शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

२० पैकी ८ रेल्वे गाड्या सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:23 IST

परळी -येथील रेल्वे स्थानकातून नऊ महिन्यापूर्वी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद करण्यात आलेल्या एकूण २० रेल्वे गाड्यांपैकी आठ रेल्वे गाड्या सुरू ...

परळी -येथील रेल्वे स्थानकातून नऊ महिन्यापूर्वी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद करण्यात आलेल्या एकूण २० रेल्वे गाड्यांपैकी आठ रेल्वे गाड्या सुरू करण्यात आलेल्या आहेत तथापि १२ रेल्वे गाड्या अद्यापही धावत नसल्याने सर्वसामान्य प्रवाशांची गैरसोय होत असून खिशाला फटका बसत आहे. पॅसेंजर रेल्वे गाड्या अद्याप ही सुरू केले नसल्याने स्पेशल रेल्वेने तिप्पट भाडे मोजावे लागत आहे.

परळी रेल्वेस्थानकातून नांदेड- बंगळूरू, बंगळूरू-नांदेड, काकीनाडा-शिर्डी, शिर्डी- काकीनाडा, नांदेड-पनवेल, पनवेल-नांदेड, औरंगाबाद-हैदराबाद , हैदराबाद- औरंगाबाद या स्पेशल एक्सप्रेस रेल्वे गाड्या परळी रेल्वे रुळावरून सुरळीत धावत आहेत. या रेल्वेगाड्यांना आरक्षणाशिवाय प्रवास नाही. प्रवाशांना आरक्षण तिकीट घेऊन प्रवास करण्याची वेळ आली आहे व नऊ महिन्यानंतरही पॅसेंजर गाड्या अद्यापही सुरू झाल्या नसल्याने प्रवाशांची तारांबळ उडत आहे. काही प्रवाशांना दुपारच्या वेळी परभणी, नांदेडकडे रेल्वे नसल्याने बसने जाण्याची वेळ आली आहे . पूर्णा-हैदराबाद ,हैदराबाद -पूर्णा ,मिरज- परळी, परळी- मिरज, अकोला-परळी, परळी-अकोला, आदिलाबाद -परळी, परळी आदिलाबाद, निझामाबाद- पंढरपूर, पंढरपूर- निझामाबाद, पूर्णा-परळी, परळी -पूर्णा पॅसेंजर रेल्वे गाड्या सुरू नसल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत असून आर्थिक फटका बसत आहे.

मोठ्या अंतरासाठी परळीहून हैदराबादला जाण्यासाठी नऊ महिन्यापूर्वी जनरलने १४५ रुपये लागायचे आता स्पेशल रेल्वेने रिझर्वेशन करून ३८५ रुपये द्यावे लागत आहेत. परळीहून पुण्याला जाण्यासाठी रेल्वेने जनरल स्लीपरचे २६० रुपये तिकीट होते तर आता ३५५ रुपये झाले आहे.

छोट्या अंतरासाठी रेल्वेने परळीहून परभणीला पूर्वी पंचवीस रुपये तिकीट लागत होते. आता एक्सप्रेस रेल्वेला पन्नास रुपये तिकीट द्यावं लागतं आहे. छोट्या अंतरावरील गावांना थांबा आता नसल्याने रेल्वे प्रवाशांची गैरसोय झाली असून छोट्या अंतरावरील गावांना आटो रिक्षाने येणे-जाणे करावें लागत आहे.

सर्वसामान्य प्रवासी पॅसेंजर रेल्वे बंद असल्या कारणाने त्रस्त आहेत. परभणी, गंगाखेड पॅसेंजर रेल्वे गाड्या चालू नसल्या कारणाने बस प्रवासामुळे खिशाला जास्त भुर्दंड बसत आहे. हैदराबादसारख्या लांब पल्याच्या पॅसेंजर चालू नसल्यामुळे सर्वसामान्य प्रवासी हैराण आहेत. परळी स्टेशनवरून पूर्वीप्रमाणे रेल्वेसेवा लवकरात लवकर सुरू व्हावी. अश्विन मोगरकर, व्यवसायिक परळी.

गेल्या नऊ महिन्यांपासून पॅसेंजर रेल्वे गाड्या चालू नसल्याने सर्वसामान्य प्रवाशांना रेल्वेने प्रवास करणे अशक्य झाले आहे, एक्सप्रेस रेल्वे गाड्यामुळे तिकीट जास्त लागत आहे, याचा रेल्वे प्रवासी संख्येवर मोठा परिणाम झाला आहे, पॅसेंजर रेल्वे गाड्या त्वरित चालू करणे आवश्यक आहे.

-जयंत वेताळ ,

कोरोना पूर्वी परळी रेल्वे स्थानकातून २० रेल्वे धावायच्या, आता ८ रेल्वे धावतात.