शहरं
Join us  
Trending Stories
1
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
2
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
3
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
4
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
5
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
6
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
7
तुम्ही तर रक्ताचे होतात, मग का असं केलं?; छगन भुजबळांचा राज ठाकरेंवर पलटवार
8
मोदी जे बोलतात, त्यातलं १ टक्काही खरं नाही, त्यांचा आत्मविश्वास ढळलाय"; शरद पवारांची टीका
9
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
10
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
11
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
12
सनरायझर्स हैदराबादविरुद्ध गुजरात टायटन्स सामना रद्द? समोर आले मोठे अपडेट्स
13
स्वत: फुटबॉलपटू असलेली आईच बनली लेकाची कोच आणि म्हणून.. सुनील छेत्रीच्या फुटबॉलप्रेमाची खास गोष्ट!
14
मुलगी हरवल्याप्रकरणी चौकशीसाठी नेलं अन् कोठडीतच तरूणाचा मृत्यू, नेमकं काय झालं?
15
"मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, गोहत्या करणाऱ्यांना उलटे लटकवून सरळ करू", अमित शाहांचा इशारा
16
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
17
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान
18
"यासारखी अमानुष गोष्ट नाही..."; पंतप्रधान मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
19
‘मी त्यांच्यासोबत, जर स्वाती मालिवाल यांना वाटलं तर…’ गैरवर्तन प्रकरणी प्रियंका गांधी यांचं मोठं विधान 
20
विकी कौशलची 'ही' इच्छा अजूनही अपूर्णच! म्हणाला, 'कधी करेन माहित नाही पण...'

पाऊस गायब झाल्याने दुबार पेरणीचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 4:23 AM

लोकमत न्यूज नेटवर्क कडा : आष्टी तालुक्यात यावर्षी रोहिणी व मृग नक्षत्राच्या प्रारंभी चांगला पाऊस झाला. शेतकरीवर्गाने लगबगीने खरिपाच्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कडा : आष्टी तालुक्यात यावर्षी रोहिणी व मृग नक्षत्राच्या प्रारंभी चांगला पाऊस झाला. शेतकरीवर्गाने लगबगीने खरिपाच्या पेरण्या उरकून घेतल्या. मात्र, त्यानंतर पाऊस गायब झाला आहे. आर्द्रा नक्षत्र सुरू होऊनही पाच दिवस उलटले तरी पाऊस नाही. त्यामुळे पिके सुकू लागली आहेत. पावसाने ओढ दिल्याने शेतकरी चिंतातूर झाला आहे.

पावसाळ्याच्या सुरुवातीला म्हणजे मृग नक्षत्रात पेरणीयोग्य पाऊस झाला. त्यामुळे तालुक्यात तूर, उडीद, मूग, बाजरी, सोयाबीन पिकांची मोठ्या प्रमाणावर पेरणी करण्यात आली. मृग नक्षत्राच्या सुरुवातीलाच पाऊस झाल्याने शेतकरीवर्ग खुशीत होता. मात्र, पेरणीनंतर पावसाने दडी मारली आहे. पावसाअभावी कोवळ्या पिकांनी माना टाकल्या असून, पिके करपून चालली आहेत.

काही ठिकाणी पिके करपून गेली आहेत. येत्या चार - पाच दिवसात पाऊस आला नाही तर पिकांची राखरांगोळी झाल्याशिवाय राहणार नाही. साठ हजार हेक्टर क्षेत्रावर दुबार पेरणीचे संकट ओढावण्याची चिन्हे आहेत.

..

६० हजार क्षेत्रावर पेरणी

सध्या तालुक्यात कृषी विभागाकडून आवाहन करूनही काही शेतकऱ्यांनी खरिपाच्या पेरण्या केल्या आहेत. ९५ हेक्टरपैकी ६० हजार हेक्टर क्षेत्रावर खरिपाच्या पेरण्या झाल्या आहेत. उर्वरित शेतकऱ्यांंना चांगली ओल असेल तरच पेरण्या करण्याचे आवाहन तालुका कृषी अधिकारी राजेंद्र सुपेकर यांनी केले आहे.