शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

भक्ती म्हणजे नुसतेच बाह्यदर्शन नाही तर अंतरंगात बदल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 11:49 IST

अभेद वृत्तीने जर जीवन व्यवहार केला तर देवाचे सगुण दर्शन झाल्याशिवाय राहणार नाही. भक्ती म्हणजे नुसतेच बाह्यदर्शन नाही तर अंतरंगात बदल अपेक्षित आहे..!

- युवा कीर्तनकार, ह.भ.प. ऋतुपर्ण भरतबुवा रामदासी( बीड, महाराष्ट्र, ८७ ९३ ०३ ०३ ०३ )

महाराष्ट्रातील संतांनी भक्तिमार्गाचा प्रचार आणि प्रसार करतांना देवळातील देव विश्वात्मक बनविला. विश्वात्मक देवाचे वर्णन वेदांमध्ये आहेच पण वेद हे संस्कृत भाषेमध्ये आहेत शिवाय वेदभाषा ही बहुजन समाजाला कळणारी नाही, त्याकाळात वेदमंत्रांचा अधिकारदेखील सर्वांना नव्हता, त्यामुळे वेद तत्वज्ञानापासून बहुजन समाज वंचित राहिला.

संतांनी विचार केला की, मनुष्य देहाच्या उद्धाराचे हे तत्त्वज्ञान समाजाला कळलेच पाहिजे. वेदांच्या कृपणतेबद्दल संतानी खंत व्यक्त केली. ज्ञानराज माऊली म्हणतात -

वेदसंपन्न होय ठाई । परि कृपणू आण नाही ।जो कानी लागला तिही । वर्णाचिया ॥

वेदांतील उद्धाराचा हा मार्ग, हा मानवता धर्म, सर्वांना कळावा, मोक्षद्वार सर्वांसाठी खुले व्हावे, म्हणून संतांनी वेद मराठी मायबोलीत आणले.

वेदांचे काठिण्य लक्षांत घेऊन भगवंताने गीता सांगितली पण अशिक्षित समाजाला गीतादेखील कळाली नाही परत भगवंतांनी ज्ञानेश्वर महाराजांच्या रूपाने अवतार घेऊन ज्ञानेश्वरीसारखा सुबोध ग्रंथ रचला.

वेदप्रणित मानवता धर्म, तत्वज्ञान बहुजन समाजाच्यासाठी खुले केले. माऊली म्हणतात -

तैसा वाग्विलासे विस्तारू । गीतार्थेसी विश्व भरुं।आनंदाचे आवारु । मांडू जगा ॥

संतांनी कर्मकांडात आणि व्रतवैकल्यांत अडकलेली भक्ती सर्वजनसुलभ केली. देवप्राप्तीसाठी फार सायास करण्याची गरज नाही. पश्चात्तापपूर्वक भगवंताला शरण गेले की, तो सहज प्राप्त होतो. यासाठी संतांनी नामसाधना सांगितली.माऊली हरिपाठात वर्णन करतात -

देवाचिये द्वारी उभा क्षणभरी ।तेणे मुक्ती चारी साधियेल्या ।हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा ।पुण्याची गणना कोण करी ॥

संतांच्या या सोप्या, सुलभ तत्वज्ञानामुळे या देशातील अठरापगड जाती हरिनामाच्या ध्वजाखाली एकत्रित आल्या व त्यांनी पंढरीच्या वाळवंटात एकात्मतेचा गोपाळकाला केला. 

पंढरीचा पांडुरंग हा भेदभावातीत आहे, कृपाळू आहे, कनवाळू आहे, पतितपावन आहे त्याला सर्वभावे शरण जा. मन, बुद्धी, चित्त आणि संसारातील सर्व कर्म त्याला अर्पण करा.

जे जे कर्म कराल ते ते निष्काम व निर्लेप करा. कधी कुणाचा द्वेष, मत्सर, वैरभाव करू नका. देव हा देवळापुरता मर्यादित नाही, तो सर्वांतरयामी आहे, सर्वत्र आहे.

जे जे भेटे भूत । ते ते मानिजे भगवंत ।हा भक्तीयोग निश्चित । जाण माझा ॥

संतांनी ही भक्ती जनमनांत रुजवली. अशा अभेद वृत्तीने जर जीवन व्यवहार केला तर देवाचे सगुण दर्शन झाल्याशिवाय राहणार नाही. भक्ती म्हणजे नुसतेच बाह्यदर्शन नाही तर अंतरंगात बदल अपेक्षित आहे..!

॥ जय जय रघुवीर समर्थ ॥

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकspiritualअध्यात्मिक