या दिवसात अनेकांना जेवणही पचत नाही. जेवण न पचल्यामुळे रात्रीला झोपही येत नाही. उन्हाळ्यात रात्रीला हे पदार्थ सेवन केले तर चांगली झोप येऊ शकते. त्याची ही खास माहिती आपल्यासाठी.
भोपळा : भोपळ्यामुळे असे काही गुण आहेत. त्यामुळे गरमीपासून आपल्याला त्रास होत नाही. त्यामध्ये पाणी हे मोठ्या प्रमाणात असल्याने शरीराला हाईड्रेट ठेवते. रात्री आपण जर कमी पाणी सेवन केले तर डिहाड्रेशनही त्यामुळे होत नाही. आपल्याला उन्हाळ्यात कोणतेही जेवण पचत नसेल तर त्याकरिता भोपळ्याचे सेवन हे खूप आवश्यक आहे.
काकडी : काकडीत मोठ्या प्रमाणात पाणी असते.त्यामुळे रात्रीच्या जेवणानंतर काकडी खाणे हे शरीरासाठी खूप आवश्यक असते. प्रत्येक काकडीत ९६ टक्के पाणी व ४ टक्के फाईबर असते. यामुळे पचनक्रियाही चांगल्या राहतात.
डांगर : डांगरामध्ये पोटॉशिअम व फाईबर भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे शरीराला ते थंड ठेवते. उन्हाळ्याच्या दिवसात रात्रीच्या जेवणात डांगराचे आवश्य सेवन करावे. यामुळे शरीरातील ब्लड शुगरही नियंत्रीत राहण्यास मदत होते.
दोडके : दोडक्याचे सेवन हे उन्हाळ्याच्या दिवसात खूप फायदेशीर आहे. या सेवनामुळे पचन क्रिया चांगली राहते. पचनासंबंधीची कोणतीही समस्या यामुळे निर्माण होत नाही.
उकाडलेले बटाटे : उन्हाळ्याच्या दिवसात उकाडलेले बटाटे खाल्याने कोणतीही समस्या उद्भवत नाही. त्यामध्ये कार्बोहाईड्रेटचे प्रमाण असल्याने उन्हाळ्यात त्रास जाणवत नाही. या सेवनामुळे रात्रीला झोपही चांगली येते.
दही : दही यामध्ये पोषक तत्व चांगल्या प्रमाणात असतात. त्याचबरोबर कॅल्शिअमचे प्रमाणही त्यामध्ये असते. रात्रीला दह्याचे सेवन केल्याने पोटही चांगले राहते. शरीराला दही हे कायम थंड ठेवण्याचे काम करते.
उन्हाळ्यात रात्री शांत झोप हवी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2016 20:50 IST