शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
4
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
5
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
6
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
7
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
8
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
9
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
10
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
11
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
12
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
13
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
14
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
15
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
16
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
17
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
18
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
19
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
20
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

शिरूर तालुक्यात आठ ग्रामपंचायतींसाठी १४९ उमेदवार निवडणूक रिंगणात, १०७ उमेदवारांची माघार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:48 IST

शिरूरकासार : शिरूरकासार तालुक्यात सध्या आठ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत असून, १४९ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आपले भवितव्य अजमावीत ...

शिरूरकासार : शिरूरकासार तालुक्यात सध्या आठ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत असून, १४९ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आपले भवितव्य अजमावीत आहेत. या निवडणुकीसाठी २५० नागरिकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते, तर २४६ अर्ज शिल्लक होते. शेवटच्या दिवशी १०७ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले.

तालुक्यातील रायमोहा, हाटकरवाडी, येवलवाडी, टाकळवाडी, सांगळवाडी, भानकवाडी, कान्होबाची वाडी, कोळवाडी या आठ ग्रामपंचायतींसाठी येत्या १५ जानेवारी २०२१ रोजी मतदान होणार आहे.

रायमोहा ग्रामपंचायतीमध्ये असणाऱ्या अकरा सदस्यसंख्येसाठी ४७ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी २४ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले. त्यामुळे तेथे २३ उमेदवार रिंगणात आहेत. हाटकरवाडीच्या ७ जागांसाठी ३० उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. त्यापैकी १४ जणांनी माघार घेतली. त्यामुळे तेथे १६ उमेदवार आपले भवितव्य अजमावीत आहेत. येवलवाडीच्या ९ सदस्यांसाठी ३४ उमेदवारी अर्ज होते. मात्र, १६ जणांनी माघार घेतल्याने तेथे १८ उमेदवार रिंगणात आहेत. टाकळवाडीच्या ९ जागांसाठी ३८ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते, त्यापैकी १७ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. त्यामुळे तेथे २१ उमेदवार आपले भवितव्य अजमावीत आहेत.

सांगळवाडीच्या ७ जागांसाठी २८ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी १३ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले. त्यामुळे तेथे १५ उमेदवार भवितव्य अजमावीत आहेत. भानकवाडीच्या ७ जागांसाठी १९ उमेदवारी अर्ज होते, तेथे ५ जणांनी माघार घेतली. त्यामुळे तेथे आता १४ उमेदवार लढत आहेत. कान्होबाची वाडीच्या ७ जागांसाठी २७ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी १३ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. तेथे १४ उमेदवार भवितव्य अजमावीत आहेत.

कोळवाडीच्या ७ जागांसाठी २७ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी ९ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले, त्यामुळे तेथे १८ उमेदवार भवितव्य अजमावीत आहेत. अशा एकूण ६४ जागांसाठी २४६ इच्छुक उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. मात्र, आता फक्त १४९ लोक निवडणूक रिंगणात आहेत. १०७ उमेदवारांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे. निवडणूक प्रक्रियेत आदर्श आचारसंहितेचे पालन करण्याचे आवाहन तहसीलदार श्रीराम बेंडे यांनी केले आहे.