शहरं
Join us  
Trending Stories
1
“२२ लाख विद्यार्थ्यांची स्वप्ने धुळीला मिळाली”; NEET 2026 परीक्षा रद्द, राहुल गांधी संतापले
2
Top Marathi News LIVE Updates: मुख्यमंत्री विजय यांच्या सरकारला मोठं 'बळ', बहुमत चाचणीआधी तामिळनाडूत मोठी घडामोड
3
सोनं खरेदी करू नका, असं आवाहन इंदिरा गांधींनी खरंच केलं होतं का?; व्हायरल कात्रणामागचं सत्य काय?
4
'नीट' पेपर फुटीमागे महाराष्ट्र कनेक्शन! जयपूरमधून लीक झालेला पेपर नाशिकमध्ये प्रिंट झाल्याचा संशय
5
Travel : भारताच्या 'मिनी थायलंड'पासून अवघ्या ३ तासांवर आहे 'हे' सुंदर ठिकाण; निसर्गात रमून थकवा विसराल!
6
‘सनातन धर्माला संपवलंच पाहिजे’, विजय यांच्यासमोर उदयनिधींचं विधान, मुख्यमंत्र्यांनी दिला असा प्रतिसाद
7
कल्याणमध्ये ७८ वर्षीय भोंदूबाबाचा अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार
8
NEET Exam Paper Leak : "पप्पा, हाच पेपर येईल, हॉस्टेलमधील मुलींना द्या"; NEET चं केरळ कनेक्शन, १८० पैकी १३० प्रश्न लीक
9
कान्समध्ये अवतरली जणू स्वप्नातील परी! मिंट-ग्रीन गाऊनमध्ये आलिया भट्टचा 'प्रिन्सेस लूक' व्हायरल
10
Vastu Shastra: घरात पैसे टिकत नाहीत? मग चुकूनही 'या' दिशेला ठेवू नका तुमची तिजोरी!
11
सीजफायरचा फक्त देखावा! इराणने रशिया-चीनकडून जमवला शस्त्रास्त्रांचा डोंगर; 'या' देशांना दिला इशारा
12
ज्याने कपाटात 'सीक्रेट' कप्पा बनवला, त्यानेच हात साफ केला! ३० लाखांची चोरी करून कारागिर फरार
13
Gold Import: सोन्याच्या आयातीमुळे देशाच्या तिजोरीवर पडला मोठा भार, सोन्याने भारताची चिंता का वाढवलीये?
14
शहरातल्या गजबजाटापासून दूर थंड हवा, झोपाळ्यावर डुलकी; महापौर रितू तावडे यांचा गावी दौरा
15
मोठी बातमी: पेपर फुटला, नीट २०२६ ची परीक्षा रद्द, सीबीआय चौकशीचे आदेश
16
अनधिकृत बाइक टॅक्सी ॲप्सवर कारवाईचे आदेश; प्रताप सरनाईक यांचे सायबर क्राइम विभागाला पत्र
17
बुधवारी अपरा एकादशी २०२६: ‘असे’ करा व्रत पूजन, शुभ मुहूर्त काय? पाहा, महत्त्व अन् मान्यता
18
देश प्रथम! PM मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद; मंत्री शंभूराज देसाईंचा लंडन-पॅरिस दौरा रद्द
19
भाजप नेत्यांनी ५० गाड्यांच्या ताफ्यासह भोपाळला काढली रॅली, PM मोदींचं आवाहन नेते दुसऱ्याच दिवशी विसरले!
20
'या' Infra कंपन्यांची लागली लॉटरी! ११ हजार कोटींचा प्रोजेक्ट मिळताच स्टॉक सुस्साट, हाती आला रेल्वे-हायवेचा प्रोजेक्ट
Daily Top 2Weekly Top 5

शेतीपिकांवर संक्रांत

By admin | Updated: January 6, 2015 22:52 IST

नवीन वर्षाच्या सुरुवातीपासूनच प्रतिकुल हवामानाचा परिणाम शेतीपीके, फळपीके व भाजीपाल्यावर होत आहे. यामुळे अळ्यांसह बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता बळावली आहे.

शेतकरी चिंतेत : ढगाळ वातावरण, थंडी, धुके पिकाच्या मुळावर
अमरावती : नवीन वर्षाच्या सुरुवातीपासूनच प्रतिकुल हवामानाचा परिणाम शेतीपीके, फळपीके व भाजीपाल्यावर होत आहे. यामुळे अळ्यांसह बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता बळावली आहे. अवकाळी पाऊस, ढगाळ वातावरण, धुके व गारपीट यामुळे रोगट वातावरण पसरले आहे. कांदा पीक वाढीच्या स्थितीत असतानाच वातावरण बदलाचा परिणाम होत आहे.
जिल्ह्यात सद्यस्थितीत ४१ हजार ३६० हेक्टर क्षेत्रात गहू, ९० हजार ११२ हेक्टर क्षेत्रात हरभरा, ६ हजार हेक्टर क्षेत्रात कांदा, १ लाख ९४ हजार ३६२ हेक्टर क्षेत्रात कपाशी व ५० हजार हेक्टर क्षेत्रात फळपिके, १० हजार हेक्टर क्षेत्रात भाजीपाला, अशी स्थिती आहे.
सध्याच्या प्रतिकूल हवामानाचा सर्वाधिक परिणाम संत्रापिकावर होत आहे. मृग बहराचा एक चतुर्थांश संत्रा अद्याप झाडावर आहे. कमी भावामुळे कित्येक बागा विकल्या गेल्या नाहीत. या फळांची गळ होण्याची शक्यता आहे. आंबिया बहर कितपत फुटणार याची शंका आहे. गहू पिकावर करपा, अती थंडीमुळे तांबेरा होण्याची शक्यता आहे. हरभऱ्याला पाऊस पोषक असला तरी धुक्यामुळे अळी व फुलगळ होण्याची शक्यता आहे. कापूस ओला होत आहे तर उशिरा बहरलेल्या तुरीवर शेंगा पोखरणाऱ्या अळींचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. सतत नापिकीच्या सत्रामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.