नरेंद्र जावरेलोकमत न्यूज नेटवर्कचिखलदरा : मेळघाटात सातपुडा पर्वतराजीच्या कडा खचून सेमाडोह-माखला-चुनखडी मार्गावर दीड किलोमीटरपर्यंत रस्त्यावर चिखल, झाडे व दगडांचा खच लागल्याचे शनिवारी सायंकाळी अभियंत्यांच्या पाहणीत पुढे आले. वाहतुकीसाठी धोकादायक ठरलेल्या या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी एक कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. मेळघाटात पावसाने कहर केला. २२ जुलै रोजी ढगफुटीसारख्या पावसाने सेमाडोह-माखला-चुनखडी मार्गावर दीड किलोमीटर किलोमीटरपर्यंत पहाड कोसळत आला. शनिवारी जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे अभियंता प्रमोद ठाकरे, शाखा अभियंता राहुल शेंडे, जिल्हा परिषद सदस्य सुनंदा काकड, शिवा काकड, व्याघ्र प्रकल्प कर्मचारी आदींनी मार्ग सुरळीत करण्यासाठी पाहणी दौरा केला असता, हा धक्कादायक प्रकार पुढे आला. व्याघ्र प्रकल्पाच्या अंमलाखालील क्षेत्रातून हा रस्ता जातो. या मार्गातील बिच्छुखेडा, माडीझडप या दोन गावांचा संपर्क तुटला आहे.
बिच्छुखेडा, माडीझडप ही दोन्ही गावे खचलेला रस्ता व नदीला पूर यामुळे संपर्कविहीन झाली आहेत. दोन गर्भवती माता व इतर आजारांसाठी केवळ अंगणवाडी सेविका गावात आहेत. - डॉ. आदित्य पाटील, वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र
रस्त्याला आठवड्यापेक्षा अधिक कालावधी लागू शकतो. दोन गावांचा संपर्क तुटला आहे. दीड किलोमीटरपेक्षा अधिक अंतरावर सलग मोठे पाषाण, सागवान, बांबूचे झाड, माती यामुळे पूर्ण रस्ता ब्लॉक झाला आहे. - प्रमोद ठाकरे, उपविभागीय अभियंता
दोन जेसीबीने आठवडाभर लागणारदोन जेसीबी यंत्राद्वारे सलग काम केल्यास रस्ता क्लिअर होण्यास कमीतकमी एक आठवडा लागू शकतो, असा अंदाज उपस्थित बांधकाम अभियंत्यांनी काढला आहे.
बांबू, सागवानाची झाडे पाषाण कोसळले सेमाडोह-माखला रस्त्यावर सागवान, बांबूची झाडे, मोठे पाषाण रस्त्यावर आले. जेसीबीलाही ते उचलले जाणार नसल्याने ब्लास्टिंग करून रस्ता मोकळा करावा लागणार आहे.
माखला, बिच्चुखेडा, माडीझडप संपर्क क्षेत्राबाहेरदरड कोसळल्याने माखला, बिच्छुखेडा, माडीझडप या तिन्ही गावे संपर्काबाहेर झाली आहे. दोन्ही मार्गावरील या गावांचा संपर्क तुटला आहे. त्यामुळे प्रशासनाने तात्काळ दखल घेण्याची मागणी होत आहे. या मार्गावर जवळपास एक कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. त्यानंतरच आदिवासी पाडे जगाच्या संपर्कात येणार आहेत.
आरोग्य यंत्रणा हतबल दोन गर्भवती माता बिच्छुखेडा, माडीझडप येथे दोन गर्भवती माता आहेत. खंडू नदीलाही पूर असल्याने दोन्हीकडील मार्ग बंद झाले आहेत. अशात आदिवासी महिला व कुपोषित बालकांचा उपचार व इतरही समस्या निर्माण झाल्या आहेत. आरोग्य यंत्रणा पोहोचू शकत नसल्याचे काटकुंभ प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी आदित्य पाटील यांनी सांगितले.