शहरं
Join us  
Trending Stories
1
शेजारच्या बाईने माझ्याविषयी अफवा पसरवली;पर्वती प्रकरणात आजोबांचा दावा; कोर्टात नेमकं काय घडलं ?
2
पराभव होताच ममतांच्या निकटवर्तीयांचे 'एक्झिट'! ज्या IAS अधिकाऱ्यासाठी घेतली होती PM मोदींशी टक्कर; त्यांनीही दिला राजीनाम!
3
पश्चिम बंगालमध्ये भाजप देणार महिला मुख्यमंत्री? 'या' नावांची जोरदार चर्चा, ९ मे रोजी शपथविधी
4
“११८ आमदारांचा पाठिंबा असलेले पत्र घेऊन या”; राज्यपाल-विजय भेटीत काय घडले? TVKचे तोंडी बहुमत!
5
युद्धाचे ढग विरणार? अमेरिका आणि इराणमध्ये ऐतिहासिक कराराची तयारी; पुढच्या ४८ तासांत होणार मोठा फैसला!
6
मध्य रेल्वेवरील पहिल्या नॉन-AC लोकलची चाचणी मुंबईत होणार नाही, थेट उत्तर प्रदेशात! कारण काय?
7
IPL 2026, SRH vs PBKS: पंजाब किंग्सचे खेळाडू 'काळ्या फिती' बांधून का उतरले मैदानात? जाणून घ्या त्यामागचं कारण
8
तामिळनाडूमध्ये काँग्रेसची 'दिल्ली'सारखी चूक? विजयला पाठिंबा देण्याच्या निर्णयावरून 'त्या' पुनरावृत्ती भीती
9
West Bengal Violence : २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई
10
“पंजाब स्फोटाबाबत भगवंत मान पाक ISIला क्लीन चिट का देतात, भाजपाशी एवढे वैर का?”: राघव चड्ढा
11
IPL 2026 : ...तर MS धोनीला फेअरवेल मॅचही मिळणार नाही? रविचंद्रन अश्विनचा मोठा दावा
12
आता पाकिस्तान कुणापुढे हात पसरणार? आधी तेल-पीठ झाले महाग, आता 'ही' जीवनावश्यक वस्तू मिळेना! 
13
प्रेमाचं नाटक, लग्नाचं आमिष आणि त्यानंतर...; मोहम्मद शमीच्या भावावर गंभीर आरोप
14
"माझ्या स्वतःच्याच बापाने माझ्या मुलीवर..., त्याला फाशी द्या', पुण्यातील चिमुकलीच्या आईचा आक्रोश
15
फक्त पाण्याने हात धुणं पुरेसं नाही; आजारांचं धक्कादायक वास्तव समजल्यावर नक्कीच बदलाल सवय
16
५ राज्यांत एकूण किती मुस्लीम उमेदवार निवडणूक जिंकले? बंगालमध्ये सर्वाधिक; भाजपचा एकही नाही!
17
ऑनलाईन शॉपिंगमध्ये फसवणूक झालीय? घाबरू नका, 'या' सोप्या ट्रिकने तुमचे पैसे परत मिळणार!
18
Top Marathi News LIVE: मुंबई हायकोर्टाकडून बेकायदा फेरीवाल्यांबाबत नाराजी, अहवाल सादर करण्याचे दिले निर्देश
19
कुत्र्यापासून वाघांना धोका; कान्हा व्याघ्र प्रकल्पात ‘T-141’ वाघिणीसह तिच्या चार बछड्यांचा मृत्यू
20
अजितदादांच्या कार्याला सलाम, २१० किमी पोहायचा विक्रम; आर्यनसिंह यांनी घेतली सुनेत्रा पवारांची भेट
Daily Top 2Weekly Top 5

रेतीच्या किमतीत आठपटीने वाढ

By admin | Updated: February 13, 2015 00:49 IST

दिवसेंदिवस पडणारा अल्प पाऊस अशातच जिल्ह्यात प्रकल्पाची संख्या वाढल्यानंतर नदीला येणारे पूर बंद झाल्याने रेतीच्या लिलावाची किंमत तीन वर्षांत ...

