शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा इराणला थेट इशारा! 'युद्धविराम संपला तर एवढे बॉम्ब पडतील की...', इस्लामाबाद चर्चेआधी तणाव वाढला!
2
...तर इराणवर पुन्हा ड्रोन-क्षेपणास्त्रांचा वर्षाव? "मोहीम अद्याप संपलेली नाही"; व्हाइट हाऊसनंतर आता नेतन्याहू यांचाही थेट इशारा
3
GT vs MI : हा माझा प्रॉब्लेम नाही! तिलक-बुमराहसंदर्भातील कळीच्या मुद्यावर पांड्या स्पष्टच बोलला
4
औराद शहाजानी परिसरात उष्माघाताने शेतकऱ्याचा मृत्यू; साेमवारी तापमान पाेहोचले ४२.८ अंशावर
5
IPL 2026 : "घासून नाही, ठासून हरवलं "! MI चं विक्रमी विजयासह दमदार कमबॅक; GT ला पहिल्यांदाच दिली मात
6
'लिव्ह इन पार्टनर'च्या छळाला कंटाळून ५१ वर्षीय महिलेकडून आत्महत्येचा प्रयत्न, मृत्यू झाल्यावर गुन्हा दाखल
7
रणजी क्रिकेटमध्ये संधी देण्याच्या नावाखाली दोन तरुणांना २० लाखांचा गंडा
8
कार्यकर्ता अपमानित होतो, तेव्हा माझ्यातील शिवसैनिक जागा : एकनाथ शिंदे
9
९३ दिवसांचा थरार अन् 'ऑपरेशन महादेव' फत्ते! पहलगामच्या मारेकऱ्यांचा असा घेतला भारतीय सैन्याने बदला!
10
मध्यपूर्वेतील राजकारणात मोठा भूकंप; "आता अमेरिकेची गरज नाही...!" UAE चा ट्रम्प यांना तगडा धक्का, नवा वाद पेटला
11
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला ७ हजार आंब्यांचा महानैवेद्य; अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर ट्रस्टकडून आंबा महोत्सव 
12
Tilak Varma Maiden IPL Hundred : तिलक वर्माची अविश्वसनीय सेंच्युरी; MI साठी ठरला खरा संकटमोचक!
13
Travel : भारतात आहे चक्क मंगळ ग्रहासारखी जागा! पर्यटकांची पहिली पसंती; 'हे' अजब ठिकाण पाहिलेत का?
14
साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची बदली; एकूण ९ अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश निघाले... 
15
GT vs MI : स्टंप तोड गोलंदाजी! षटकारासह स्वागत झाल्यावर रबाडानं असा घेतला सूर्या दादाचा बदला (VIDEO)
16
पतीच्या मैत्रिणीस अडकवण्यासाठी चाकुरात पत्नीने केला पुतण्याचा खून; 'असा' झाला उलगडा
17
सराफवाडी येथे माय लेकाची गळफास घेवून आत्महत्या; कारण अस्पष्ट, वालचंदनगर पोलिसांकडून तपास सुरू 
18
गुंतवणूकदार मालामाल! १० वर्षांत पैशांचा पाऊस पाडणाऱ्या कंपनीचा स्टॉक होणार स्प्लिट; रेकॉर्ड डेट जाहीर
19
पाेटच्या दाेन चिमुकल्यांसह मातेने विहिरीत उडी घेत संपवले जीवन! खरोसा गावावर शोककळा
20
"अजित डोभाल अचानक सौदीला का गेले?"; इराण-अमेरिका संघर्षात भारतानं फेकला 'हुकमी एक्का'; मोठ्या 'गेम"ची तयारी
Daily Top 2Weekly Top 5

गुणपत्रिकाच नाही; पदवी, पदव्युत्तरचे प्रवेश कसे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2020 04:23 IST

‘विथहेल्ड’ निकालाने विद्यार्थी त्रस्त, विद्यापीठात गुणपत्रिकेसाठी गर्दी कायम अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने अंतिम वर्ष परीक्षांचे निकाल जाहीर ...

