शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीरच्या उधमपूरमध्ये बसचा भीषण अपघात; १५ जणांचा मृत्यू, अनेक प्रवासी गंभीर जखमी
2
Latest Marathi News LIVE Updates: विरोधकांनी महिला आरक्षण विधेयकाची भ्रूणहत्या केली, फडणवीसांचा घणाघात
3
मध्यस्थीच्या नावाखाली ‘वसुली’ करण्याचा पाकचा मोठा डाव; पूर्वीही दोनदा असेच खिसे भरून घेतलेत!
4
“तुम्ही ७५ काय, १७५ वर्षे आरक्षण घ्या, आम्हाला गरज नाही”; बृजभूषण शरण सिंह यांचा रोख कुणाकडे?
5
Mamata Banerjee : "नाव, पत्ता सगळं माहित आहे, हिशोब तर होणारच!"; ममता बॅनर्जींची अधिकाऱ्यांना थेट धमकी
6
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खानने ११ एप्रिलला घेतले मुंब्र्यात उपचार; जामीन अर्जावर आज सुनावणी
7
Avinash Bhosale: बिल्डर अविनाश भोसले यांना दिलासा; मालमत्तांवरील कारवाई रद्द
8
अतिवृष्टीचा इशारा; पिके चांगली पण रोगराई, नासाडीची भीती; भेंडवळ घटमांडणीचे यंदाचे भाकीत
9
आयआयटीच्या नावाखाली कोट्यवधींची फसवणूक, राज्यातील शैक्षणिक संस्थांना सावधानीचा इशारा
10
सोन्याचे दर ₹१,५०० हून अधिकने कोसळले; तर चांदीही ₹५,००० ने स्वस्त; पुढे काय..?
11
अमेरिका-इराणमधील तणाव पुन्हा वाढला! 'होर्मुझ'च्या वादामुळे अचानक कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ
12
‘तुम्ही घुसखोर आहात का? हे सिद्ध करण्याची वेळ आणू नका’ म्हाडाच्या उपाध्यक्षांची नागरिकांना दमदाटी
13
शेअर मार्केटचे जोरदार सुरुवात; सेन्सेक्स १६० अंकांनी वधारला, तर निफ्टी २४,४१० पार...
14
369 हा एक आकडा नाही, ब्रह्मांडाची ताकद आहे; मनात आणाल, पूर्ण होईल, २१ दिवसांत संकेत मिळतील!
15
Mumbai Local Train Update: डोंबिवली स्टेशनवर लोकलचा डबा रुळावरून घसरला! ट्रेन सेवा २० ते ३० मिनिटे विलंबाने सुरू
16
३ दिवस गजकेसरी राजयोग २०२६: ७ राशींना शुभ-लाभ, वरदान काळ; पद-पैसा वाढ, सुख-सुबत्ता!
17
कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज विक्रेत्यांना एन्ट्री देणारा सुरक्षा रक्षक अटकेत; आरोपींची संख्या १० वर!
18
Tarot Card: संयम ठेवा, आठवड्याच्या शेवटी सगळं छानच होईल; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
19
“KDMCतील वाहतूक कोंडी कमी होण्यासाठी, पाणी प्रश्न सुटण्यासाठी प्रकल्पांना गती देणार”: DCM शिंदे
20
आधी मुलाचं अपहरण, मग जबरदस्तीने मुलींचे कपडे घालून वेश्या व्यवसायात ढकललं
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019 ; निवडणुकीची लगबग अन् सोयाबीन सवंगणी एकाचवेळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2019 06:00 IST

पाऊस थांबून कडाक्याचे उन्ह पडत असल्याने कामाने वेग घेतला आहे. मजुरांची जुळवाजुळव करताना शेतकऱ्यांची मोठी दमछाक होत आहे. पावसाचे वातावरण नसताना मजूर वर्ग सुमारे तीन हजार रुपये एकराने कापणीचा खर्च घेत आहे. आता वातावरण बदललेले पाहून सोयाबीन काढणीचा भाव अजून किती गगनाला भिडणार याची चिंता शेतकरी वर्गाला लागली आहे.

