शहरं
Join us  
Trending Stories
1
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
2
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
3
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
4
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
5
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
6
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
7
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
8
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
9
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
10
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
11
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
13
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
14
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
15
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
16
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
17
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
18
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
19
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
20
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
Daily Top 2Weekly Top 5

रबी हंगामात १०,५७७ हेक्टर जमीन सिंचनाखाली

By admin | Updated: November 17, 2015 00:26 IST

सिंचनाकडून समृद्धीकडे जाण्यासाठी पाटबंधारे विभागाने शेतकऱ्यांना मदतीचा हात दिला आहे.

आजपासून पाणीपुरवठा : लाभक्षेत्रातील पिकांसाठी वरदानअमरावती : सिंचनाकडून समृद्धीकडे जाण्यासाठी पाटबंधारे विभागाने शेतकऱ्यांना मदतीचा हात दिला आहे. खरीप हातचा गेल्याने रबी हंगामात तरी शेतकरी सुजलाम सुफलाम व्हावा, या उद्देशाने या विभागाने यंदा १०५७७ हेक्टरचे उद्दिष्ट ठेवले आहे. जिल्ह्यातील राज्यस्तरीय पाटबंधारे प्रकल्पांमध्ये २७ आॅक्टोबर २०१५ रोजी उपलब्ध असलेल्या पाण्याच्या साठ्यानुसार १०५७७ हेक्टर जमिनीवर सिंचनाचे उद्दिष्ट ठरविण्यात आल्यानंतर सोमवार १६ नोव्हेंबरपासून कालव्याद्वारे पाणीपुरवठा सुरु करण्यात आला आहे. अमरावती पाटबंधारे विभाग अमरावतीअंतर्गत मध्यम प्रकल्प, लघुप्रकल्प बंधारे, उपसा सिंचन इत्यादी पाटबंधारे प्रकल्पाच्या कालव्याच्या समादेश क्षेत्रात असलेल्या लाभधारकांस कालव्याद्वारे पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. सन २०१५-१६ मधील रबी हंगामाकरिता १५ नोव्हेंबर २०१५ ते ३१ मार्च २०१६ या कालावधसाठी सोमवार १६ नोव्हेंबरपासून पाणीपुरवठ्याला आरंभ करण्यात आला आहे. सिंचनाचा लाभ घेण्याच्यादृष्टीने पाणी मागणी अर्ज मागविण्यात आले होते. उर्ध्व वर्धा जलाशयाची गाळपेर जमीन पेरणीसाठीजिल्ह्यातील मध्यम प्रकल्प, लघुप्रकल्प, बंधारे, उपसासिंचन योजनेच्या लाभ क्षेत्रातील पिकांसाठी आज सोमवारपासून कालव्याद्वारे पाणी पुरवठा होत असताना अप्पर वर्धा जलाशयाची गाळपेर जमीन पेरणीसाठी मिळणार आहे. धरणाची पातळी कमी झाल्याने धरणातील बुडीत क्षेत्र रबी व उन्हाळी पिकांसाठी पेरणीखाली येवू शकत असल्याने अमरावती जिल्ह्यातील धरणे क्षेत्रातील सुमारे ११०४ हेक्टर जमीन यावर्षी पेरणीसाठी भाडेपट्टीवर उपलब्ध होणार आहे. प्रकल्पग्रस्त, भूमिहिन आणि मागासवर्गीयांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. यासाठी जलसंपदा विभागाकडून अर्ज आमंत्रित करण्यात आले आहेत. (प्रतिनिधी)