शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
4
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
5
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
6
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
7
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
8
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
9
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
10
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
11
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
12
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
13
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
14
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
15
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
16
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
17
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
18
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
19
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
20
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

चमकणारी प्रत्येक वस्तू सोने नसते; संदीप क्षीरसागरांकडे केला इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:26 IST

१५ जुलै रोजी बीड तालुक्यातील रूई (लिंबा) येथे शिवसंपर्क अभियानाचा शुभारंभ माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या हस्ते झाला. ...

१५ जुलै रोजी बीड तालुक्यातील रूई (लिंबा) येथे शिवसंपर्क अभियानाचा शुभारंभ माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या हस्ते झाला. याप्रसंगी त्यांनी मार्गदर्शन केले.

बीड : कार्यकर्त्यांचा उत्साह पाहून माझादेखील उत्साह वाढतो. सत्तेत असो वा नसो, विकासाची प्रक्रिया चालूच राहील. चमकणारी वस्तू सोनेच असते असे नाही हे आता सिद्ध झाले आहे. अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. जनतेच्या प्रश्नावर शिवसैनिकांनी आता सतर्क राहणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी केले. त्यांचा बोलण्याचा इशारा आ. संदीप क्षीरसागर यांच्याकडे होता.

१५ जुलै रोजी बीड तालुक्यातील रूई (लिंबा) येथे शिवसंपर्क अभियानाचा शुभारंभ माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या हस्ते व शिवसेना जिल्हा प्रमुख कुंडलिक खांडे, माजी जिल्हा प्रमुख अनिल जगताप, किसान सेना जिल्हाप्रमुख परमेश्वर सातपुते, महिला जिल्हाप्रमुख संगीता चव्हाण, जिल्हा समन्वयक जयसिंग चुंगडे, जिल्हा सचिव वैजिनाथ तांदळे, दिलीप गोरे, जिल्हा संघटक नितीन धांडे, उप-जिल्हाप्रमुख गणेश वरेकर, आशिष मस्के, तालुकाप्रमुख गोरख सिंघण, रतन गुजर, शहर प्रमुख सुनील सुरवसे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला.

या वेळी जयदत्त क्षीरसागर म्हणाले, शिवसंपर्क अभियानाच्या माध्यमातून लोकांच्या समस्या जाणून घेणे व त्या सोडविणे हा उद्देश आहे. अडचणी असतानाही राज्याची विस्कटलेली घडी पुन्हा नीट करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे प्रयत्न करीत आहेत. संभाव्य अडचणींवर मात करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करणे गरजेचे आहे. संकटे कितीही आली तरी विकासाची साखळी पुढे न्यावीच लागते.

पीक विम्याचा लाभ थेट शेतकऱ्यांना कसा होईल हे पाहणे गरजेचे आहे. पाणीपुरवठा बंधारे, रस्ते, विजेचा प्रश्न असे अनेक प्रस्ताव दाखल करण्यात आलेले आहेत. मुख्यमंत्री ग्रामसडकचेही अनेक प्रस्ताव मी स्वतः दाखल केलेले आहेत. आता नवीन दोन महसूल मंडळे तयार झाली आहेत, त्यामुळे अनेक प्रश्न सुटतील. आपण दाखल केलेले प्रस्ताव मंजूर झाले असून, यावर काही जण आयत्या पिठावर रेघोट्या मारण्याचा प्रयत्न करीत आहेत. शिवसंपर्क अभियानाच्या माध्यमातून जनतेच्या प्रश्नांवर शिवसैनिकांनी सतर्क राहणे गरजेचे आहे. सत्तेत असो वा नसो विकासाची प्रक्रिया चालूच राहील, चमकणारी वस्तू सोनेच आहे असे नसते हे आता सिद्ध झाले आहे. अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. कार्यकर्त्यांच्या उत्साहाने मलादेखील शक्ती मिळते. यापुढे प्रत्येक गावच्या प्रश्नांचा आढावा घेऊन ते सोडविण्यासाठी निश्चित प्रयत्न केले जातील, असेही ते म्हणाले.

या वेळी नगरसेवक शुभम धूत, विठ्ठल बहीर, मनेष भोस्कर, दत्ता काशिद, अर्जुन नलावडे, कालिदास नवले, मुकेश भोकरे, अशोक सोळंके, किशोर पिसाळ, पांडुरंग भोसकर यांच्यासह जिल्हा शिवसेनेचे सर्व आजी-माजी पदाधिकारी, विभागप्रमुख, उप-विभागप्रमुख, शाखाप्रमुख, शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

160721\16bed_1_16072021_14.jpg

१५ जुलै रोजी बीड तालुक्यातील रूई (लिंबा) येथे शिवसंपर्क अभियानाचा शुभारंभ माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या हस्ते झाला. याप्रसंगी त्यांनी मार्गदर्शन केले.