ठळक मुद्देप्रचाराला केवळ आठ दिवस : ग्रामीण भागात गर्दी जमविण्यासाठी उमेदवारांची कसरत

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : दर पाच वर्षांत एकदाच येणारा निवडणुकीचा हंगाम अन् वर्षातून एकदाच येणारा सोयाबीन कापणी व काढणीचा हंगाम यावर्षी एकाच वेळी आला आहे. परिणामी राजकारणी व शेतकरी अशा दोघांनाही आपआपली कामे उरकविण्यासाठी माणसांची गर्दी जमविताना कसरत करावी लागत असल्याचे चित्र सध्या ग्रामीण भागात दिसून येत आहे.विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी शिगेला पोहोेचली आहे. सर्वच उमेदवार आपापल्या मतदारसंघांमध्ये प्रचार व मतदारांच्या भेटीगाठीत व्यस्त आहेत. पण, यावर्षी सोयाबीन काढणी आणि निवडणूक प्रचार एकाच वेळी आल्यामुळे मतदारांच्या भेटीगाठी दुर्मीळ होत आहेत. यामुळे दिवसऐवजी रात्रीच्या वेळी शेतकरी, शेतमजूर महिला-पुरुष मतदारांना गाठताना उमेदवारांच्या नाकीनऊ येत आहेत. दरम्यान, नदी, नाले, ओढे भरून वाहू लागले. त्याचबरोबर लहान-मोठे बंधारे तलाव तुडुंब भरले आहेत. सोयाबीन पीक आता कापणी व काढणीला आले आहे. पाऊस थांबून कडाक्याचे उन्ह पडत असल्याने कामाने वेग घेतला आहे. मजुरांची जुळवाजुळव करताना शेतकऱ्यांची मोठी दमछाक होत आहे. पावसाचे वातावरण नसताना मजूर वर्ग सुमारे तीन हजार रुपये एकराने कापणीचा खर्च घेत आहे. आता वातावरण बदललेले पाहून सोयाबीन काढणीचा भाव अजून किती गगनाला भिडणार याची चिंता शेतकरी वर्गाला लागली आहे. अगोदरच मजुरांची प्रचंड ओठताण होता असताना दुसरीकडे विधानसभेच्या निवडणुका नेमक्या याच काळात आल्या आहेत. अशाच आता आठही मतदारसंघात विधानसभेचा प्रचारही जोरात सुरू झाला आहे.प्रचाराचा वेग वाढला असून विविध पक्षांच्या प्रमुख नेत्यांच्या सभा सुद्धा सुरू झाल्या आहेत. त्यांच्या सभेची शोभा वाढण्यासाठी ग्रामीण भागात विशेषता शेतकरी-शेतमजूर या वगार्ला घेऊन जावे लागत आहे. त्यासाठी विविध पक्षातील राजकारणी मंडळी या वर्गावर डोळा ठेवून आहे. कारण जशा सभा लागतील तसे गावागावात गाड्या पाठवून या मंडळींना घेऊन जाण्याचा प्रयत्न करतात. मात्र वर्षातून येणारा सोयाबीन काढणीचा काळ शेतकरी शेतमजूर यांच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा आहे. नेमका तोच कालावधी आला आहे. हाता तोंडाशी आलेला एवढी सुगीचा हंगाम वाया गेला तर पूर्ण वर्षभर आर्थिक समस्येला सामोरे जावे लागणार आहे.दिवसा गावखेड्यांमध्ये शुकशुकाटसध्या पावसाने ओढ दिल्याने उन्हाचा पारा तापत आहे. त्यामुळे शेतकरी शेतीच्या कामात व्यस्त आहेत. ग्रामीण भागात सध्या सोयाबीन, ज्वारी कापणी व काढणीच्या कामाला वेग आला आहे. त्यामुळे बहुतांश गावांतील शेतकरी व शेतमजूर दिवसभर शेतात राबत आहेत. परिणामी गावखेड्यांमध्ये दिवसा कुणीही नागरिक सहसा भेट नाही. परिणामी उमेदवारांचे दिवसा असलेले दौरे निरुपयोगी ठरत असल्याचे चित्र आहे.

टॅग्स :amravati-acअमरावती