शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
2
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
3
"मी पुन्हा सांगतो, भारताकडे एक कमकुवत पंतप्रधान", H-1B व्हिसा प्रकरणावरून राहुल गांधींचा हल्लाबोल
4
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा H-1B व्हिसा बॉम्ब होणार बॅकफायर, अमेरिकेचंच होणार नुकसान, तर भारताचा...
6
Navratri 2025: नवरात्रीत घट बसवण्याआधी देवघरात 'हे' बदल केले का? नसेल तर आजच करा
7
तुमचा पुण्यातील रोजचा प्रवास ३५ किमी आहे, तर तुम्ही कोणती स्कूटर, मोटरसायकल घ्यावी? 
8
परदेशात फिरायला जाणाऱ्या प्रवाशांनी शोधली 'ही' नवीन युक्ती; नेमका काय आहे 'फ्लाइंग नेकेड ट्रेंड'?
9
आयडियाची कल्पना! "मला १०० रुपये द्या ना...", गाडी खरेदी करण्यासाठी महिलेचा 'कारनामा'
10
ट्रम्प यांच्या एका निर्णयाने अमेरिकेतील भारतीयांची धाकधूक वाढली; मायक्रोसॉफ्टने कर्मचाऱ्यांना पाठवला तातडीचा ईमेल
11
सर्वार्थ सिद्धी योगात सर्वपित्री अमावास्या २०२५: श्राद्ध विधीचा शुभ मुहूर्त; महत्त्व-मान्यता
12
परदेशी पाहुण्यांशी असलं वागणं शोभतं का? 'टपोरी' मुलाच्या Viral Video वर नेटकरी संतापले
13
Navratri 2025: नवरात्रीला घटस्थापना कशी करावी? जाणून घ्या साहित्य, मुहूर्त आणि शास्त्रोक्त विधी!
14
निलेश साबळेनेच मला बाईचं कॅरेक्टर करायला सांगितलं होतं, भाऊ कदमचा खुलासा
15
भूपतीचा शस्त्रसंधीचा प्रस्ताव, जगन म्हणतो शस्त्र ठेवणार नाही ! माओवादी संघटनेतील वाद चव्हाट्यावर
16
अमेरिकेत करिअरचे दार उघडणारा H-1B व्हिसा काय आहे? कोणाला मिळतो? जाणून घ्या संपूर्ण माहिती...
17
पुढच्या आठवड्यात येणार IPO चा पाऊस, २२ आयपीओंमध्ये मिळणार गुंतवणूकीची संधी; कोणत्या आहेत कंपन्या?
18
हृदयस्पर्शी! "आई-वडिलांना सोडून मुलगी गेली लंडनला"; ८० वर्षांचे आजोबा ट्रेनमध्ये विकतात पदार्थ
19
हाफिज सईदने दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचे नाव बदलले; आता 'अल-मुराबितुन' नावाने पैसे गोळा करणार
20
GST Rate Cut: ५०% सूट, ८०% सूट... कपडे आणि बुटांच्या दुकांनावर आता अशा ऑफर्स दिसणार नाहीत! GST कपातीशी संबंध काय?

Drought In Marathwada : पिके हातची गेली, स्थलांतर वाढणार, गाव ओस पडणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2018 12:12 IST

दुष्काळवाडा : अस्मानी संकटामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या धारूर तालुक्यातील सिंगनवाडी गावची ही स्थिती. 

- अनिल महाजन, सिंगनवाडी, ता. धारूर, जि. बीड

अत्यल्प पावसामुळे खरिपाची पिके हातची गेली. आता रबीची आशा पूर्णत: मावळली आहे. हाताला काम मिळण्यासाठी यावर्षी स्थलांतर करावे लागणार आहे. त्यामुळे पुढील आठ महिने गाव ओस पडणार आहे. अस्मानी संकटामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या धारूर तालुक्यातील सिंगनवाडी गावची ही स्थिती. 

चोहोबाजूने डोंगरात वसलेल्या सिंगनवाडीचे क्षेत्रफळ ५२० हेक्टर आहे. यात ४८८ हेक्टर क्षेत्र पेरणीयोग्य आहे. शेतकरी कापूस, सोयाबीन, बाजरी, हायब्रीडचे पीक प्रामुख्याने घेतात. फक्त दहा टक्के शेती ओलिताखाली आहे. यावर्षी पाऊस न झाल्याने कापूस, सोयाबीन, बाजरीची पिके हातची गेली आहेत. कशीबशी अवघी ३० टक्के पिके हातात आली. खर्चदेखील निघणार नाही. त्यामुळे शेतकरी हैराण होऊन गेले आहेत. रबीचे क्षेत्र फक्त दहा टक्के आहे. पाऊसच नसल्याने पुढचे दिवस कसे जातील याची चिंता सर्वांना सतावत आहे. त्यामुळे खरिपाचे पीक घ्यायचे आणि ऊस तोडणीसाठी जायचे, असे सूत्र इथल्या अनेक शेतकरी कुटुंबांचे आहे. 

