शहरं
Join us  
Trending Stories
1
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
2
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
3
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
4
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
5
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
6
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
7
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
8
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
9
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
10
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
11
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
12
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
13
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
14
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
15
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
16
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
17
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
18
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
19
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
20
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
Daily Top 2Weekly Top 5

‘मागेल त्याला शेततळे’ योजनेचे अनुदान अडकले लालफितीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:28 IST

बीड : मागील सरकारच्या काळात ‘मागेल त्याला शेततळे’ योजनेचा लाभ मोठ्या प्रमाणात जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी घेतला होता. मात्र, शेततळे पूर्ण ...

बीड : मागील सरकारच्या काळात ‘मागेल त्याला शेततळे’ योजनेचा लाभ मोठ्या प्रमाणात जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी घेतला होता. मात्र, शेततळे पूर्ण करूनदेखील अनुदानाची रक्कम न मिळाल्यामुळे अनेक शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती कोलमडली आहे.

मागील सरकारच्या काळात ‘मागेल त्याला शेततळे’ ही योजना जलसंधारण व दुष्काळ निर्मूलनासाठी राबविण्यात आली होती. योजना सुरू झाल्यापासून जिल्ह्यात ९ हजार ७७४ शेतकऱ्यांनी आपल्या शेतात ही योजना राबवून शेततळे तयार केले आहे. या योजनेमुळे मोठा फायदादेखील शेतकऱ्यांना झाला असून, फळबाग लागवड क्षेत्रातदेखील वाढ झाल्याचे चित्र आहे. उत्पादनातदेखील वाढ झाल्याचे शेतकनी सांगितले. शेतकऱ्यांनी ही योजना शेतात राबविल्यानंतर प्रत्येकी ४० ते ५० हजार रुपये अनुदान आकारमानानुसार मिळते. जिल्ह्यात या योजनेचा लाभ ९ हजार ७७४ शेतकऱ्यांनी घेतला आहे. त्यापैकी ९ हजार २१८ शेतकऱ्यांना अनुदानाचे वाटपदेखील करण्यात आले आहे. मात्र, ५५६ शेतकऱ्यांचे अनुदान रखडले असून, अनेकांनी कर्ज काढून, उसने पैसे घेऊन शेततळे केले आहे. ५५६ शेतकऱ्यांच्या अनुदानापोटी कृषी विभागाकडून २८४ कोटी रुपयांची मागणी वेळोवेळी शासनाकडे करण्यात आली आहे. मात्र, निधी उपलब्ध करून न दिल्यामुळे शेतकरी अद्यापदेखील अनुदानाच्या लाभापासून वंचित आहेत. त्याचप्रकारे इतर काही जुन्या राबविलेल्या योजनांसंदर्भातदेखील परिस्थिती अशीच असून, तात्काळ योजनेचे अनुदान अदा करावे, अशी मागणी शेतकऱ्यांमधून केली जात आहे.

सर्वाधिक संख्या पाटोदा तालुक्यातील

शेततळ्याचे अनुदान रखडलेल्या सर्वाधिक म्हणजेच १८९ शेतकऱ्यांची संख्या ही पाटोदा तालुक्यातील आहे. तालुक्याचा बहुतांश भाग हा डोंगराळ आहे. त्यामुळे पाणी साठवणूक होण्यासाठी या योजनेचा लाभ मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी घेतला होता. अनुदान रखडल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी दिसून येत आहे.

योजना पुन्हा प्रभावीपणे राबविण्याची गरज

‘मागेल त्याला शेततळे’ योजनेमुळे जिल्ह्यात फायदा झाला आहे. त्यामुळे या शासनाच्या काळातदेखील ही योजना प्रभावीपणे राबवावी, जेणेकरून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना याचा फायदा होईल व जलसंचय होण्यास मदत होईल, त्यामुळे उत्पादनातदेखील वाढ होईल, अशी मागणी प्रगतिशील शेतकरी शिवराज जगताप यांनी केली आहे.

प्रतिक्रिया

‘मागेल त्याला शेततळे’ योजनेेच्या देयकासंदर्भात शासनाकडे निधी मागणी केली आहे. मार्च महिन्यात निधी मिळेल. निधी आल्यानंतर तात्काळ प्रलंबित शेतकऱ्यांचे अनुदान वर्ग केले जाईल.

डी.जी. मुळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, बीड