शहरं
Join us  
Trending Stories
1
शेजारच्या बाईने माझ्याविषयी अफवा पसरवली;पर्वती प्रकरणात आजोबांचा दावा; कोर्टात नेमकं काय घडलं ?
2
पराभव होताच ममतांच्या निकटवर्तीयांचे 'एक्झिट'! ज्या IAS अधिकाऱ्यासाठी घेतली होती PM मोदींशी टक्कर; त्यांनीही दिला राजीनाम!
3
पश्चिम बंगालमध्ये भाजप देणार महिला मुख्यमंत्री? 'या' नावांची जोरदार चर्चा, ९ मे रोजी शपथविधी
4
“११८ आमदारांचा पाठिंबा असलेले पत्र घेऊन या”; राज्यपाल-विजय भेटीत काय घडले? TVKचे तोंडी बहुमत!
5
युद्धाचे ढग विरणार? अमेरिका आणि इराणमध्ये ऐतिहासिक कराराची तयारी; पुढच्या ४८ तासांत होणार मोठा फैसला!
6
मध्य रेल्वेवरील पहिल्या नॉन-AC लोकलची चाचणी मुंबईत होणार नाही, थेट उत्तर प्रदेशात! कारण काय?
7
IPL 2026, SRH vs PBKS: पंजाब किंग्सचे खेळाडू 'काळ्या फिती' बांधून का उतरले मैदानात? जाणून घ्या त्यामागचं कारण
8
तामिळनाडूमध्ये काँग्रेसची 'दिल्ली'सारखी चूक? विजयला पाठिंबा देण्याच्या निर्णयावरून 'त्या' पुनरावृत्ती भीती
9
West Bengal Violence : २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई
10
“पंजाब स्फोटाबाबत भगवंत मान पाक ISIला क्लीन चिट का देतात, भाजपाशी एवढे वैर का?”: राघव चड्ढा
11
IPL 2026 : ...तर MS धोनीला फेअरवेल मॅचही मिळणार नाही? रविचंद्रन अश्विनचा मोठा दावा
12
आता पाकिस्तान कुणापुढे हात पसरणार? आधी तेल-पीठ झाले महाग, आता 'ही' जीवनावश्यक वस्तू मिळेना! 
13
प्रेमाचं नाटक, लग्नाचं आमिष आणि त्यानंतर...; मोहम्मद शमीच्या भावावर गंभीर आरोप
14
"माझ्या स्वतःच्याच बापाने माझ्या मुलीवर..., त्याला फाशी द्या', पुण्यातील चिमुकलीच्या आईचा आक्रोश
15
फक्त पाण्याने हात धुणं पुरेसं नाही; आजारांचं धक्कादायक वास्तव समजल्यावर नक्कीच बदलाल सवय
16
५ राज्यांत एकूण किती मुस्लीम उमेदवार निवडणूक जिंकले? बंगालमध्ये सर्वाधिक; भाजपचा एकही नाही!
17
ऑनलाईन शॉपिंगमध्ये फसवणूक झालीय? घाबरू नका, 'या' सोप्या ट्रिकने तुमचे पैसे परत मिळणार!
18
Top Marathi News LIVE: मुंबई हायकोर्टाकडून बेकायदा फेरीवाल्यांबाबत नाराजी, अहवाल सादर करण्याचे दिले निर्देश
19
कुत्र्यापासून वाघांना धोका; कान्हा व्याघ्र प्रकल्पात ‘T-141’ वाघिणीसह तिच्या चार बछड्यांचा मृत्यू
20
अजितदादांच्या कार्याला सलाम, २१० किमी पोहायचा विक्रम; आर्यनसिंह यांनी घेतली सुनेत्रा पवारांची भेट
Daily Top 2Weekly Top 5

उपासमारीची वेळ : ३० वर्षांपासूनचे मजूर आदेशाविना कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2016 00:12 IST

सामाजिक वनीकरण विभागांतर्गत ३० वर्षापासून रोजंदारीवर काम करणाऱ्या म. ग्रा. रो. ह. योच्या मजुरांना कुठलेही लेखी आदेश न देता...