तालुक्यातील ७० टक्के गावांतील शेतकरी दरवर्षी ऊसतोडीसाठी महाराष्ट्र  व कर्नाटकात जातात. यावर्षी तर दुष्काळी स्थिती असल्यामुळे ऊस तोडणीला जाणाऱ्यांचे प्रमाण आणखी वाढणार आहे. त्यामुळे अख्खे गाव ओस पडणार आहे. सिंगनवाडीलगत असलेल्या नदीपात्रात बोअरमधून गावातील सार्वजनिक विहिरीत पाणी आणले जाते. या पाण्यावरच ग्रामस्थांची तहान भागते. यावर्षी त्याचीही शाश्वती राहिली नाही. पावसाअभावी टंचाईचा प्रश्न दिवसेंदिवस उग्र होत आहे. माणसांना पाणी मिळणे दुरापास्त असताना जनावरांना पाणी कोठून आणावे हा गंभीर प्रश्न आहे. त्यामुळे पशुधन मातीमोल भावात विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.

सीताफळाचे उत्पादन कमीचया दिवसात सीताफळ उत्पादनातून थोडी फार मजुरी उपलब्ध व्हायची. रोज गावात सीताफळ खरेदीसाठी फडी लागायची. दोन-तीन टेम्पो सीताफळाची निर्यात व्हायची; मात्र अपुऱ्या पावसामुळे या उत्पादनातही मोठी घट झाली आहे. त्यामुळे दिवाळीपूर्वीच स्थलांतर करण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे.

पावसाअभावी श्रमदानाचा ‘वॉटर कप’ रिताचगाव परिसरात नेहमी हिरवाईने नटणारे डोंगर उजाड झाले आहेत. या गावाने पाणी फाऊंडेशनच्या ‘वॉटर कप’ स्पर्धेत श्रमदानातून जलबचतीची कामे केली. यावरच आज हे गाव थोडे फार तरले आहे. मात्र, या काळात केलेली कामे कोरडीठाक आहेत. पाऊस नसल्याने श्रम करूनही निसर्गाने साथ न दिल्याने गावाला पाणीदार होण्यासाठी पुढील पावसाळ्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे. 

६२९ - तालुक्याची पावसाही वार्षिक सरासरी ६७६ - मिमी २०१७ ला झाला पाऊस २६६ - मिमी यावर्षी झालेला पाऊस ५२० - हेक्टर सिंगनवाडीचे क्षेत्र ४८८ - हेक्टर पेरणीयोग्य क्षेत्र 

६० - टक्के तूट उत्पन्नात धारूर तालुक्यात अत्यंत कमी पावसामुळे गंभीर परिस्थिती असून, प्रमुख पीक कापूस व सोयाबीनच्या उत्पादनात ६० ते ६५ टक्के तूट आली आहे. खरिपाचे पीक धोक्यात आल्याने रबी पेरणीचे प्रमाण घटणार आहे. - बी. एम. पाटील, तालुका कृषी अधिकारी, धारूर 

बळीराजा काय म्हणतो?यावर्षी पाऊस नसल्याचे सोयाबीनची वाढ झाली नाही. उत्पन्नात सत्तर टक्के घट होणार असून, केलेला खर्च निघणे अवघड झाले. सध्या शेतात उभे सोयाबीन पूर्णपणे वाळून गेले आहे. पुढे काय करावे हे सांगणे अवघड झाले आहे. - नंदकुमार भोसले, सरपंच 

यावर्षी झालेल्या अत्यल्प पावसामुळे सोयाबीन, कापूस या पिकांना पूर्णपणे फटका बसला आहे. उसावर थोडीफार मदार होती, तर हुमणीमुळे जागेवरच ऊस जळाला आहे. शेतकरी चोहोबाजूंनी संकटात सापडला आहे. - लिंबराज भोसले 

दुष्काळावर कायमस्वरुपी मात करण्यासाठी वॉटर कप स्पर्धेत आम्ही दिवस-रात्र काम केले. श्रमदानातून केलेले सीसीटीडीप सीसीटी ठणठणीत कोरडे आहेत. उत्पन्न तर सर्वच घटले आहे, पोटाची खळगी भरण्यासाठी गावालाच स्थलांतर करावे लागणार आहे. - संतोष भोसले 

टॅग्स :droughtदुष्काळMarathwadaमराठवाडाagricultureशेतीFarmerशेतकरी