शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
2
Latest Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
3
४ दिवसांमध्ये ₹९६०० नं स्वस्त झाली चांदी; सोन्याचे दर १७०० रुपयांनी घसरले; पटापट चेक करा आजचे दर
4
‘या’ क्रिकेटपटूविना निम्म्याने घटली मुंबई इंडियन्सची ताकद, फलंदाजांचं पितळ पडलं उघडं 
5
इराण युद्ध थांबवायचे की सुरु करायचे...! ट्रम्प यांच्याकडे फक्त ७ दिवस! '१ मे' पूर्वी मोठा निर्णय घेण्याची शक्यता
6
घटस्फोटाआधी दुसरा विवाह मोठा गुन्हा नाही; आरपीएफ कर्मचाऱ्याला हायकोर्टाचा दिलासा
7
देशातील बँकिंग सेक्टरवर 'Mythos' चे सावट; नेमका काय धोका? अर्थमंत्र्यांनी दिला इशारा...
8
E-Bike: ई-बाईक आहे? ऑफिसला जातानाही व्हा मालामाल... 
9
Gautam Adani News: गौतम अदानी १०० अब्ज डॉलरच्या क्लबमध्ये सामील; मुकेश अंबानींना टाकलं मागे
10
Mumbai University: प्रश्नपत्रिका फूटप्रकरणी शिपायावर गुन्हा दाखल, तीन कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस; एक बडतर्फ 
11
बंगालमध्ये पहिल्या टप्प्यातील १५२ पैकी भाजपा किती जागा जिंकणार? अमित शाहांनी थेट आकडाच सांगितला
12
आता फक्त ५ मिनिटांत होणार ब्रेस्ट कॅन्सरचे निदान; 'केईएम'मध्ये अत्याधुनिक मशिन दाखल!
13
मुंबई, महाराष्ट्राचा Video शेअर करत इराणने अमेरिकेला फटकारले; ट्रम्प यांना दिला मोठा सल्ला!
14
मोबाईल फक्त निमित्त! तुमची ऊर्जा गुपचूप चोरणाऱ्या 'या' छुप्या गोष्टी तुम्हाला माहितीय का?
15
दोन दिवसांवर आलेल्या लग्नासाठी घेतलेल्या ३० साड्या, ६० हजार खाक; ४ तोळे सोने गायब
16
बीड कारागृहात राजकीय ड्रामा! वाल्मीक कराड गँगकडून मारहाणीचा आरोप अन् 'त्या' कैद्याचा 'यू-टर्न'
17
'विशाल पाटलांना तिकीट मिळणार नाही हे जयंत पाटील-विश्वजित कदमांना माहीत होतं"; पडळकरांचा मोठा गौप्यस्फोट
18
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
19
अमेरिकेच्या युद्धनौकेवर अचानक माकडाने हल्ला चढवला; होर्मुझच्या मोहिमेवर निघालेले...
20
तुमच्या घरात तुळशीच्या बाजूला ‘या’ गोष्टी ठेवल्या नाही ना? लक्ष्मी नाराज होईल, निघून जाईल!
Daily Top 2Weekly Top 5

ट्रामा केअरचे भाग्य कधी उजळणार !

By admin | Updated: September 18, 2014 23:28 IST

येथील वाढती लोकसंख्या, आजुबाजुंची गावे व येथून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील अपघाताच्या वाढत्या घटना लक्षात घेता तीन वर्षांपूर्वी बडनेऱ्यात ट्रामा केअर युनिट हा अत्याधुनिक दवाखाना

बडनेरा : येथील वाढती लोकसंख्या, आजुबाजुंची गावे व येथून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील अपघाताच्या वाढत्या घटना लक्षात घेता तीन वर्षांपूर्वी बडनेऱ्यात ट्रामा केअर युनिट हा अत्याधुनिक दवाखाना शासकीय निधीतून उभारण्यात आला आहे. मात्र तीन वर्षांपासून या वास्तुचे लोकार्पण केवळ राजकारणामुळे रखडले आहे. बडनेऱ्यातील ट्रामा केअर युनिट रुग्णालयाच्या इमारतीचे भूमिपूजन १६ आॅक्टोबर २०११ रोजी करण्यात आले. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने या दवाखान्याच्या इमारतीचे काम युध्दस्तरावर पूर्ण केले व ती ईमारत जिल्हा प्रशासनातील आरोग्यविभागाकडे हस्तांतरीत करण्याच्या हालचाली केल्या. मात्र तब्बल एक वर्षापर्यंत जिल्हा प्रशासनाने ही ईमारत आपल्या ताब्यात घेतली नव्हती. एवढ्यात या ईमारतीचे हस्तांतरण झाले. त्यानुसार मागील महिन्यात बडनेरातील ट्रामा केअर युनिट लोकांच्या सेवेत रुजू व्हावे यासाठी लोकार्पणाची तारीख देखील निश्चित करण्यात आली होती. मात्र ऐन वेळेवर उद्घाटनासाठी येणाऱ्या मंत्र्याचा दौरा रद्द झाल्यामुळे ट्रामा केअर युनिट ‘जैसे थे’ स्थितीत आहे. ही ईमारत केवळ शोभेची ठरत आहे. ट्रामा केअर युनिट सुरु करण्यासाठी उद्घाटनाच्या दिवशी सर्व तयारी करण्यात आली होती. डॉक्टरांचा व इतर कर्मचाऱ्यांचा स्टाफ देखील आणण्यात आला होता. रुग्णांच्या उपचारासाठी लागणाऱ्या सर्वसोई-सुविधा याठिकाणी पुरविण्यात आलेल्या होत्या. मात्र केवळ मंत्रीमहोदय न आल्याने ट्रामा केअर युनिट लोकांच्या सेवेत रुजू होऊ शकलेले नाही. गेल्या दोन वर्षांपासून बडनेरावासीय व परीसरातील मोठ्या संख्येतील खेड्यापाड्यावरचे लोक हा ट्रामा केअर दवाखाना कधी सुरु होणार या प्रतीक्षेत आहेत. अपघातांचे प्रमाण या परिसरात मोठ्या प्रमाणात आहे. एक्सप्रेस हाय-वेवरुन वाहतूक मोठ्या प्रमाणात असल्याने अपघातांचे प्रमाण ही वाढते आहे. या परिसरात घडलेल्या अपघातांमधील रुग्णांना अमरावतीच्या दवाखान्यांमध्ये उपचारासाठी नेले जाते. हे अंतर लांब असल्याने अनेक रुग्णांवर जीव गमविण्याची वेळ येते. महाराष्ट्र शासनाने करोडो रुपये खर्च करुन बडनेरात बांधलेले ट्रामा केअर युनिट गंभीर अवस्थेतील रुग्णांसाठी जीवनदायी ठरु शकते. अपघातांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असल्यामुळे परिसरात या मागणीचा जोर आहे. त्यादृष्टीने प्रशासनाने हालचाली कराव्या, अशी मागणी होऊ लागली आहे. (शहर प्रतिनिधी)