शहरं
Join us  
Trending Stories
1
आता मनसे काँग्रेसचे चिन्ह पंजा काढून घेणार? निवडणूक आयोगाकडे धाव, प्रकरण काय?
2
शांतीगिरी महाराजांनी शिवसेनेच्या नावाने उमेदवारी अर्ज भरला; भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
3
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
4
"नरेंद्र मोदींच्या जागी राहुल गांधी पंतप्रधान असते तर..."; नेमकं काय म्हणाले आसामचे मुख्यमंत्री?
5
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
6
'त्यांना कशाला घेता, आम्हीच तुमच्यासोबत येतो; उद्धव ठाकरेंचा दिल्लीला फोन'; शिंदेंचा गौप्यस्फोट
7
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
8
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
9
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
10
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज
11
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
12
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
13
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
14
अमेठीमध्ये बसपाने उतरवला उमेदवार? भाजपा की काँग्रेस, कुणाचं गणित बिघडवणार?  
15
PHOTOS: IPS पदाचा राजीनामा देऊन लोकसभेच्या 'रिंगणात', सामाजिक कार्यासाठी मैदानात!
16
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
17
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लावा नवीन तुळस; होतील अगणित फायदे!
18
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबची गगनभरारी, अभिनेत्रीने खरेदी केलं हक्काचं घर
19
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
20
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे

दोन दिवसांत १२१ बस ४२ हजार कि.मी. धावल्या; हाती पडले केवळ नऊ लाख !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 4:32 AM

लोकमत न्यूज नेटवर्क बीड : कोरोनाची चेन ब्रेक करताना राज्य परिवहन महामंडळाच्या बसलाही ब्रेक लागला आहे. प्रवासी नसल्याने मोजक्यास ...

लोकमत न्यूज नेटवर्क

बीड : कोरोनाची चेन ब्रेक करताना राज्य परिवहन महामंडळाच्या बसलाही ब्रेक लागला आहे. प्रवासी नसल्याने मोजक्यास बस धावत आहेत. त्यामुळे रापमला लाखो रुपयांचा दररोज फटका बसत आहे. मागील दोन दिवसांत विकेंड लॉकडाऊन होते. या दोन दिवसांत १२१ बस ४२ हजार किलोमीटर धावल्या आहेत. यात केवळ ९ लाख रुपये उत्पन्न मिळाल्याचे सांगण्यात आले.

जिल्ह्यात रापमच्या ५१८ बस आहेत. लॉकडाऊनपूर्वी या बस धावत होत्या. यात दररोज ४० लाखांपेक्षा जास्त उत्पन्न मिळत होेते; परंतु सध्या लॉकडाऊनमुळे आणि मोजक्याच प्रवाशांना परवानगी असल्याने उत्पन्नावर परिणाम झाला आहे. या दोन दिवसांत केवळ ९ लाख ८ हजार रुपयांचे उत्पन्न रापमला मिळाले आहे. तर निम्मेच कर्मचारी कर्तव्यावर बोलविले जात असल्याचे सांगण्यात येत आहे.

निम्मेच कर्मचारी कामावर

बस जागेवर असल्याने चालक, वाहक, तंत्रज्ञ आदी कर्मचारी कामावर येत नाहीत. शासनाच्या नियमावलीनुसार ५० टक्केच कर्मचारीही कार्यालयात असतात.

चालक, वाहकांना रोटेशननुसार कर्तव्यास बोलावले जात आहे. तर काहींना मुंबई बेस्टसाठी पाठविण्यात आलेले आहे. सध्या निम्मेच कर्मचारी कर्तव्यावर येत असल्याचे दिसते.

कोरोनाची चेन ब्रेक करताना तोटा

n जिल्ह्यात धावणाऱ्या बसमधून महामंडळाला दररोज सरासरी ४० लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न मिळत होते.

n परंतु गतवर्षीपासून लॉकडाऊन सुरू झाल्याने रापम तोट्यात आहे. मध्यंतरी बस धावत असल्याने काही प्रमाणात परिस्थिती पूर्ववत होत होती; परंतु आता पुन्हा ‘जैसे थे’ झाले आहे.

n शासनाने कोरोनाची चेन ब्रेक करण्यासाठी जाहीर केलेल्या नियमावलीचा रापमच्या बसलाही फटका बसत आहे. प्रवासी नसल्याने रापम सध्या तोट्यात आहे. आजही केवळ आठ आगारांतून बोटावर मोजण्याइतक्याच बस धावत असल्याचे सांगण्यात आले.

बसची तासनतास प्रतीक्षा

प्रवासी नसल्याने बस वेळेवर निघत नाहीत. ३० प्रवासी झाल्याशिवाय बस हलणार नाही, असे चालक, वाहक सांगतात. त्यामुळे ही संख्या पूर्ण होईपर्यंत बसमध्येच तासनतास बसावे लागत आहे. यामुळे वेळ लागत असून चिडचिडेपणा वाढला आहे.

- अभिमान पंडित, प्रवासी, बीड