शहरं
Join us  
Trending Stories
1
‘देवाभाऊं’चा एक फोन अन् तत्काळ प्रश्न सुटला; CM फडणवीसांनी अधिकाऱ्यांना सुनावलं, नेमकं काय घडलं?
2
प्रवाशांना मोठा दिलासा, विदर्भातून गोव्याला जाणारी ट्रेन नियमित केली; नाशिक-मुंबईकरांना लाभ!
3
Virat Kohli New World Record : किंग कोहलीचा शतकी धमाका! अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
4
IPL 2026 : चेज मास्टर विराट कोहली सेंच्युरीसह पुरुन उरला! KKR ला पराभूत करत RCB अव्वल ठरला
5
पुण्यातील सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये बॉम्बसदृश्य वस्तू; रुग्ण-नागरिकांमध्ये खळबळ अन् घबराट
6
आकाशात संकट! एअर इंडियाच्या अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणांना 'ब्रेक'; जगभरात ६ हजारांहून अधिक उड्डाणं 'लेट' 
7
IPL 2026: KKR विरुद्ध खाते उघडल्यावर किंग कोहलीचं 'शतकी सेलिब्रेशन'; RCB चे चाहतेही झाले शॉक (VIDEO)
8
अमूलनंतर आता मदर डेअरीचाही दणका! दूध महागलं, म्हशीच्या दुधापासून फुल क्रीमपर्यंत नवे दर जाहीर; पहा संपूर्ण यादी
9
RCB vs KKR : मुंबईकर रघुवंशीची तुफान फटकेबाजी; किंग कोहलीनंही टाळ्या वाजवत दिली दाद (VIDEO)
10
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून EV वाहनाचा वापर सुरू, ताफ्यातील वाहनेही केली कमी
11
महागाईचा झटका, अमूलने दुधाचा भाव वाढवला! कधीपासून लागू होणार नवे दर? जाणून घ्या 
12
IPL All Time Record : किंग कोहलीनं रचला इतिहास; MS धोनीचा महारेकॉर्ड मोडला
13
हरियाणातील स्थानिक निवडणुकीत BJPचा दबदबा; PM मोदींनी मानले जनतेचे आभार, म्हणाले...
14
२० कोच ‘वंदे भारत’ शानदार शो… १० दिवसात ४५ हजार प्रवाशांचा प्रवास, तुफान प्रतिसाद; पण कुठे?
15
खरा मित्र… रशियाने पुन्हा सिद्ध केले, गॅरंटी दिली, “काही होऊ दे, भारताचे नुकसान करणार नाही”
16
“नेपाळ-बांगलादेशप्रमाणे GenZ ने भारतातही रस्त्यावर उतरायला हवे”; केजरीवाल असे का म्हणाले?
17
“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट
18
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
19
PBKS vs MI: "विश्वास ठेवा, ट्रॉफी जिंकून दाखवू"; पंजाबच्या पराभवाच्या मालिकेनंतर प्रभसिमरनची चाहत्यांना भावनिक साद
20
RCB vs KKR : पावसाच्या बॅटिंगचा कुणाला बसणार फटका? कट-ऑफ टाइमचा नियम काय?
Daily Top 2Weekly Top 5

बोर्डाच्या परीक्षा केंद्रावरील शिक्षक, कर्मचाऱ्यांची होणार कोरोना चाचणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:12 IST

अमरावती : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने दहावीची २९ एप्रिल आणि बारावीची लेखी परीक्षा २३ एप्रिलपासून ...

अमरावती : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने दहावीची २९ एप्रिल आणि बारावीची लेखी परीक्षा २३ एप्रिलपासून होणार आहे. त्याअनुषंगाने बोर्डाने परीक्षांची तयारी चालविली असून, परीक्षा केंद्रांवर कर्तव्य बजावणाऱ्या शिक्षक, कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी होणार आहे. दहावीसाठी २,५११ तर, बारावीसाठी १,५१९ परीक्षा केंद्र असणार आहेत.

विभागीय शिक्षण मंडळाने अकोला, वाशिम, यवतमाळ, बुलडाणा व अमरावती या पाचही जिल्ह्यांत दहावी, बारावीच्या परीक्षांचे नियोजन करण्यात येत आहे. शिक्षण मंडळाने कोविड -१९ च्या अनुषंगाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे परीक्षा केंद्रांवर पालन होण्यासाठी तयारी सुरू केली आहे. यंदा दहावीत १,६४,६३२ तर, बारावीच्या परीक्षेसाठी १,३७,५६९ विद्यार्थी परीक्षेला सामोरे जाणार आहे.

बारावीच्या परीक्षांसाठी विभागातून परीरक्षक केंद, परीक्षा केंद्र. उपकेंद्र, परीक्षक, नियामक, वरिष्ठ नियामक आणि इतर कर्मचारी असे १८,३६७ मनुष्यबळ तैनात केले जाणार आहे. यात अमरावती विभागात केंद्र संचालक ४९८, उपकेंद्र संचालक ४९८, पर्यवेक्षक ६१६२, रिलिव्हर पर्यवेक्षक ९९६, स्टेशनरी पर्यवेक्षक ४९८, लिपिक ४९८, शिपाई ९९६, पाणीवाला १,४९४ अन्य घटक ४९८, मुख्य नियामक १०, वरिष्ठ नियामक ६, नियामक ७९७, परीक्षक ४४६०, परीरक्षक ७३, उपपरीरक्षक ७३, सहायक परीरक्षक ४९८, लिपिक ७३, शिपाई १४६ अन्य घटक ७३ असे मनुष्यबळ बारावीच्या परीक्षांसाठी नेमण्यात येणार आहे. अकोला २६८, अमरावती ३९५, बुलडाणा ३१७, यवतमाळ ३४८, वाशिम १९१ असे जिल्हानिहाय परीक्षा केंद्र असणार आहे. दहावीच्या परीक्षेसाठी अकोला ४३९, अमरावती ६६५, बुुलडाणा ५०३,यवतमाळ ६०९, वाशिम २९५ असे जिल्हानिहाय परीक्षा केंद्र असणार आहे.

———————————

बारावीच्या परीक्षा केंद्रांवर असे राहील मनुष्यबळ

अकोला- २०९३

अमरावती -३१२५

बुलडाणा- २६४१

यवतमाळ - २७२४

वाशिम - १५७५

——————————

राज्य शिक्षण मंडळाच्या सूचनेनुसार दहावी, बारावीच्या ऑफलाईन परीक्षांचे नियोजन सुरू झाले आहे. शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या कोरोना चाचणीबाबत अद्याप काही गाईडलाईन नाही. मात्र, जवळपास शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी झाली आहे. बोर्डात कर्मचाऱ्यांनी ९० टक्के चाचणी, लसीकरण आटोपले आहे.

- जयश्री राऊत, सहसचिव, विभागीय शिक्षण मंडळ