शहरं
Join us  
Trending Stories
1
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
2
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
3
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
4
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
5
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
6
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
7
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
8
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
9
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
10
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
11
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
12
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
13
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
14
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
15
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
16
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
17
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
18
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
19
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
20
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
Daily Top 2Weekly Top 5

आला उन्हाळा, आरोग्य सांभाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:31 IST

विष्णू गायकवाड गेवराई : गत तीन-चार दिवसांपासून ऊन तापत असून नागरिकांनी त्वचारोगाबरोबरच आरोग्य सांभाळावे, असा सल्ला आरोग्य विभागाने दिला ...

विष्णू गायकवाड

गेवराई : गत तीन-चार दिवसांपासून ऊन तापत असून नागरिकांनी त्वचारोगाबरोबरच आरोग्य सांभाळावे, असा सल्ला आरोग्य विभागाने दिला आहे

उन्हाळा सुरू झाल्यावर ऋतूतील झालेल्या बदलांमुळे विविध प्रकारचे आजार उद्भवतात. यामध्ये प्रामुख्याने त्वचाविकार तसेच उष्माघाताचा सामावेश आहे.

उन्हाळ्यात आरोग्य सांभाळण्यासाठी प्रतिबंधक उपायांबरोबरच काही दक्षता आणि खाण्या-पिण्यावर बंधने ठेवणेही तितकेच महत्त्वाचे आहे. उन्हाळ्यामध्ये साधारणत सर्वत्र जाणवणारा दाहक परिणाम म्हणजे उष्माघात. त्यमध्ये शरीराचे तापमान उच्चपातळीवर जाते योग्य ते उपचार वेळेवर न मिळाल्यास संबंधित व्यक्ती दगावण्याची शक्यता ही अधिक असते. तापमानाचा पारा ४० अंश सेल्सिअसवर पोहोचला आहे. उन्हामुळे शरीरात पाण्याचे प्रमाण कमी होत असल्याने ओ.आर.एस, घरी बनविण्यात आलेली लस्सी, लिंबू, पाणी, ताक आदींचा वापर नियमित करावा. तहान लागलेली नसली तरीसुद्धा जास्तीत जास्त पाणी प्यावे. उन्हापासून बचाव म्हणून नागरिकांनी आरोग्याची योग्य ती काळजी घ्यावी असे आवाहन आरोग्य विभागाने केले.

अशी घ्यावी काळजी

हलके पातळ व सच्छिद्र सुती कपडे वापरावेत.

बाहेर जाताना गॉगल्स टोपी बूट व चप्पलचा वापर करावा. उन्हात काम करत असलेल्या व्यक्तीने डोक्यावर टोपी किंवा छत्रीचा वापर करावा.

अशक्तपणा स्थूलपणा डोकेदुखी सतत येणारा घाम आदी उन्हाचा झटका बसण्याची चिन्हे ओळखावीत व चक्कर येत असल्यास तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

बाहेर कामकाज करत असताना मध्ये ब्रेक घेऊन नियमित आराम करावा.

गरोदर महिला व आजारी व्यक्तींची अधिक काळजी घेण्यात यावी.

काय करू नये

शरीरात पाण्याचे प्रमाण कमी करण्यास कारणीभूत असलेले चहा, कॉफी व कार्बोनेटेड थंडपेय याचा वापर टाळावा.

दुपारी १२ ते ३ या कालावधीत बाहेर उन्हात जाण्याचे टाळावे.

गडद घट्ट व जाड कपडे घालण्याचे टाळावे.

बाहेर तापमान जास्त असल्यास शारीरिक श्रमाची कामे टाळावीत. शिळे अन्न खाऊ नये आणि उच्चप्रथिने असलेले अन्न टाळावे.

ऊन कडक तापत असल्यामुळे अशा उन्हात फिरल्यास उष्माघात होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी उन्हाचा धोका लक्षात घेऊन दुपारच्या वेळी घराबाहेर पडणे टाळावे अशक्तपणा डोकेदुखी ताप येणे चक्कर येत असल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

डॉ. संजय कदम, तालुका आरोग्य अधिकारी, गेवराई

उन्हामुळे त्वचेवर परिणाम होतात. त्यामुळे नागरिकांनी शक्यतोवर उन्हात जाणे टाळावे. जास्त प्रमाणात घाम असल्यास घामोळ्या होण्याची दाट शक्यता असते. उन्हातील अतिनील किरणांचा त्वचेवर परिणाम होऊ नये म्हणून नागरिकांनी काळजी घ्यावी. काही लक्षणे आढळून येताच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

डॉ. धनंजय माने, वैद्यकीय अधिकारी, निपाणी जवळका