शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

मन हेची परमेश्वर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2020 13:17 IST

Spirituality मनाला एकाग्र करून कठिण साधना केलेल्या मनुष्याची पूजा ईश्वरासमान असते.

आपल्याला जर परमेश्वर हवा असेल तर त्यासाठी ज्ञान हवे नि भक्ती हवी. त्या करिता या मनाला शांत करण्याची गरज आहे. नुसते शांत नाही तर त्याची ओढ़ भक्ती मार्गाकडे कशी लागेल यासाठी प्रयत्न करावा लागेल. मनाची एकाग्रता वाढवावी लागेल. कारण एकाग्रता ही सर्व प्रकारच्या ज्ञानाचा पाया आहे.मन गोरख, मन गोविंद, मन ही औघड होयजो मन राखै जतन करि, आपै करता होय ।।मन हे योगी गोरखनाथ आहे. मन हेच ईश्वर आहे. अर्थात मनाला एकाग्र करून कठिण साधना केलेल्या मनुष्याची पूजा ईश्वरासमान असते. मन एकाग्र करून जो मनुष्य साधना करतो तो स्वत:च आपला करता (स्वामी) होतो.मनाबद्दल संत कबीर म्हणतात...मन मोटा, मन पातरा, मन पानी, मन लायमनके जैसी उपजै, तैसी ही हवै जाय ।।हा मनरूपी भवरा कधी खूपच बलवान बनतो तर कधी अत्यंत नाजुक बनतो. कधी पाण्याच्या समान शीतल तर, कधी अग्निसारखा क्रोधी बनतो. अर्थात जशी आपल्या मनाची इच्छा निर्माण होते, त्याप्रमाणे ते मन परिवर्तित होते. समर्थ रामदासांनी तर ‘मनाचे श्लोक’च लिहिले. आपले दुख आणि चिंता कमी करण्यासाठी स्वतपलीकडचा व्यापक विचार करण्याचा ते सल्ला देतात. म्हणून ते म्हणतात,मना मानसी दुख आणू नको रेमना सर्वथा शोक चिंता नको रे।।विवेके देहेबुद्धी सोडूनि द्यावीविदेहीपणे मुक्ति भोगीत जावी ।।भगवान श्रीकृष्ण म्हणतात की, प्रत्येक वस्तुचा एक स्वभाव असतो. जसे की वाºयाचे घोंगावणे, अग्नीचे पेट घेणे, पाण्याचे अवखळ वाहणे तसाच मनाचा देखील स्वभाव आहे जसे की इच्छा धरणे, चिंता करणे, स्वप्न पाहणे, एखादी गोष्ट घडली की उत्तेजित होणे किंवा अस्वस्थ होणे. मन हे कोबीच्या भाजीसारखे आहे. आपण जर कोबीचा एक एक पदर काढत गेलो तर शेवटी कोबी म्हणून काहीच राहत नाही. तसेच मानवी मनाचे आहे, आपण जर आपले सगळे विचार काढून टाकले तर मन नावाचे स्वतंत्र अस्तित्वच राहत नाही. परंतु असे कधीच होऊ शकत नाही, कारण विचार करणे हा मनाचा स्थायी भाव आहे. संत बहिणाबाईंनी आपल्या लिखानात मनाला उपमा दिली आहे.मन वढाय वढाय उभ्या पिकातल ढोरकिती हाकल हाकल तरी येत पिकावर ।।याही पलिकडे  जाऊन रामकृष्ण परमहंस असे म्हणतात की, मन म्हणजे माकडाचा खोडकरपणा आणि मस्तवाल हत्तीची चाल आहे. मनाचा स्वभाव हा कधी एकच नसतो. ते ज्या शरीरात असते त्याप्रमाणे आपला व्यवहार करीत असते. तीळामध्ये ज्याप्रमाणे तेल सामावलेले असते, त्याचप्रमाणे मन आपल्या शरीरामध्ये वास करीत असते. ज्यावेळी मन योग्य व अयोग्य गोष्टींचा विचार करून योग्य अशा निर्णयावर येऊन पोचते त्यास बुद्धी म्हणतात. मन जेव्हा एकरूप होऊन विचारांची मांडणी करते व ती साठवते त्यास चित्त असे म्हणतात. जेव्हा मन मदमस्त अवस्थेत येऊन मी मी करते तेव्हा त्याला अहंकार म्हणतात.

 समर्थांनी एका मनाच्या श्लोकात हा इलाज सांगून ठेवलाय. ‘नको रे मना क्रोध हा खेदकारी, नकोरे मना काम नाना विकारी, नको रे मना सर्वदा अंगिकारू, नकोरे मना मत्सरू दंभ भारू !!याउलट, बहिणाबाईंनी आईच्या मायेने सोप्या भाषेत मनाचे वर्णन करून सावधगिरीचा सल्ला दिला. त्या म्हणतात, मन मोकाट मोकाट त्याच्या ठायी ठायी वाटा, जशा वाºयानं चालल्या पाण्यावरल्या रे लाटा. त्या म्हणतात, ‘मन पाखरू पाखरू त्याचि काय सांगू मात, आता वहात भुईवर, गेलं गेलं आभायात.‘ स्वच्छंद मन क्षणात चंद्रावर जाते, तर बुद्धीला तेथे जाण्यासाठी ‘यान’ बनवावे लागते. मन आणि बुद्धीतला हा फरक चांगल्या जीवनाकडे नेतो. मनाला बुद्धीने हाताळले तर जीवन शांत आणि समृद्ध होते.

- शून्यानंद भारतीखामगाव

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक