शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

झेडपीत वार्षिक आमसभेला वर्षभरापासून टाळाटाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2019 06:00 IST

जिल्ह्यातीलर् सामान्य नागरिकांना समस्या मांडण्यासाठी हक्काचे स्थान म्हणजे जिल्हा परिषदेची आमसभा होय. जिल्ह्यातील विविध विकास योजनांचा आढावा घेऊन त्यावर चर्चा करण्यासाठी प्रत्येक वर्षाला जिल्हा परिषदेच्या प्रशासन प्रमुखांनी आमसभा बोलावली पाहिजे. जिल्हा परिषदेच्या एकूण सदस्यांपैकी १/५ सदस्यांनी मागणी केल्यास जिल्हा परिषदेची सभा बोलावली जाते.

ठळक मुद्देप्रशासन बेदखल : विकासकामांवर विपरित परिणाम

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : मिनी मंत्रालय म्हटल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेला कित्येक वर्षांपासून आमसभा घेण्यासाठी मुहूर्तच मिळत नसल्याने सावळागोंधळ चव्हाट्यावर आला आहे. काही वर्षे प्रशासनाने आमसभेला टाळाटाळ होत असल्याने नागरिकांच्या समस्यांवर तोडगा निघणार कधी, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.जिल्ह्यातीलर् सामान्य नागरिकांना समस्या मांडण्यासाठी हक्काचे स्थान म्हणजे जिल्हा परिषदेची आमसभा होय. जिल्ह्यातील विविध विकास योजनांचा आढावा घेऊन त्यावर चर्चा करण्यासाठी प्रत्येक वर्षाला जिल्हा परिषदेच्या प्रशासन प्रमुखांनी आमसभा बोलावली पाहिजे. जिल्हा परिषदेच्या एकूण सदस्यांपैकी १/५ सदस्यांनी मागणी केल्यास जिल्हा परिषदेची सभा बोलावली जाते. पंचायत समित्यांच्या आमसभा पूर्ण झाल्यानंतर जिल्ह्याची आमसभा घेणे आवश्यक आहे. ही आमसभा वर्षातून एकदाच होते. या आमसभेचे अध्यक्ष पालकमंत्री, तर जिल्हाधिकारी सचिव असतात. खासदार, आमदार, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य हे सदस्य असतात. जिल्ह्यातील १४ पंचायत समित्यांमध्ये दरवर्षी आमदार आमसभा घेऊन तालुक्यातील समस्या सोडविण्याचा प्रयत्न यातून करतात. या सभेसाठी तालुक्यातील सर्व प्रमुख कार्यालयांचे जबाबदार अधिकारी उपस्थित असतात. त्याचवेळी नागरिकांच्या समस्यांचे निराकरण केले जाते. मात्र, ती अद्याप आमसभा न घेण्याचे कारण काय, असा प्रश्न यानिमित्ताने पुढे येत आहे. जिल्हा परिषदेच्या आमसभेत नागरिकांना आपले प्रश्न मांडून त्यावर चर्चा करून समस्यांचे निराकरण होऊ शकते. मात्र, कित्येक वर्षांपासून आमसभाच झाली नसल्याने नागरिकांच्या समस्यांमध्ये आणखी भर पडली आहे. त्यावर प्रशासन नेमकी काय भुमिका घेणार, हे गुलदस्त्यातच आहे.आमसभा घेण्यासाठी पदाधिकारी व अधिकाऱ्यांना वेळ नव्हता की काय, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांनी उपस्थित केला आहे. जिल्हा परिषदेने आमसभा घेतल्यास नागरिकांचे प्रश्न वेळेत निकाली निघणार आहेत. त्यासाठी प्रशासनाने दरवर्षी या आमसभा घेणे बंधनकारक आहे. आमसभा घेण्यात न आल्यामुळे प्रशासनाची उदासीनता जनतेसमोर आली आहे. त्याचा विकासकामांवर परिणाम होताना दिसत आहे. जिल्हा परिषद प्रशासनामार्फत बोलावण्यात आलेल्या आमसभेला विविध विकासाच्या प्रश्नांवर नागरिक प्रशासनाला जाब विचारतात. या आमसभेत प्रशासनाच्या सर्व खात्यांचे प्रमुख हजर राहत असल्याने अनेक समस्या प्राधान्याने मार्गी लागत असल्याने या सभेला नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होतात. मात्र, कित्येक वर्षांपासून जिल्हा परिषदेची आमसभाच न झाल्याने जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील नागरिकांच्या समस्या जैसे थे असल्याची नाराजी व्यक्त होत आहे. यासंदर्भात अध्यक्ष नितीन गोंडाणे यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.पंचायत समितीत आमसभा, तर जिल्हा परिषदेत का नाही?दरवर्षी जिल्ह्यातील अमरावती, भातकुली, धामणगाव रेल्वे, चांदूर रेल्वे, तिवसा, नांदगाव खंडेश्र्वर, अचलपूर, चांदूर बाजार, वरूड, मोर्शी, धारणी, चिखलदरा, अंजनगाव सुर्जी, दर्यापूर पंचायत समितीत संबंधित आमदारांच्या अध्यक्षतेत वार्षिक आमसभा घेण्यात येते. जनतेच्या समस्यांचे निराकरण केले जाते; मग झेडपीत का नाही, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

टॅग्स :zpजिल्हा परिषद