शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

पाटोद्यातील शेतकऱ्यांना यंदाही टाळणार काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:50 IST

पाटोदा : जिल्ह्यात कायमस्वरूपी दुष्काळी व ऊसतोडणी मजुरांचा तालुका म्हणून ओळख असलेल्या पाटोदा तालुक्यात १८ फेब्रुवारी रोजी रात्री ...

पाटोदा : जिल्ह्यात कायमस्वरूपी दुष्काळी व ऊसतोडणी मजुरांचा तालुका म्हणून ओळख असलेल्या पाटोदा तालुक्यात १८ फेब्रुवारी रोजी रात्री गारपिटीसह अवकाळी पावसाने गहू, ज्वारी, हरभरा या पिकांबरोबरच फळबागांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. रोहतवाडी, बेनसूर शिवारात शेतकऱ्यांच्या १५ मेंढ्यांचा मृत्यूही झाला. या अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी दिले आहेत. भाजप नेत्या तथा माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनीही नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे. मात्र, तालुक्याच्या बाहेरून कारभार पाहणारे कृषी व महसूल कर्मचारी हे पंचनामे करणार की, खरीप काळात घरात बसूनच नुकसान झाले नसल्याचा अहवाल दिल्याप्रमाणेच या अवकाळीचेही तसेच होणार अशी भीती शेतकरी व्यक्त करीत आहेत.

पाटोदा तालुका हा ऊसतोडणी मजुरांचा तालुका म्हणून ओळखला जातो. त्याहीपेक्षा डोंगराळ भूभाग व अल्पसिंचन क्षेत्रामुळे कायमस्वरूपी दुष्काळी तालुका म्हणून ओळख आहे. लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे तालुक्याचा कारभार पाहणारे वरिष्ठ अधिकारीही तालुक्याच्या बाहेर राहूनच कारभार पाहतात. खरीप हंगामात समाधानकारक पावसामुळे बाजरी, सोयाबीन, कापूस, तूर ही पिके काढणीस आलेली असताना १० ते १२ दिवस झालेल्या संततधार पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. राज्य सरकारने या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी १० हजार रुपये जाहीर करून झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले. मात्र, महसूल व कृषी विभागाला तालुक्यातील नुकसान दिसले नाही. त्यामुळे पाटोदा तालुक्यातील शेतकरी या नुकसान भरपाईपासून वंचित राहिले. तसेच खरीप पीकविमा भरलेले शेतकरी महसूल व कृषीच्या अहवालामुळे खरीप पीक विम्यासही मुकले असे म्हटल्यास वावगे ठरू नये. त्यामुळे खरिपात अतिवृष्टीची नुकसान भरपाई नाही. खरिपात अतिवृष्टीने क्षेत्र बाधित नसल्याचा कृषी व महसूल विभागाचा अहवाल आला. त्यामळे खरीप पिकांचा विमाही मिळाला नाही. आता १८ फेब्रुवारी रोजी गारपिटीसह अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचे तरी पंचनामे होतील काय ? याबाबत शेतकऱ्यांना शंका आहे. पंचनामे करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.