मनोज मानतकर नांदगाव खंडेश्वर
सामाजिक वनीकरण विभागांतर्गत ३० वर्षापासून रोजंदारीवर काम करणाऱ्या म. ग्रा. रो. ह. योच्या मजुरांना कुठलेही लेखी आदेश न देता कामावरून कमी केल्याने या मजुरांचे भवितव्य अधांतरी आले आहे.
नांदगाव ग्रामपंचायतचे नगरपंचायतमध्ये रुपांतर झाल्याने या मजुरांना काम देण्यासाठी कामाचा कृती आराखडा तयार करण्याची जबाबदारी नगरपंचायतची असताना सुद्धा अद्यापपर्यंत नगरपंचायतने कामाचा कृती आराखडा तयार न केल्याने दोन महिन्यांपासून या मजुरांच्या हाताला काम नसल्याने या मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे.
स्थानिक रहिवासी अरूण परसनकर, राजू धांडे, रामकृष्ण शिंगारे, मंगला शिंगारे हे कामगार सन- १९८५ पासून सामाजिक वनीकरण विभागाच्या माहुली चोर येथील रोपवाटीकेवर बारमाही रोजंदारीवर काम करीत होते. परंतु ३० वर्षापासून सतत रोजंदारीवर काम करत असताना १एप्रिल २०१६ रोजी कुठलेही लेखी आदेश न देता या मजुरांना सामाजिक वनीकरण विभागाच्या लागवड अधिकाऱ्यांनी कामावर येण्यास मज्जाव केल्याने दोन महिन्यांपासून या मजुरांच्या कुटुंबियांची उदरनिर्वाहासाठी वाताहात होत आहे. याबाबत माहिती जाणून घेतली असता म.ग्रा. रो. ह. योच्या कामावर नांदगावातील जे मजूर काम करीत होते त्या मजुरांना नांदगाव नगरपंचायत झाल्याने म. ग्रा. रो. ह. यो. चे कामे देणे शक्य नसल्याची बाब समोर आली आहे. शासन निर्णयानुसार म. ग्रा. रो. ह. योची कामे ग्रामपंचायत अंतर्गत येत असून ज्या ठिकाणी नगरपंचायत आहे तेथील मजुरांना राज्य रोजगार हमी योजनेंतर्गत काम उपलब्ध करून देण्याची जबाबदारी नगरपंचायत प्रशासनाची आहे. तहसीलदार बी. व्ही. वाहूरवाघ यांनी त्यासंबंधीचे पत्र नगरपंचायतला दिलेले आहे. परंतु नगरपंचायत प्रशासनाने मात्र अद्यापपर्यंत याबाबत कामाचा कृती आराखडा तयार न केल्याने या मजुरांचा रोजंदारीचा फार मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. मजूर कामाच्या मागणीसाठी नगरपंचायतमध्ये गेले असता त्यांना उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली आहे. या मजुरांच्या कुटुंबियांचे उदरनिर्वाहाचे भवितव्य लालफितशाहीत अडकले आहे.

शासन निर्णय काय सांगतोय
शासन निर्णय ३ मार्च २०१४ नुसार ग्रामपंचायतचे नगरपंचायतीत रूपांतर झाल्यानंतर नगरपंचायत क्षेत्रातील म. ग्रा. रो. ह. योची कामे बंद करण्यात आली आहे. त्यामुळे नगरपंचायत क्षेत्रातील मजूर या कामावर असेल त्या मजुरांना पंचायत शासन निर्णय क्र. १ नुसार राज्य रोजगार हमी योजनेमधून कामे देण्याची तरतूद करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून तहसील कार्यालयाला तसे पत्र सुद्धा प्राप्त झाले आहे. परंतु आता नगरपंचायतने मजुरांच्या उदरनिर्वाहाचा विचार करून तात्काळ कामाचा कृती आराखडा तयार करणे गरजेचे आहे. अन्यथा या रोजंदारी मजुरांना सुल्तानी संकटाची उपासमारी भोगावी लागेल एवढे मात्र निश्चित.

दोन महिन्यांपासून हाताला काम नाही, जगावे तरी कसे
सा. बां. विभागाने कामावरुन कमी केल्यापासून दोन महिने लोटूनही काम न मिळाल्याने कुटुंबियांची उपजिविका कशी भागवावी हा प्रश्न निर्माण झाला आहे. आता उपासमारीशिवाय कुठलाच मार्ग नसल्याची खंत रोजंदारी कामावरील मजूर अरुण परसनकर, राजू धांडे, रामकृष्ण शिनगारे, मंगला शिनगारे या कामगारांनी व्यक्त केले.