शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारले केले महत्त्वाचे आवाहन
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
4
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
5
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
6
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
7
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
8
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
9
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
10
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
11
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
12
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
13
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
14
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
15
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
16
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
17
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
18
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
19
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
20
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी

उसाच्या वाढत्या शेतीमुळे अंबाजोगाईत वाढला बिबट्याचा वावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2018 11:41 IST

अंबाजोगाई उपविभागात बिबट्याचा वावर असल्याच्या घटना सातत्याने समोर येऊ लागल्या आहेत. उसाच्या वाढत्या शेतीमुळे व रानडुक्कर हे बिबट्याचे आवडते भक्ष्य असल्याने तो दिसू लागल्याच्या अनेक घटना समोर आल्या. जंगल सधन न राहिल्याने ऊसाच्या फडाचा आधार घेण्याशिवाय त्याला पर्याय राहिला नाही ही बाब समोर आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअंबाजोगाई : अंबाजोगाई उपविभागात बिबट्याचा वावर असल्याच्या घटना सातत्याने समोर येऊ लागल्या आहेत. उसाच्या वाढत्या शेतीमुळे व रानडुक्कर हे बिबट्याचे आवडते भक्ष्य असल्याने तो दिसू लागल्याच्या अनेक घटना समोर आल्या. जंगल सधन न राहिल्याने ऊसाच्या फडाचा आधार घेण्याशिवाय त्याला पर्याय राहिला नाही ही बाब समोर आली आहे.

दोन दिवसांपूर्वी लाडेवडगाव तर पाच दिवसांपूर्वी सोनहिवरा परिसरात बिबट्या दिसल्याची बाब समोर आली. वर्षभरापूर्वी अंबाजोगाई तालुक्यातील येल्डा परिसरातही खुद्द वनाधिकाऱ्यांनी बिबट्या पाहिला होता. त्या बिबट्याचे छायाचित्रही घेण्यात आले. अंबाजोगाई, परळी, धारूर, आडस या परिसरात वनविभागाचे मोठे जंगल आहे. या जंगलात बिबट्या, तरस व इतर वन्य प्राणी मोठ्या प्रमाणात आहेत. निसर्गनिर्मित अन्नसाखळीमध्ये प्रत्येक जीव परस्परांवर अवलंबून असतो. मात्र, या अन्नसाखळीत बाधा येऊ लागल्याने जंगलातील प्राणी इतरत्र आसरा घेऊ लागले आहेत. जंगले राहिली तर अन्नसाखळी पूर्ववत सुरू राहिल व त्या प्राण्याचा त्रास गावांना उद्भवणार नाही. गेल्या आठवडयात दिसलेला बिबट्या फक्त इकडून तिकडे पळताना दिसला. त्याने कुठेही हल्ला केला नाही अथवा तो मानवी वस्तीकडे फिरकलाही नाही. रानडुक्कर हे बिबट्याचे आवडते खाद्य. सध्या उसाच्या वाढत्या फडांमुळे रानडुक्करांची संख्या वाढली आहे. जंगलातली रानडुकरे उसाच्या फडात आली. आपल्या शिकारीच्या शोधात बिबट्याही उसाच्या फडाचा आश्रय घेऊ लागला आहे. त्यामुळे त्याचे दर्शन वारंवार होऊ लागले आहे.प्राणीगणनेत बिबट्यांची संख्या समोर येईलदरवर्षी बुद्ध पौर्णिमेला वनविभागाच्या वतीने प्राणी गणना केली जाते. या गणनेत जंगलात कोणते प्राणी किती आहेत याची नोंद घेतली जाते. गेल्यावर्षी झालेल्या नोंदीत बिबट्या दिसला मात्र गणनेच्या वेळी तो इतर जिल्ह्याच्या हद्दीत गेल्यामुळे त्याची नोंद झाली नाही. यावर्षीच्या प्राणी गणनेत अशी नोंद पुन्हा होईल असेही वरवडे म्हणाले.

बिबट्याला घाबरू नका - वन विभागबिबट्या हा प्राणी सहसा मनुष्यावर हल्ला करीत नाही. त्याचा पाठलाग करू नका अथवा छेडू नका. उलट बिबट्याचा शेतकºयांना फायदाच होईल. हरीण, रानडुक्कर शेतींची नासधूस करणाºया प्राण्यांना आळा बसेल. जर बिबट्याने पाळीव प्राण्यावर हल्ला केला तर त्याची नुकसानभरपाई शासनाच्या वतीने दिली जाते. मात्र, असा बिबट्या आढळल्यास वनविभागाशी संपर्क साधल्यास त्याचा बंदोबस्त केला जातो, अशी माहिती वन परिमंडळ अधिकारी शंकर वरवडे यांनी दिली.

टॅग्स :Beedबीडleopardबिबट्याforest departmentवनविभागMarathwadaमराठवाडाFarmerशेतकरीagricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्र