शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

पाचपेक्षा जास्त रुग्ण आढळणाऱ्या गावात कोरोना चाचणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:21 IST

बीड : ज्या गावात पाचपेक्षा जास्त रुग्ण आढळतील, त्या गावातील १०० टक्के नागरिकांच्या आरटीपीसीआर टेस्ट करून घ्यावी तसेच ...

बीड : ज्या गावात पाचपेक्षा जास्त रुग्ण आढळतील, त्या गावातील १०० टक्के नागरिकांच्या आरटीपीसीआर टेस्ट करून घ्यावी तसेच कोणत्याही गावात एकही रुग्ण किंवा गावात, घरात गृहविलगीकरण राहणार नाही, याची दक्षता घ्यावी. सर्व पॉझिटिव्ह रुग्ण कोविड सेंटरमध्येच असणे आवश्यक असल्याचे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी दिले. जिल्ह्यातील काही तालुक्यांत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यानुसार, जिल्हाधिकाऱ्यांनी प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करण्याबाबत सक्त सूचना आदेशाद्वारे दिल्या आहेत. तरीही प्रतिबंधात्मक उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याचे निदर्शनास आल्याने ग्रामीण भागात पंचायत समित्या आणि ग्रामपंचायतींनी सजग राहण्याबाबत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी कडक सूचना दिल्या आहेत.

सर्व गावांमध्ये ग्राम दक्षता समित्यांवर जबाबदारी सोपवून गावात कोविड-१९ प्रतिबंधात्मक नियमांची अंमलबजावणी सर्व नागरिकांकडून करून घ्यावी. रुग्ण असलेल्या गावात ग्रामसेवकाने मुख्यालयी राहून आशा, अंगणवाडी कार्यकर्त्यांकडून शंभर टक्के कुटुंबांचे सर्वेक्षण करून घ्यावे. सर्दी, खोकला, ताप, अंगदुखी असणाऱ्या रुग्णांची माहिती घेऊन त्यांची कोरोनाविषयक तपासणी करून संदर्भीय उपचारासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तत्काळ कळवावे. सर्व गावांत कोरोना प्रतिबंधात्मक भरारी पथकांची निर्मिती करून नियमांचे पालन न करणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाईच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

आता लग्न सोहळ्यांवरही नजर

तालुक्यातील सर्व गावांमध्ये ३० ऑगस्टपर्यंत संभाव्य लग्न समारंभाची माहिती घ्यावी. गावाचे नाव, लग्न असलेल्या घरातील कुटुंब प्रमुखाचे नाव, लग्नाची तारीख व ठिकाण आदी माहिती जिल्हा परिषद व पंचायत समितीकडे दोन दिवसांंत सादर करावी, असे कळविण्यात आले आहे. या लग्न समारंभासाठी उपस्थित राहणाऱ्यांची कोरोना चाचणी बंधनकारक असल्याबाबत संबंधितांना सूचना देण्याचेही निर्देश दिले आहेत. लग्न समारंभाच्या ठिकाणी जाऊन उपस्थितीबाबत खात्री स्वतः सरपंच व ग्रामसेवकांनी करावी. नमूद संख्येपेक्षा जास्त उपस्थिती दिसून आल्यास संबंधितांवर फौजदारी व दंडात्मक कारवाई करावी, असे आदेश देण्यात आले आहेत.