शहरं
Join us  
Trending Stories
1
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
2
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
3
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
4
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
5
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
6
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
7
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
8
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
9
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
10
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
11
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
13
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
14
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
15
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
16
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
17
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
18
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
19
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
20
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
Daily Top 2Weekly Top 5

सौताड्याच्या भूमिपुत्राचा काश्मीर ते कन्याकुमारी सायकल प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:34 IST

पाटोदा : प्रदूषणमुक्त भारत व इंधन बचतीचा नारा देत काश्मिरपासून ते कन्याकुमारीपर्यंत सायकलवर निघालेल्या सौताडा येथील रहिवासी व जामखेड ...

पाटोदा : प्रदूषणमुक्त भारत व इंधन बचतीचा नारा देत काश्मिरपासून ते कन्याकुमारीपर्यंत सायकलवर निघालेल्या सौताडा येथील रहिवासी व जामखेड येथे व्यवसायानिमित्त स्थायिक असलेले डॉ. पांडुरंग सानप व जामखेड येथील एक मित्र या दोघांनी तेरा दिवसात २८५० किलोमीटर अंतर पार केले असून अद्याप ९५० किलोमीटर अंतराचा प्रवास बाकी आहे. चार दिवसात हे अंतर पूर्ण करत ते कन्याकुमारीला पोहचणार आहेत.

काश्मीरमधील थंड हवा तर कर्नाटक व तामिळनाडू येथील उष्ण हवेचा सामना करत त्यांनी आतापर्यंतचा प्रवास केला आहे. प्रदूषणमुक्त भारत, इंधन बचत हा त्यांचा नारा आहे. हा प्रवास दहा राज्यांमधून होत आहे. आता शेवटी एक तामिळनाडू राज्य बाकी आहे. या राज्यात तापमान जास्त आहे. काश्मीरमध्ये फार थंडी होती. अणि राजस्थान, कर्नाटकात सर्वाधिक तापमानाची नोंद अशा वातावरणाशी वातावरणाशी जुळवून घेत दोघांचा सायकल प्रवास सुरू आहे.

जामखेड येथील वैद्यकीय क्षेत्रातील डॉ. पांडुरंग सानप व केमिस्ट भास्कर भोरे हे दोन साहसवीर ‘सायकल रायडिंग’ अर्थात सायकलवरून प्रवास पर्यावरण संवर्धन व इंधन बचतीचा संदेश देण्यासाठी तब्बल ४००० किलोमीटरचा प्रवासाचे ध्येय ठेवून काश्मीर ते कन्याकुमारी असा देशांच्या दोन टोकांचा प्रवास करत जनजागृती करत आहेत.

के २ के म्हणजेच काश्मीर ते कन्याकुमारी अशी त्यांची सायकल यात्रा असून १४ मार्च रोजी सायंकाळी जामखेड शहरात हिरवा झेंडा दाखवून या सायकल स्वारांना निरोप देण्यात आला होता. डॉ.पांडुरंग सानप यांनी आतापर्यंत आयर्न मॅन स्पर्धा नियोजित वेळेपेक्षा एक तास आगोदर पूर्ण करत इतिहास रचला होता. तसेच दरवर्षी गडकिल्ल्यांवर सायकलवर जात असतात. आता ते पर्यावरण रक्षणाचा व इंधन बचतीचा संदेश देणार आहेत. दररोज सोशल मीडियावर किती प्रवास केला? कोठे आहेत ? हा संदेश देतात त्यांना मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहनही मिळत आहेत.

===Photopath===

020421\2620popat raut_img-20210402-wa0081_14.jpg