मोहन राऊत अमरावती
दिवसेंदिवस पडणारा अल्प पाऊस अशातच जिल्ह्यात प्रकल्पाची संख्या वाढल्यानंतर नदीला येणारे पूर बंद झाल्याने रेतीच्या लिलावाची किंमत तीन वर्षांत आठपटीने वाढली आहे़ ५३ वरून ८१ घाट तयार झाले आहेत़ याची किंमत चार कोटीहून ३१ कोटीपर्यंत पोहचली आहे़
सर्वाधिक महसूल देणारा जिल्ह्यात रेती व्यवसाय आहेत़ सन २०१२-१३ मध्ये महसूल विभागाने ५३ घाट लिलावासाठी काढले होते़ ८९ हजार ७४९ ब्रास च्या रेतीची निर्धारित रक्कम ४ कोटी ७६ लाख ४२ हजार ८८९ रूपये ठेवली होती़ सन २०१३-१४ मध्ये ११४ घाटांचा लिलाव महसूल विभागाने केला. १ लाख ७७ हजार ४४५ ब्रास रेतीची निर्धारित रक्कम १५ कोटी ७१ लाख १५ हजार अशी होती़ सन २०१४-१५ या चालू वर्षांत ८१ रेती घाटांच्या लिलावाची निर्धारित रक्कम तब्बल ३१ कोटी ९६ लाख ९५ हजार ५६५ रूपये ठेवून १ लाख ९ हजार ५५३ ब्रास रेतीचा लिलाव काढला. यातून सर्वाधिक २१ कोटी रूपयांच्या सात घाटांचे लिलाव वाढत्या रक्कमेमुळे झाले नाहीत़
भूजल सर्वेक्षण विभागाने केला प्रताप
वर्धा नदीच्या पात्रात तालुक्यातील नायगाव, बोरगाव निस्ताने, गोकुळसरा, विटाळा, दिघी महल्ले ही घाट येतात महसूल विभागातील मंडळ अधिकारी, तलाठी यांनी या घाटांच्या लांबी-रूंदी चौरस मीटर मोजण्याचा अहवाल जिल्हा प्रशासनाला दिल्यानंतर महसूल विभागाने या घाटांतील रेतीच्या ब्रासचे मोजमाप करण्याचे आदेश भुजल सर्वेक्षण विभागाला दिले होते. या विभागाने तालुक्यातील पाच घाटांतील रेतीची खोली मोजून जिल्हा प्रशासनाला अहवाल सादर केला. एकीकडे या तालुक्यात बगाजी सागर धरण असल्यामुळे वर्धा नदीला पाहिजे त्या प्रमाणात पूर येणे बंद झाले आहे़ तसेच गतवेळी पावसाचे अल्प प्रमाण असल्यामुळे रेतीचा साठा नसतांना दुसरीकडे भूजल सर्वेक्षण विभागाने मागील दोन वर्षे अर्धा मीटर खोल असलेली रेती तब्बल यंदा दीड मीटरपर्यंत उत्खनन करता येत असल्याचा अहवाल जिल्हा प्रशासनाला दिल्यामुळे रेतीची किंमत अधिक वाढली आहे़
बांधकामवरील मजुरांवर उपासमारीची पाळी
जिल्ह्यात बांधकाम व्यवसायात धामणगाव तालुका अग्रेसर आहे़ येथील रेती उत्खनन व बांधकामावर मजुरी करणारे अनेक कुटुंब आहेत़ मागील दोन महिन्यापासून रेतीचा लिलाव न झाल्यामुळे बांधकाम पूर्णत: ठप्प आहेत़ या मजुरांवर उपासमारीची पाळी आली आहे़ विकासात्मक कामे या रेतीमुळे बंद असल्याचा थेट अहवाल बांधकाम विभागाने शासनाला पाठविला आहे़
धामणगाव तालुक्यात रेतीला सोन्याचे भाव
जिल्ह्यात सर्वाधिक धामणगाव तालुक्याने महसूल विभागाला रेतीमधून महसूल दिला आहे़ पहिल्या वर्षात जिल्ह्याच्या ४ कोटी ७६ लाख ४२ हजार पैकी १ कोटी १८ लाख ५१ हजार अशा १० हजार ७२४ ब्रास ची रक्कम केवळ धामणगाव तालुक्याची होती़ तर दुसऱ्या वर्षात जिल्ह्यासाठी असलेल्या निर्धारीत १५ कोटी ७१ लाख रक्कमे पैकी १ कोटी ८८ लाख ९० हजार रूपयांची पाच घाटाची निर्धारीत रक्कम होती़ तसेच या वर्षात ही रक्कम तब्बल दहा पटीने वाढली आहे़ यंदा सात घाटातील ४९ हजार ५२३ ब्रास रेतीची किंमत २१ कोटी ५४ लाख ५१ हजार ८७४ रूपये ठेवण्यात आली आहे़ या वाढत्या दरामुळे रेती घाटाचा लिलाव घेण्यास कोणीही अद्यापही पुढे आले नाही़