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
11
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
12
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
13
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
14
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
15
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
16
कसोटीसाठी चांगल्या खेळपट्ट्या पाहिजेत, जर हे असेच सुरू राहिले तर...; भज्जीने व्यक्त केली भीती
17
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
18
गाळ काढताना विहिरीत हाती लागली ‘गधेगळ’, चौदाव्या शतकातील ऐतिहासिक ठेवा जोपासणार
19
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
20
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

Relationship Tips: सुखी दाम्पत्य जीवनासाठी चुकूनही करू नका 'या' २ गोष्टी- प्रेमानंदजी महाराज

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2024 12:51 IST

Relationship Tips: ज्याचा संसार सुखाचा असेल तोच पारमार्थिक मार्गावर पुढे जाऊ शकतो, यासाठी सुखी संसाराचा मंत्र देत आहेत प्रेमानंदजी महाराज!

संसारात नैराश्य आले म्हणून जर परमार्थाची वाट धरत असाल तर दोन्ही तुमच्याकडून साध्य होणार नाही. संसारात राहून विषय, विकार, वासना संपवून जो परमार्थाची वाट चालतो तोच मोक्षाकडे जातो. म्हणून संतांनी आधी 'प्रपंच करावा नेटका' असे म्हटले आहे. त्यासाठी नवरा बायकोचे नाते यावर भाष्य करताना अध्यात्मिक गुरु प्रेमानंदजी महाराज यांनी मार्गदर्शन केले आहे. 

ते सांगतात, विश्वास हा कोणत्याही नात्याचा पाया आहे. त्यात नवरा बायकोच्या नात्याचा पूर्ण डोलारा विश्वासावरच अवलंबून असतो. विश्वासाला तडा गेला तर छोटीशी भेग दरी बनू लागते आणि त्याचे पर्यवसान घटस्फोटात होते. तसे होऊ नये म्हणून नवरा बायकोने दोन महत्त्वाच्या गोष्टी सांभाळल्या पाहिजेत; कोणत्या ते जाणून घेऊ. 

पहिली गोष्ट म्हणजे प्रेम : 

नात्यात प्रेम असेल तर समोरच्या व्यक्तीला गुण दोषासकट स्वीकारण्याची मानसिकता आपोआप तयार होते. फक्त आई-वडील आणि मुलांच्या नात्यात उपजत प्रेम असते. नवरा बायकोच्या किंवा इतर कोणत्याही नात्यात सहवासाने, काळजीने, आपुलकीने प्रेम निर्माण करता येते. नवरा बायको या दोन वेगवेगळ्या वातावरणात घडलेल्या दोन स्वतंत्र व्यक्ती जेव्हा एका छताखाली येतात तेव्हा सहवासाने प्रेम वाढते तसेच वादालाही अनेक विषय सापडतात. मात्र कोणत्याही वादात अहंकाराचा समावेश झाला तर प्रेमळ नात्याला सुरुंग लागतो आणि नाते दुभंगते. अशा वेळी नवरा बायकोने अहंकार महत्त्वाचा की नाते यावर सारासार विचार करून वेळीच माघार घ्यावी आणि वाद मिटवावेत. तसेच इतर कोणामुळे अविश्वास निर्माण होत असेल तर परस्परांशी बोलून संशय दूर करावा, त्यामुळे अकारण तेढ वाढत नाही. नाते अधिक दृढ होते. 

नवरा बायकोचे परस्परांवर निस्सीम प्रेम असेल तर शारीरिक, मानसिक, आर्थिक गरजा भागवण्यासाठी इतर कोणाची गरज वाटत नाही की व्यभिचारही करण्याची गरज भासत नाही. मात्र तसे नसेल तर, विश्वासघात होण्याची शक्यता बळावते किंवा कोणा एकाची घुसमट होत राहते. असे नाते वरकरणी एकत्र असले तरी त्या नात्याला अर्थ उरत नाही. प्रेमाची, सहानुभूतीची, स्पर्शाची गरज प्रत्येक जीवाला असते तर नवरा-बायकोला का नसणार? हीच गरज ओळखून परस्परांचा आदर करा आणि प्रेमाने नाते घट्ट बांधून ठेवा. 

जबाबदारीची जाणीव : 

सद्यस्थितीत विवाहबाह्य संबंध उघडपणे स्वीकारले जात आहेत. पण या संबंधातून शारीरिक आकर्षण संपले की फक्त मनःस्ताप वाट्याला येतो हे लक्षात ठेवा. आपल्या जोडीदाराशी प्रामाणिक राहणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. मानवी देह म्हटल्यावर वासना, विकार जडणारच! परंतु त्यावर विवेक बुद्धीने मात करणे हे आपल्या हातात आहे. इतर कोणाबद्दल वाटणारे आकर्षण आणि त्याच वेळी मनावर घातलेले बंधन हे समीकरण जुळून आले तर नाते कधीही तुटणार नाही. विचार, वासना येत राहतात, त्याकडे दुर्लक्ष करा. एकमेकांवर निष्ठा ठेवा, मुलांचा विचार करा आणि बाह्य आकर्षणाला बळी पडू नका. आपण चुकीचे वागतोय, तसेच जोडीदाराने आपल्याला फसवले असते तर आपण ते सहन करू शकलो असतो का? या गोष्टींचा विचार करणे यालाच जबाबदारीची जाणीव असणे म्हणतात. 

नवरा बायकोने या दोन गोष्टींचे पालन केले तरी अर्ध्याहून अधिक कलह मिटतील. प्रश्न राहिला पैशांचा, तर पैसा, संपत्ती कष्टानेही मिळवता येईल, मात्र एकदा तुटलेले नाते, अनेक प्रयत्न केले तरी जोडले जाईलच असे नाही, म्हणून नात्यांचा आदर करा आणि जपा, आयुष्याच्या शेवटी तेच कामी येणार आहे!

टॅग्स :Relationship Tipsरिलेशनशिपrelationshipरिलेशनशिप