शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
2
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
5
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
7
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
8
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
9
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
10
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
11
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
12
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
13
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
14
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
15
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
16
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
17
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
18
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
19
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
20
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

लातूरला शक्य ते आष्टीला का जमत नाही? - A

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:20 IST

आष्टी : जिल्हा परिषदेच्या शिक्षकांनी शाळेच्या वेळेनंतर दोन तास जास्त शिक्षण दिले तर काय होईल? लातूरसारख्या ठिकाणी विद्यार्थ्यांची आठ-आठ ...

आष्टी : जिल्हा परिषदेच्या शिक्षकांनी शाळेच्या वेळेनंतर दोन तास जास्त शिक्षण दिले तर काय होईल? लातूरसारख्या ठिकाणी विद्यार्थ्यांची आठ-आठ दिवसाला परीक्षा घेतली जाते. लातूरला शक्य आहे तर आष्टीच्या शिक्षकाला का जमत नाही? आष्टीची गुणवत्ता अजून वाढविण्यासाठी शिक्षकांनी आपला जास्तीचा वेळ द्यावा, असे प्रतिपादन आ. सुरेश धस यांनी केले.

तालुक्यातील दहावीच्या परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ २१ जुलै रोजी पार पडला. या कार्यक्रमात आ. सुरेश धस बोलत होते. यावेळी प्रफुल्ल सहस्रबुद्धे, सरपंच परिषद प्रदेशाध्यक्ष दत्ता काकडे, आष्टी तालुका दूध संघाचे व्हा. चेअरमन आत्माराम फुंदे, आरती ससाणे यांच्यासह आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

यावेळी आ. धस यांनी १२० गुणवंतापैकी ७५ मुली असल्याने विशेष कौतुक केले. तालुक्यातील वसुंधरा शाळेतील १५ मुलींनी शंभर टक्के, जि.प. कन्या शाळेच्या १६ मुलींनी ९५ टक्क्यांपेक्षा जास्त गुण तर गणेश विद्यालयातील नऊ विद्यार्थिनींनी आऊट ऑफ मार्क घेतले आहेत. या यशाचे गमक त्या शाळेतील शिक्षकांपासून शिपायांपर्यंत सर्वांचे यश असल्याचे धस म्हणाले. गुणवत्तेचा आष्टी पॅटर्न करण्यासाठी सर्व शिक्षकांनी जबाबदारी घेतल्यास कितीही खर्च आल्यास ते पेलण्याची तयारी त्यांनी दर्शविली. यावेळी मनोज धस, भारत मुरकुटे, सुनील रेडेकर, मनोज सुरवसे, सुरेश पवार, बापू शिंदे, संपत शेळके, बाळासाहेब घोडके आदी उपस्थित होते.

एकशे वीस गुणवंतांचा सन्मान

दहावीच्या परीक्षेत चांगले गुण घेऊन उत्तीर्ण झालेल्या तालुक्यातील सुमारे एकशे वीस विद्यार्थी-विद्यार्थिनींचे आ. सुरेश धस यांनी फेटा बांधून प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन कौतुक केले. यावेळी गुणवंत विद्यार्थी व पालकांनीही आपले मनोगत व्यक्त केले.

220721\134122bed_10_22072021_14.jpg