शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
2
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
3
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
4
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
5
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
6
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
7
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
8
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
9
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
10
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
11
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
12
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
13
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
14
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."
15
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...
16
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
17
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)
18
कामाची गोष्ट! पीठ मळल्यानंतर किती वेळात वापरता येतं, कधी खराब होतं, फ्रिजमध्ये ठेवायचं का?
19
Video: पहलगाम, RCB ते विमान अपघात..; 2025 मध्ये घडलेल्या घटनांवर तरुणाने बनवले गाणे
20
काल मातोश्रीवर बैठकीत, आज माजी नगरसेवक शिवसेनेत; वर्धापन दिनीच शिंदेंचा उद्धवसेनेला धक्का 

बीड जिल्ह्यात ‘हमारे दो’कडे वाढला कल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2018 01:07 IST

बदलत्या जीवनमानामुळे निर्माण झालेल्या सामाजिक व कौटुंबिक परिस्थितीत आता शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातील कुटुंबांचा ‘हम दो हमारे दो’ कडे कल वाढत आहे. राष्टÑीय कुटुंब कल्याण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात एप्रिलमध्ये मागील वर्षीच्या तुलनेत १३१ जास्त शस्त्रक्रिया करण्यात आल्या.

ठळक मुद्देशहरासह ग्रामीण कुटुंबांमध्ये जागरुकता

अनिल भंडारी ।लोकमत न्यूज नेटवर्कबीड : बदलत्या जीवनमानामुळे निर्माण झालेल्या सामाजिक व कौटुंबिक परिस्थितीत आता शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातील कुटुंबांचा ‘हम दो हमारे दो’ कडे कल वाढत आहे. राष्टÑीय कुटुंब कल्याण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात एप्रिलमध्ये मागील वर्षीच्या तुलनेत १३१ जास्त शस्त्रक्रिया करण्यात आल्या. औषधांचा तुटवडा, रिक्त पदे, काही ठिकाणी पुरेशा सुविधांचा अभाव अशी परिस्थिती असतानाही १६४३ शस्त्रक्रिया यशस्वी करत ‘छोटेकुटुंब, सुखी कुटुंब ही बिरुदावली’ रुजविण्यात आरोग्य विभाग यशस्वी ठरत आहे.

जिल्ह्यात मागील वर्षी एप्रिलमध्ये ग्रामीण भागात १०४८ व शहरी भागात ४६४ अशा एकूण १५१२ कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया झाल्या. या तुलनेत चालू वर्षात ग्रामीण भागात १००५ तर शहरी भागात ६३८ अशा १६४३ शस्त्रक्रिया करण्यात आल्या. विशेष म्हणजे यात नसबंदीच्या ६ शस्त्रक्रिया करण्यात आल्या. यात ४ शस्त्रक्रिया ग्रामीण तर २ शहरी भागात झाल्या आहेत.एकीकडे राष्ट्रीय कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी होत असताना काही वैद्यकी अधिकाऱ्यांमध्ये उदासीनता असल्याचे दिसत आहे. एकही शस्त्रक्रिया न करणा-या संबंधित वैद्यकीय अधिकाºयांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत.दोन अपत्यांवर ९७१यशस्वी शस्त्रक्रियाचालु वर्षात एप्रिलमध्ये १६४३ कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया करण्यात आल्या. त्यापैकी दोन अपत्यांवर ९७१ शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. यात ग्रामीण भागात ६०६ तर शहरी भागात ३६५ शस्त्रक्रिया झाल्या. ग्रामीणमध्ये हे प्रमाण दुप्पट आहे.

थोरात, राऊत यांचे विशेष योगदानजिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात, डॉ. सदाशिव राऊत यांचा या मोहिमेत विशेष सहभाग राहिंला आहे. डॉ. थोरात यांनी चालु वर्षात एप्रिलमधील १६४७ पैकी २०० तर १ मे ते २३ मे या कालावधीत तब्बल ५४९ अशा एकूण ७४९ शस्त्रक्रिया केल्या आहेत. तर डॉ. राऊत यांनी एप्रिल व मे कालावधीत ६३९ शस्त्रक्रिया केल्या आहेत. जिल्ह्यात होत असलेल्या कुटुंब कल्याण शस्त्रक्रियांमध्ये डॉ. थोरात व डॉ. राऊत यांनी केलेल्या शस्त्रक्रियांचे प्रमाण उल्लेखनीय आहे. इतर वैद्यकीय अधिकारीही कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया यशस्वी करत आहेत.

निपाणी जवळका येथे सर्वाधिक शस्त्रक्रियाजिल्ह्यात निपाणी जवळका प्रा.आरोग्य केंद्रात १०३, जातेगावमध्ये ६९, वडवणीत ६५, पात्रुड ५८, अंमळनेरमध्ये ५८, भोगलवाडीत ५६ शस्त्रक्रिया झाल्याची नोंद आहे.

भरपाईचीही तरतूदकुटुंब कल्याण शस्त्रक्रिया असफल झाल्यास ३० हजार रुपये, गुंतागुंत झाल्यास भरपाईची तरतूद आहे. दुर्दैवाने जर मृत्यू झाल्यास दोन लाख रुपये भरपाईची देण्यात येते. मागील वर्षी दहा शस्त्रक्रिया असफल ठरल्या. हे प्रमाण अत्यंत कमी आहे.

नियोजनामुळे शक्यजिल्ह्यातील बंद शस्त्रक्रियागृह आवश्यक सुविधा उपलब्ध करुन सुरु केले. प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाºयांना टाक्याच्या शस्त्रक्रियेचे प्रशिक्षण देण्यात आले. तर एम. डी. डॉक्टरांना लॅप्रोस्कोपीचे प्रशिक्षण देण्यात आले.

जागरुकता वाढलीएप्रिलमध्ये १०८३ बिनटाका व टाक्याच्या ५५४ शस्त्रक्रिया करण्यात आल्या. ग्रामीण भागात जागरुकता वाढली आहे. लोक स्वत: शस्त्रक्रियेसाठी येत आहेत. १५ प्राथमिक आरोग्य केंद्रात एकही शस्त्रक्रिया न झाल्याने संबंधित वैद्यकीय अधिकाºयांना कारणे दाखवा नोटीस बजावल्या आहेत. लवकरच कारणे कळतील.- राधाकृष्ण पवारजिल्हा आरोग्य अधिकारी, बीड.

टॅग्स :BeedबीडHealthआरोग्यFamilyपरिवारMarathwadaमराठवाडा