शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
2
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
3
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
4
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
5
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
6
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
7
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
8
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
9
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
10
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
11
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
12
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
13
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
14
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
15
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
16
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
17
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
18
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
19
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
20
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
Daily Top 2Weekly Top 5

Indian Marriage: जया किशोरी सांगतात, 'मुलींसाठी स्थळ निवडताना लक्षात ठेवा 'ही' गोष्ट!'

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2024 14:58 IST

Marriage Rituals: मुलीसाठी मनपसंत जोडीदार निवडताना प्रत्येक वधूपित्याने लक्षात ठेवावी अशी गोष्ट सांगत आहेत व्याख्याता जया किशोरी. 

भारतीय लग्नसंस्था पूर्वीसारखी राहिली नसून त्यात अनेक स्थित्यंतर झाली आहेत. लग्न म्हणजे दोन कुटुंबांचा सोहळा, आप्त नातलग, मित्र मंडळी, देवा ब्राह्मणाच्या साक्षीने बांधलेली लग्न गाठ आणि आयुष्यभर एकमेकांचा सांभाळ करण्याचं दिलेलं वचन! मात्र अलीकडे हे चित्र बदलले आहे. करिअर घडवत असताना लग्नाचं  वाढलेलं वय, स्वभावात आलेली अढी आणि अपेक्षांचे डोंगर यामुळे लग्न ठरणं, होणं आणि टिकणं हे आव्हान झाले आहे. 

लग्न का ठरत नाही विचारावं, तर मुलाकडचे मुलींना आणि मुलीकडचे मुलांना दोष देऊन मोकळे होतात. पूर्वी मुलाकडचे होकार, नकार कळवण्यासाठी तंगवून ठेवायचे, आता मुलीकडचे उत्तर देण्यात दिरंगाई करतात. पर्यायी दोघांची वयं वाढतात आणि पालकांचे अपेक्षा भंग होतात. यावर उपाय म्हणून अध्यात्मिक व्याख्याता जया किशोरी यांनी मुलींना आणि पालकांना एक गोष्ट लक्षात ठेवा असे सांगितले आहे. ती पुढीलप्रमाणे- 

मुलीसाठी मनपसंत जोडीदार निवडताना तो अनुरूप आहे की नाही हे लक्षात घ्या. त्याचे रूप, गुण, मिळकत, स्वभाव आपल्या मुलिशी ताडून बघा. त्यात फारकत असेल तर वेळेत नकार कळवण्याचे सौजन्य दाखवा. हीच बाब मुलाकडच्यांनाही लागू होते. 

मात्र जया किशोरी विशेषतः मुलीच्या पालकांना विशेष सल्ला देतात. तो म्हणजे, 'मुलीच्या अपेक्षेप्रमाणे उच्च घरातला मुलगा शोधताना स्वप्नरंजन करू नका! सुखवस्तू कुटुंबात दिलेली मुलगी सुखीच होते असे नाही आणि मध्यमवर्गीय तसेच गरीब घरात दिलेली मुलगी दुःखी असते असेही नाही. दिवस सगळ्यांचेच बदलतात. सीतामाईसाठीदेखील जनक राजाने स्वयंवर ठेवले. शूर, वीर राजे बोलावले. रामाने पण जिंकला. सीतेशी विवाह झाला. आपली जानकी रघुवंशाची महाराणी होणार या विचाराने जनक राजा सुखावला. मात्र सीतेच्या नशिबात कालांतराने वनवास आला. तिने राजसुखाचा त्याग केला आणि वनवासात राहूनही आनंदाने स्वर्ग फुलवला. याचाच अर्थ, सुख निर्माण करण्याची क्षमता मुलींमध्ये निर्माण करा. त्यांना खंबीर बनवा. आहे त्या परिस्थितीशी लढा द्यायला शिकवा. तरच त्या सुखाने संसार करू शकतील. 

त्यापेक्षा मुलाचे, घरच्यांचे स्वभाव बघा, आर्थिक स्थितीचा आढावा घ्या आणि जोडी अनुरूप दिसत असल्यास होकार देऊन मोकळे व्हा. अति अपेक्षा ठेवल्या तर अपेक्षा भंग होईलच शिवाय लग्नाचे वय वाढून लग्न करणारच नाही निर्णयापर्यंत मजल जाऊ शकेल हे नक्की! त्यापेक्षा वधू आणि वर मंडळींनी वेळीच सावध व्हा आणि लग्न हा व्यवहार न ठरवता आपुलकीचे नाते जोडा.' 

टॅग्स :marriageलग्न