शहरं
Join us  
Trending Stories
1
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
2
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
3
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
4
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
5
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
6
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
7
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
8
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
9
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
10
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
11
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
12
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
13
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
14
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
15
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
16
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
17
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
18
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
19
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
20
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
Daily Top 2Weekly Top 5

बारावीची मूल्यमापन प्रक्रियेला प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:10 IST

राज्य मंडळाकडून बारावीच्या परीक्षा कोरोनामुळे रद्द करण्यात आल्यानंतर शालेय शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाचा आराखडा जाहीर केला होता. त्यानुसार आता ...

राज्य मंडळाकडून बारावीच्या परीक्षा कोरोनामुळे रद्द करण्यात आल्यानंतर शालेय शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाचा आराखडा जाहीर केला होता. त्यानुसार आता कनिष्ठ महाविद्यालयांनी ७ ते २३ जुलैपर्यंत अंतर्गत मूल्यमापन प्रक्रिया पूर्ण करायची आहे. त्यादरम्यान १४ ते २१ जुलै या कालावधीत मुख्याध्यापक, प्राचार्यांनी निकाल समितीने प्रमाणित केलेल्या निकालानुसार विद्यार्थ्यांचे विषयनिहाय गुण मंडळाच्या संगणकीय प्रणालीमध्ये भरायचे आहेत. निकाल प्रमाणित करण्यासाठी प्रत्येक ज्युनियर कॉलेजमध्ये सात सदस्यीय समिती स्थापन करण्यात येणार आहे. या समितीने निकाल प्रमाणित केल्यानंतर आणि ते प्राचार्यांनी संगणकीय प्रणालीत अपलोड केल्यानंतर मंडळस्तरावर अंतिम निकाल तयार केला जाणार आहे. गुण ऑनलाईन अपलोड केल्यानंतर कनिष्ठ महाविद्यालय येथे सीलबंद पाकिटात विभागीय मंडळात २१ ते २३ जुलै या कालावधीत जमा करायचे आहे. दहावीच्या गुणांची ३० टक्के, इयत्ता अकरावीच्या गुणांची ३० टक्के वेटेज आणि बारावीच्या वर्षभरातील अंतर्गत लेखी मूल्यमापनाची ४० टक्के यावर बारावीचा अंतिम निकाल आधारलेला राहणार आहे. दहावीच्या वर्षाच्या गुणांचे वेटेज लक्षात घेता, सर्वाधिक गुण असलेले तीन विषय विचारात घेतले जाणार आहेत.

कोट

वरिष्ठ स्तरावरून आलेल्या सूचनेनुसार महाविद्यालयांना सूचना दिल्या आहेत. त्यानुसार शाळास्तरावर इयत्ता बारावीच्या मूल्यमापनाची प्रक्रिया ऑफलाईन पद्धतीने सुरू झाली आहे. १४ जुलैपासून ही प्रक्रिया ऑनलाईन केली जाणार आहे.

- जयश्री राऊत, सहसचिव, विभागीय शिक्षण मंडळ