शहरं
Join us  
Trending Stories
1
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
2
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
3
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
4
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
5
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
6
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
7
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
8
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
9
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
10
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
11
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
12
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
13
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
14
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
15
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
16
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
17
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
18
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
19
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
20
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
Daily Top 2Weekly Top 5

अंबेजोगाईत एका रात्रीत तीन चोऱ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:36 IST

अंबेजोगाई : अंबेजोगाई शहरात रविवारी रात्री चोरट्यांनी बिनधास्तपणे अक्षरशः धुमाकूळ घातला. शहराच्या मुख्य बाजारपेठेसह मोंढ्यातील दुकाने आणि स्वाराती रुग्णालय ...

अंबेजोगाई : अंबेजोगाई शहरात रविवारी रात्री चोरट्यांनी बिनधास्तपणे अक्षरशः धुमाकूळ घातला. शहराच्या मुख्य बाजारपेठेसह मोंढ्यातील दुकाने आणि स्वाराती रुग्णालय परिसरातील एक घर फोडून चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम असा लाखोंचा ऐवज लुटून नेला. शहरात दुचाकी चोऱ्यांचे सत्र सुरू असतानाच, घरफोड्याही वाढल्याने नागरिकात दहशत पसरली आहे. एकाच रात्रीतून तीन गजबजलेल्या ठिकाणी चोऱ्या करून चोरटे उघड आव्हान देत असताना, पोलीस अधिकारी मात्र ठाण्यात कामानिमित्त येणारे लोकप्रतिनिधी आणि सामान्य नागरिकांवर रुबाब झाडण्यात धन्यता मानत आहेत.

दुसऱ्या घटनेत स्वाराती रुग्णालय परिसरात नर्सेस क्वार्टरमध्ये राहणारे युवराज रामराव राख हे रविवारी सुट्टीनिमित्त कुटुंबीयांसह मूळ गावी होळ (ता. केज) येथे गेले होते. रात्री १०च्या नंतर कधीतरी चोरट्यांनी कोयंडा आणि कुलूप तोडून त्यांच्या घरात प्रवेश केला. घरातील समान अस्ताव्यस्त करत, त्यांनी कपाटातून सोन्याचे दागिने आणि रोख ४० हजार असा एकूण १ लाख ८ हजारांचा मुद्देमाल लंपास केला. सोमवारी सकाळी ८ वाजता युवराज राख हे गावाहून घरी परतल्यानंतर त्यांना चोरी झाल्याचे लक्षात आले. दोन्ही घटनांप्रकरणी गुन्हा नोंद झाला आहे. तिसरी चोरी मोंढ्यात झाली. येथील हार्डवेअरचे व्यापारी अनिल मुंदडा यांचे दुकान फोडून चोरट्यांनी हजारोंचा मुद्देमाल चोरून नेला. दुकानमालक आजारी असल्याने निश्चित किती ऐवज चोरीला गेला आहे, हे अद्याप समजू शकले नाही. सायंकाळपर्यंत या चोरीची पोलिसात नोंद झाली नव्हती.

कायदा-सुव्यवस्था ढासळली; गुंडगिरी, चोऱ्या वाढल्या

अवैध धंद्याचे सोडा, किमान पोलिसांनी गुंड, चोरांपासून आम्हाला संरक्षण द्यावे, एवढ्या माफक अपेक्षेवर आता नागरिक आले आहेत, परंतु शहरातील वाढत्या गुंडगिरीसोबतच चोऱ्याही वाढल्याने नागरिक भीतीच्या सावटाखाली आहेत. पोलीस मात्र ठाण्यात राबता असलेल्या गुंड, अवैध धंदेवाल्यांना सन्मानाची वागणूक देऊन कामानिमित्त येणारे लोकप्रतिनिधी, सामान्य नागरिकांवर रुबाब झाडत आहेत. यामुळे संभ्रमात असलेले नागरिकांनी आता वरिष्ठ अधिकाऱ्यांनीच लक्ष घालून शहराला शिस्त लावावी आणि ढासळलेली कायदा सुव्यवस्था सावरावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.