शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

कचरा व्यवस्थापन ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी - A

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:20 IST

गेवराई : दरवर्षी आपल्या देशात कोट्यवधी टन कचरा तयार होतो. या कचऱ्याचे व्यवस्थापन न झाल्यामुळे तो वाढत जातो. ज्याचा ...

गेवराई : दरवर्षी आपल्या देशात कोट्यवधी टन कचरा तयार होतो. या कचऱ्याचे व्यवस्थापन न झाल्यामुळे तो वाढत जातो. ज्याचा पर्यावरण आणि जीवसृष्टीवर जीवघेणा परिणाम होतो आहे. कचरा व्यवस्थापनासाठी थ्री आर (रिड्यूज, रेफ्यूज, रिसायकल) सूत्राचा वापर जागरूकतेने करावा, कारण कचरा व्यवस्थापन ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. ज्यातून स्वच्छ, सुंदर, निरोगी पृथ्वीची निर्मिती होऊ शकते, अशी माहिती पर्यावरण अभ्यासक दत्ता पत्की यांनी दिली. दीनदयाल शोध संस्थान संचलित कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालय भारत सरकार द्वारा वित्त पोषित जनशिक्षण संस्थान, बीडद्वारे आयोजित स्वच्छता पंधरवडा कार्यक्रमांतर्गत तालुक्यातील ताकडगाव येथे ‘कचरा व्यवस्थापन’ या विषयावर मार्गदर्शन करताना ते बोलत होते. ते म्हणाले, एका बाटलीमध्ये किमान १०० चौरस मीटर क्षेत्रफळाएवढ्या कॅरिबॅग मावतात. त्या विटांचा आपण शोभिवंत कामासाठी उपयोग करू शकतो. त्यांनी त्याचे प्रात्यक्षिक दाखविले. उपस्थित लाभार्थींनी प्रात्यक्षिक केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच अनिता गिरी होत्या. कार्यक्रमाची सुरुवात संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. व्यासपीठावर जनशिक्षण संस्थानचे संचालक गंगाधर देशमुख, प्रमुख पाहुणे दत्ता पत्की, उपसरपंच विद्या मोटे यांची प्रमुख उपस्थिती होती. गंगाधर देशमुख यांनी व्यवसाय कौशल्यातून स्वयंरोजगारनिर्मितीबद्दल मार्गदर्शन केले. यावेळी त्रिंबक मोटे, नागरिक व लाभार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन कार्यक्रम अधिकारी सीमा मनूरकर यांनी केले. अनुजा मिसाळ यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रशिक्षिका रुक्मिणी गायकवाड यांनी परिश्रम घेतले.

210721\2129sakharam shinde_img-20210721-wa0010_14.jpg