शहरं
Join us  
Trending Stories
1
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
2
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
3
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
4
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
5
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
6
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
7
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
8
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
9
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
10
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
11
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
12
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
13
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
14
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
15
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
16
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
17
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
18
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
19
परतूरचा 'विकासपुरूष' हरपला! माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
20
Top Marathi News LIVE Updates: महाराष्ट्र दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे मुख्यमंत्री फडणवीसांना खास पत्र
Daily Top 2Weekly Top 5

बिहारमध्ये वाढलेल्या मतदानाचा अर्थ काय, कोणता फॅक्टरमुळे वाढलं मतदान? प्रशांत किशोरांनी मांडलं गणित

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2025 16:14 IST

Bihar Election 2025: बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात प्रचंड मतदान झाले. वाढलेल्या मतदानाचे वेगवेगळे अर्थ काढले जाताहेत. अंदाज मांडले जाताहेत. याबद्दल प्रशांत किशोर यांनी त्यांचे गणित मांडले आहे. 

बिहारमध्ये पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडले. पहिल्या टप्प्यात विक्रमी मतदान पार पडले. मागील अनेक निवडणुकांत इतकं मतदान झालेले नाही. त्यामुळे याचे वेगवेगळे राजकीय अर्थ काढले जात आहे. अंदाज मांडले जात आहे. या वाढलेल्या मतदानाच्या टक्क्याबद्दल प्रशांत किशोर यांनाही विचारण्यात आले. त्यांनी टक्का का वाढला आणि कोणता फॅक्टर महत्त्वाचा ठरला याबद्दलचे गणित मांडले.  

प्रशाांत किशोर म्हणाले, "३० वर्षांमध्ये नाही, स्वातंत्र्यानंतर बिहारमध्ये झालेल्या निवडणुकांमधील हे सर्वात जास्त मतदान आहे. यातून दोन गोष्टी दिसत आहे की, पहिले म्हणजे जी गोष्ट मी मागील एक-दोन वर्षांपासून सांगत आहे की, बिहारमध्ये सात टक्क्यांहून अधिक जनतेला बदल हवा आहे. मागील २५-३० वर्षात राजकीय पर्यायाअभावी राजकारण आणि निवडणुकीबद्दल उदासीनता तयार झाली होती. लोकांकडे पर्याय नव्हता. आता जन सुराज्य पक्ष आल्यामुळे लोकांना पर्याय मिळाला आहे. वाढलेला जो मतांचा टक्का आहे, बदल घडवण्यासाठी मतदान झाले आहे. 

कोणता फॅक्टर ठरला महत्त्वाचा

"दुसरा मुद्दा म्हणजे जे स्थलांतरित कामगार आहेत, जे छट सणानंतर थांबलेले आहेत. त्यांनी स्वतःचे, कुटुंबाचे आणि मित्रपरिवाराला मतदान करायला लावले आहे. त्याने सगळ्यांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. जितके लोक म्हणत होते की, महिलांना दहा हजार दिले, त्यामुळे आम्ही जिंकू. पण, या निवडणुकीत महिला मतदार आहेच, पण त्यापेक्षा मोठा स्थलांतरित मजूर हा महत्त्वाचा फॅक्टर आहे", असे विश्लेषण प्रशांत किशोर यांनी केले. 

२ कोटी १० लाखांहून अधिक मतदान

"तुम्ही बघाल की, १४ नोव्हेंबरला इतिहास लिहिला जाईल. मोठंमोठे राजकीय पंडित हे सांगत नव्हते की, यावेळी इतक्या मोठ्या प्रमाणात मतदान होईल. २ कोटी १० लाखांहून अधिक मतदारांनी मतदान केलं आहे. अंदाज मांडणारे किती लोकांना भेटले असतील. कुणालाही माहिती नाही की, कुणी कुणाला मतदान केले. १४ तारखेला मतमोजणी होईल आणि तेव्हाच कळेल", असे प्रशांत किशोर म्हणाले. 

"इथे कोणीही सुरक्षित नाहीये. कायद्याचे राज्य नाहीये. ज्याची लाठी, त्याची म्हैस. जे आतापर्यंत लोकांना सहन करावं लागत होतं. निवडणुकीच्या काळात मंत्री आणि नेत्यांना त्याला सामोरे जावे लागले आहे", असेही प्रशांत किशोर यांनी सांगितले.

English
हिंदी सारांश
Web Title : Bihar's Increased Voter Turnout: Prashant Kishor Explains the Factors

Web Summary : Prashant Kishor attributes Bihar's record voter turnout to a desire for change and the influence of migrant workers. He highlights voter frustration with limited political options and the significant impact of returning laborers participating in the election process.
टॅग्स :Bihar Assembly Election 2025बिहार विधानसभा निवडणूक २०२५Prashant Kishoreप्रशांत किशोरNitish Kumarनितीश कुमारTejashwi Yadavतेजस्वी यादव