शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

तणावामुळेच वाढल्या पोलिसांच्या आत्महत्या

By admin | Updated: May 12, 2015 00:04 IST

नागरिकांचे सुरक्षा कवच म्हणून कर्तव्य बजावणारा पोलीस कर्मचारी आज अनेक समस्यांनी ग्रस्त आहे. सद्यस्थितीत पोलिसांचे ...

व्यथा : पोलीस कर्मचाऱ्यांच्या जीवनाचे वास्तवसुरेश सवळे चांदूरबाजारनागरिकांचे सुरक्षा कवच म्हणून कर्तव्य बजावणारा पोलीस कर्मचारी आज अनेक समस्यांनी ग्रस्त आहे. सद्यस्थितीत पोलिसांचे जीवन व्यस्त झाले आहेत. कामाचे अतिरिक्त तास यामुळे बहुतांश पोलीस कर्मचारी हृदयरोग, उच्च रक्तदाब, मधुमेह अशा व्याधींनी ग्रस्त आहेत. यामुळे त्यांच्या मध्ये व्यसनाधिनता वाढल्याची दिसून येते. बेरचदा त्यांना सतत ४८ तासापर्यंत आपले कर्तव्य बजावावे लागते. यात थोडीफार चूक झाल्यास वरिष्ठ अपमानित करतात, आणि निलंबनाची तलवार त्यांचे मानेवर तयार ठेवतात.सामान्य माणसाच्या दृष्टिकोनातून पैसे खाणारा, शिव्या हासडणारा अशी पोलीस कर्मचाऱ्यांची प्रतिमा नागरिकांच्या मनात आहे. परंतु याच्या दुसऱ्या बाजूचा विचार सामान्य नागरिकांसह सरकार करताना दिसत नाही. त्यांच्या कौटुंबिक जीवनाचा विचार केल्यास आजही ग्रामीण भागातील पोलीस कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानाचा प्रश्न शासनाकडून सुटलेला नाही. १० बाय १० च्या जीर्ण निवासस्थानात तो आपल्या कुटुंबासोबत वास्तव्यास असतो. अपुऱ्या सुविधांमुळे त्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. बरेचदा एखाद्या प्रकरणाची चौकशी करीत असताना त्याकरिता कागद, घटनास्थळावर जाण्याकरिता लागणारे वाहन, पेट्रोल याकरिता स्वत:च पैसे खर्च करावे लागतात. आरोपी कोठडीमध्ये असल्यास त्यांच्या जेवणाचा खर्चही तपास अंमलदारास करावा लागतो. याकरिता लागणारा खर्च जरी शासनाकडून मिळत असला तरी तो वेळेवर व पुरेशा प्रमाणात मिळत नाही. एखादी दुर्घटना झाल्यास पोलीस वेळेवर घटनास्थळी पोहचले नाही, तर त्याची आरडाओरड होते. परंतु ते का पोहोचू शकले नाही, याचा विचार केला जात नाही. कायदा व सुव्यवस्था याबरोबरच इतर कामेसुध्दा त्यांनाच करावी लागते. आरोपीला न्यायालयात ने-आण करणे, उपचारार्थ दवाखान्यात नेणे, कोर्टाचे समन्स पोहोचविणे. सण, उत्सव, जयंती यामध्ये कायदा व सुव्यवस्था कायम राखणे आदी कामे त्यांना यशस्वीरीत्या पार पाडावी लागतात.आज पोलीस कर्मचाऱ्यांच्या अनेक समस्या असल्यातरी त्यांच्या समस्यांची मागील अनेक वर्षांपासून शासनाकडून दखल घेण्यात आली नाही. इतर शासकीय कर्मचाऱ्यांच्या विविध संघटना असल्याने संप, आंदोलनाच्या माध्यमातून शासनस्तरावर दबाव आणून त्या सोडविल्या जात असल्याचे अनेक उदाहरणे आहेत. परंतु पोलिसांच्या बाबतीत असे होताना दिसून येत नाही. ग्रामीण भागातील पोलिस स्टेशनमध्ये बसण्याकरीता साधी खुर्ची नाही. पिण्याचे पाणी नाही. यासह श्रम परिहाराकीता वेगळी खोली, खेळांचे मैदान, खेळांचे साहित्य, मनोरंजनाची साधने आदींचा अभाव आहे. पोलिसांना मिळणार हक्काच्या रजासुरक्षा व्यवस्था व बंदोबस्ताच्या नावावर पोेलीस कर्मचाऱ्यांच्या रजा रद्द करण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक तसेच ठाणेदारांचे अधिकार काढण्यात आलेले आहेत. एवढेच नव्हे तर पोलीस आयुक्तांनाही त्यात हस्तक्षेप करता येणार नाही. याकरिता थेट अतिरिक्त पोलीस महासंचालकाची लेखी परवानगी घ्यावी लागणार आहे. पोलीस महासंचालक संजीव दयाल यांच्या या आदेशाने कर्मचाऱ्यांना मनमोकळे सुट्या उपभोगता येईल. कर्तव्य बजावताना पोलिसांना मानसिक, शारीरिक थकवा येतो. त्यामुळे ते तणावात असतात. रजाकाळातही कर्तव्य बजावावे लागते. त्यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांत नैराश्य येते असे असतानाही वरिष्ठ साप्ताहिक रजा नाकारत होते. यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष खदखदत होता.