शहरं
Join us  
Trending Stories
1
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
2
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
3
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
4
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
5
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
6
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
7
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
8
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
9
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
10
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
11
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
12
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
13
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
14
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
15
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
16
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
17
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
18
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
19
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
20
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण भागातील प्रतिभा प्रकाशात आली

By admin | Updated: September 27, 2015 00:15 IST

अंजनगाव सुर्जी तालुक्यातील विद्यार्थिनींनी जिल्हा पातळीवर संपन्न झालेल्या विज्ञान प्रेरणा पुरस्कार ...

विज्ञान प्रेरणा पुरस्कार : सातेगाव, दहिगाव, विहिगाव, कापूसतळणीच्या मुलींची निवड अंजनगाव सुर्जी : अंजनगाव सुर्जी तालुक्यातील विद्यार्थिनींनी जिल्हा पातळीवर संपन्न झालेल्या विज्ञान प्रेरणा पुरस्कार प्रदर्शनीत आपल्या प्रतिभाशक्तीचे प्रदर्शन केले. तालुक्यातील ५५ प्रतिकृतींपैकी चार प्रतिकृतींच्या निवड राज्यस्तरावर आयोजित प्रदर्शनासाठी करण्यात आली. या चारही प्रतिकृती विद्यार्थिर्नंनी तयार केल्या होत्या, हे विशेष. यावरून विद्यार्थ्यांच्या तुलनेत विद्यार्थिनी अभ्यासासोबतच प्रतिभाशक्तीतही अव्वल आहेत, हे दिसून आले. पंचफुलाबाई हरणे विद्यालयाची विद्यार्थिनी व सातेगाव येथील श्यामली अंकुश बोबडे, निर्मला विद्यालय कापूसतळणीची कल्याणी उमेश बोंडे, महात्मा फुले विद्यालय, विहिगावची महिमा राजेंद्र गवई आणि इंदिरा गांधी विद्यालय, दहिगाव रेचा येथील वृषाली रवींद्र गव्हाळे या विद्यार्थिनींनी आपल्या वैज्ञानिक प्रतिकृतीचे गुरुनानक अभियांत्रिकी महाविद्यालय, कळमेश्वर (नागपूर) येथे प्रदर्शन केले.पंचफुलाबाई हरणे विद्यालयाचे शिक्षक संजय शेळके यांनी श्यामली बोबडे या विद्यार्थिनीस मार्गदर्शन करून अपघातमुक्त रहदारीचा प्रकल्प तयार केला होता. निर्मला विद्यालय, कापूसतळणीचे शिक्षक एस.एम. रडके यांनी कल्याणी बोंडे या विद्यार्थिनीस मार्गदर्शन करून घरगुती एसी हा प्रकल्प तयार केला. महात्मा फुले विद्यालय, विहिगाव येथील शिक्षक अशोक मसने यांनी महिमा गवई हिला मार्गदर्शन करुन सौर बाबा गाडी हा प्रकल्प तयार केला. इंदिरा गांधी विद्यालय, दहिगाव रेचा येथील शिक्षक सूरज पटेल यांनी वृषाली गव्हाळे या विद्यार्थिनीस मार्गदर्शन करून वायूची गती मोजण्याचा प्रकल्प तयार केला होता. प्रदर्शन सहभागातून अनेक शाळा वंचितप्रत्येक शाळेला दरवर्षी जुलै महिन्यात या प्रदर्शनाच्या सहभागासाठी एक विशिष्ट रक्कम दिली जाते. काही शाळांना ही रक्कम प्राप्तच झाली नाही असाही एक आरोप झाला आहे. हा एक प्रशासकीय दिरंगाईचा भाग असला तरी ही रक्कम मागेपुढे कधीतरी भेटनेच आहे. मुद्दा प्रदर्शनातील सहभागाचा आहे व सहभाग शाळेच्या आणि संबंधीत शिक्षकांच्या सक्रियतेचा आहे. पदरमोड करुनही शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांना या संकल्पनेत सहभागी करुन घेऊ शकतात. शिकवणीच्या भरोश्यावर अतिरिक्त उत्पन्न मिळविणाऱ्या शिक्षकांनी या समस्येकडे लक्ष देऊन आपल्या शाळेचा सहभाग प्रदर्शनात केला असता तर विद्यार्थ्यांना निश्चितच त्याचा आनंद घेता आला असता. ३० पर्यंत आॅनलाईन नोंदणीतालुक्यातील अनेक शाळा या प्रदर्शनीत सहभागी होऊ शकल्या नाहीत. विद्यार्थ्यांची वैज्ञानिक संकल्पना पाठ करुन त्याचा आनंद विद्यार्थ्यांना देण्याचीही बहुमोल संधी या शाळांनी गमावली आहे. सोबतच विद्यार्थ्यांचेही नुकसान केले. यावर्षी ३० सप्टेंबरपर्यंत आॅनलाईन नोेंदणी करून शाळा आपल्या विद्यार्थ्यांचे शोधप्रकल्प या योजनेत पाठवू शकतात.