‘विथहेल्ड’ निकालाने विद्यार्थी त्रस्त, विद्यापीठात गुणपत्रिकेसाठी गर्दी कायम

अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने अंतिम वर्ष परीक्षांचे निकाल जाहीर केले. मात्र, बहुतांश विद्यार्थ्यांचे निकाल ‘विथहेल्ड’ असल्याने गुणपत्रिका मिळालेल्या नाहीत. त्यामुळे पुढील अभ्यासक्रमात प्रवेश कसा घ्यावा, ही चिंता विद्यार्थ्यांसह पालकांना सतावत आहे. काही महाविद्यालयाने प्रवेशाची अंतिम तारीख ४ डिसेंबर निश्चित केल्यामुळे विद्यार्थ्यांनी गुणपत्रिकेसाठी विद्यापीठात गर्दी केली आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, विद्यापीठाने २६ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर दरम्यान अंतिम वर्षाच्या ऑनलाईन, ऑफलाईन परीक्षा पार पडल्या. ३ नोव्हेंबरपासून अंतिम वर्ष परीक्षांचे निकाल जाहीर केले जात आहे. ज्या विद्यार्थ्यांचे अंतिम वर्ष वगळता अन्य सत्राच्या गुणपत्रिका व्यवस्थित आहे, अशा विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर करण्यात आले आहे. परंतु, सुमारे ४० ते ५० टक्के विद्यार्थ्यांचे निकाल अन्य सत्राच्या गुणपत्रिका विद्यापीठात प्राप्त नसल्याने निकाल ‘विथहेल्ड’ ठेवण्यात आले आहे. दुसरीकडे महाविद्यालयांनी पदवी, पदव्युत्तर प्रवेशाची तारीख निश्चित केली आहे. गुणपत्रिकाच नसल्याने प्रवेश कसा मिळेल, ही माेठी समस्या हल्ली विद्यार्थ्यांपुढे उद्‌भवली आहे. महाविदयालय आणि विद्यापीठ यांच्यात समन्वयाचा अभाव नसल्याचा फटका विद्यार्थ्यांना सहन करावा लागत आहे. ‘विथहेल्ड’ निकालाची समस्या दूर करण्यासाठी तब्बल १५० ते २०० कि.मी. अंतर ओलांडून अमरावती विद्यापीठात यावे लागते, अशी कैफियत अनेक पालकांनी ‘लोकमत’जवळ व्यक्त केली.

--------------------

जुने सत्राच्या गुणपत्रिका तपासूनच अंतिम वर्षाची गुणपत्रिका तयार करण्यात येते,

पदवीसाठी ग्रेड निश्चित करावा लागतो. त्यामुळे विद्यार्थ्यांचे मागील सत्राच्या गुणपत्रिका गोळा करण्यात येत आहे. कोणताही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहणारा नाही.

- हेमंत देशमुख, संचालक, परीक्षा व मूल्यांकन मंडळ

-----------------------

अमरावती विद्यापीठात १० वाजता पोहोचण्यासाठी घरून मुलींसोबत सकाळी ६ वाजता निघालो. खिडक्यांवर कर्मचाऱ्यांकडृून व्यवस्थित उत्तर मिळत नाही. काही मुली पालकांविना ‘विथहेल्ड’ निकालाची समस्या सोडविण्यासाठी आल्या आहेत. मुलींच्या अन्य सत्राच्या गुणपत्रिका जमा करूनही निकाल रोखला आहे.

- प्रमोद ठाकरे, पालक, देऊळगाव राजा

----------------

निकाल रोखण्यात आल्यामुळे पुढील प्रवेशापासून वंचित तर राहावे लागणार नाही ना, ही भीती आहे. विद्यापीठ आणि महाविद्यालयांत समन्वयाचा अभाव आहे. सोबतच्या काही मित्रांचे प्रवेश झाले. त्यामुळे आता विद्यापीठाने प्रवेशास मुदतवाढ द्यावी.

- विश्वजित साेळंके, विद्यार्थी, विद्याभारती महाविद्यालय, अमरावती