शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

पुन्हा दमदार पाऊस, शेतकऱ्यांसाठी आशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2018 22:06 IST

जिल्ह्यात २० सप्टेंबरनंतर पुन्हा दमदार पावसाचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तविला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पावसाचा अनुशेष भरून निघण्याचे संकेत आहे.

ठळक मुद्देहवामानतज्ज्ञाचा अंदाज : हवामान प्रणाली पावसाचा अनुशेष भरून काढणार

वैभव बाबरेकर ।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्ह्यात २० सप्टेंबरनंतर पुन्हा दमदार पावसाचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तविला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पावसाचा अनुशेष भरून निघण्याचे संकेत आहे.बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होत असून सध्या मध्य भारतासह बहुतांश ठिकाणी मान्सून कमकुवत आहे. एकूण पावसाची सरासरी तूट ९ टक्केपर्यंत पोहोचली आहे. परंतु, आता थोडी आशेची किरणे दिसत असून मंगळवारपर्यंत मध्य व उत्तर बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे. चीनच्या समुद्रात सक्रिय दोन चक्रीवादळे 'बारीजात आणि मानगूट', बंगालच्या उपसागराकडे सरकत आहेत. परंतु त्यांची शक्ती कमी होत असून, हे दोन वादळे बंगालच्या उपसागरातील पूर्व भागात एकत्र आल्याने चक्राकार वारे तयार झाले आहेत. ही हवामान प्रणाली सोमवारपर्यंत कमी दाबाचे क्षेत्रात परावर्तीत होईल. सदर कमी दाबाचे क्षेत्र तीव्र होऊन ते पश्चिम-दोशेने प्रवास करण्याची शक्यता हवामानतज्ज्ञ अनिल बंड यांनी वर्तविली आहे. परंतु या प्रवासात हे कमी दाबाचे क्षेत्र हळूहळू कमजोर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही सिस्टीम पश्चिम मध्यप्रदेश पर्यंत पोहोचेल की नाही, याबाबत हमी नाही. वरील सर्व स्थितीनुसार २० तारखेपासून ओरिसा आंध्र या भागात जोरदार पाऊस सुरू होण्याची शक्यता आहे, तर मध्य भारतातसुद्धा याचा फायदा होईल. शक्यतोवर पूर्व विदर्भात यामुळे २१ ते २४ चांगला पाऊस पडेल, तर पश्चिम विदर्भात मात्र कमी जास्त प्रमाण राहील. हे कमी दाबाचे क्षेत्र जर २१, २२ सप्टेंबरपर्यंत टिकले, तर मात्र अमरावती बुलडाणा भागातसुद्धा समाधानकारक पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच सातपुडा क्षेत्रात या पावसाच्या पाण्याने धरणे भरण्यास मदत होईल.जिल्ह्यात काही ठिकाणी पाऊसरविवारी दुपारी १.३० ते २.३० वाजता दरम्यान जिल्ह्यातील काही परिसरात तुरळक पावसाच्या सरी बसरल्या. अचानक वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने नागरिकांची तारांबळ उडाली होती. काही दिवसांपासून उन्हाची तीव्रता प्रकर्षाने जाणवली.