शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
2
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
3
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
4
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
5
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
6
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
7
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
8
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
9
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
10
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
11
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
12
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
13
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
14
‘स्लीपर वंदे भारत’ जगात स्वस्त! चीन, अमेरिकेत हायस्पीड ट्रेनचे तिकीट किती? आकडे अवाक् करतील
15
नव्या आर्थिक वर्षात टाटा मोठा धमाका करणार! लवकरच ६ नव्या 'ढासू' कार बाजारात आणणार; बघा संपूर्ण प्लॅन
16
हॉटेलची रूम दिसते चकाचक, पण टॉयलेट सीटपेक्षा घाणेरड्या असतात 'या' गोष्टी; वापरताना सावधान
17
महिलांना दरमहा ३००० रुपये, मोफत बस प्रवास अन्...! सुवेंदू सरकार ॲक्शन मोडवर, १ जूनपासून खात्यात जमा होणार पैसे
18
"रस्त्यावर नमाज पठण चालणार नाही, प्रेमाने सांगून ऐकलं नाही तर..."; मुख्यमंत्री आदित्यनाथ यांचा इशारा 
19
IPL 2026 सुरू असताना धोनी अचानक NSG कॅम्पमध्ये; कमांडोंसोबत केला नेमबाजीचा सराव (VIDEO)
20
“ST ही ग्रामीण भागासाठी अत्यावश्यक सेवा, तत्काळ भाडेवाढ करणार नाही, पण...”: प्रताप सरनाईक
Daily Top 2Weekly Top 5

धामणगावात अर्धेअधिक शासकीय कार्यालये ओस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2020 05:01 IST

सकाळी ११ वाजेपर्यंत मदतनीस व चौकीदार हे दोघेच उपस्थित होते. या कार्यालयात जवळपास १६ अधिकारी कर्मचारी कार्यरत आहेत. दोन कार्यालयाचा प्रभार असल्याचे सांगत जुना धामणगावच्या कार्यालयावर कार्यकारी अभियंत्यांनी तुळशीपत्रच ठेवले असल्याचे दिसले

ठळक मुद्दे६० टक्के अपडाऊन : जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला 'खो'

मोहन राऊत।
लोकमत न्यूज नेटवर्क
धामणगाव रेल्वे : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी अधिकारी-कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहण्याचे आदेश काढले. मात्र अर्धेअधिक शासकीय कार्यालये सोमवारी ओस पडली होती. सकाळी ९.४५ वाजतापासून दुपारी १२ पर्यंत कर्मचाऱ्यांच्या खुर्च्या खाली असल्याचा प्रत्यय सोमवारी आला. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला अनेकांनी केराची टोपली दाखविली.


उर्ध्व वर्धा पाटबंधारे उपविभाग तीन
येथील उर्ध्व वर्धा पाटबंधारे उपविभाग क्रमांक तीन येथे सकाळी ११ वाजेपर्यंत मदतनीस व चौकीदार हे दोघेच उपस्थित होते. या कार्यालयात जवळपास १६ अधिकारी कर्मचारी कार्यरत आहेत. दोन कार्यालयाचा प्रभार असल्याचे सांगत जुना धामणगावच्या कार्यालयावर कार्यकारी अभियंत्यांनी तुळशीपत्रच ठेवले असल्याचे दिसले. येथील अनेक कर्मचारी आर्वी, वर्धा, यवतमाळ येथून अपडाऊन करतात. काही अभियंता धामणगाव शहरात कार्यालयात वेळेवर येत नाहीत, हे सोमवारी उघड झाले.


तालुका कृषी अधिकारी कार्यालय
तालुक्यातील अनेक शेतकरी सकाळी ११.१५ च्या सुमारास तालुका कृषी अधिकारी कार्यालयात आले. तालुका कृषी अधिकारी अजय तळेगावकर, कृषी सहायक वालदे व एक चतुर्थश्रेणी कर्मचारी उपस्थित होता. या कार्यालयातील चार कर्मचारी बेपत्ता होते. नजीकच असलेल्या मंडळ कृषी अधिकारी क्रमांक एक व दोन मध्ये पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी, कृषी सहायक अशा ३५ कर्मचाºयांनी सकाळी ११.२० वाजेपर्यंतही हजेरी लावली नव्हती. खरेदी-विक्री व्यवहार सुरू असलेल्या दुय्यम निबंधक कार्यालयातील उपनिबंधक के.के. राठोड हे सकाळी ९.३० वाजता लॉग इन करून घराकडे परतले होते.


तहसील कार्यालय निराधार
तहसील कार्यालयातील संजय गांधी निराधार हा विभाग पूर्णत: निराधार झाल्याचे दिसले. ११.३० वाजेपर्यंत एकही कर्मचारी तेथे उपलब्ध नव्हता. कनिष्ठ लिपिक उपलेखापाल कधी येईल, याची माहिती कार्यालयात नव्हती. या कार्यालयातील अनेक कर्मचारी यवतमाळ येथून अप-डाऊन करतात.
भूमी अभिलेख कार्यालय उपअधीक्षक राणे हे चांदूर रेल्वेला गेले, तर यवतमाळहून येणाऱ्या कर्मचाऱ्यांनी वेळेवर मोबाईलवरूनच सुटीचा अर्ज पाठविला. त्यामुळे शेतकऱ्यांना आल्यापावली परत जावे लागले.


महावितरण कार्यालय, नारगावंडी
नारंगावडी येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयातील खुर्च्या दुपारी बारापर्यंत रिकाम्याच होत्या. शनिवार, रविवार सुटी आल्याने येथील कनिष्ठ अभियंता अंकुश सोनवणे यांना अमरावतीहून येण्यास उशीर होईल, अशी माहिती मिळाली.


धामणगाव तीन जिल्ह्यांचे केंद्रबिंदू
धामणगाव रेल्वे हा तालुका अमरावती, यवतमाळ, वर्धा या तीन जिल्ह्यांचे केंद्रबिंदू आहे. अपडाऊनसाठी हा तालुका अधिक सोईस्कर असल्याने सर्व अधिकारी कर्मचारी या तालुक्याला पहिली पसंती दाखवितात. सकाळी १० ते सायंकाळी ६ पर्यंत शासकीय कार्यालयाची वेळ असली तरी दुपारी १२ ला येणे अन् ४ ला जाणे, असा अनेकांचा रतिब आहे. कोरोनाच्या काळात आजही ६० टक्के अधिकारी, कर्मचारी अप-डाऊन करीत असल्याने धामणगाव शहरातील शासकीय कार्यालयांमधील विविध विभागांत खुर्च्या रिकाम्या दिसून आल्यात. या लेटलतीफीचा फटका ग्रामीण भागातून विविध कामानिमित्त येणाºया नागरिकांना बसत आहे.

टॅग्स :Socialसामाजिक