शहरं
Join us  
Trending Stories
1
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
2
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
3
“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती
4
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
5
CSK ची नवी चाल! मुंबईकर आयुष म्हात्रेच्या जागी MI च्या माजी खेळाडूला मिळाली वाइल्ड कार्ड एन्ट्री
6
उल्हासनगरात महापौरांचा पती भाजपच्या टार्गेटवर? आयुक्तांकडे महापौर पतीला एन्ट्री दिल्यावरून भाजपा नगरसेवकांचा धिंगाणा 
7
उन्हाळ्यात आवडीने कलिंगड खाताय... जाणून घ्या, किडनीवर ‘कसा’ होतो परिणाम?
8
"झालमुडी मी खाल्ली अन् मिरची... ४ मे रोजी मिठाई वाटणार!"; पश्चिम बंगालमध्ये मोदींचा मोठा दावा, ममतांवर निशाणा
9
नवरीचा अजब निर्णय! लग्नाला नकार, सासरी जाण्याऐवजी मैत्रिणीसोबत जाण्यावर ठाम; पोलीसही चक्रावले
10
स्कोडाची ८-स्पीड गिअर बॉक्सवाली कुशाक...! तोच घाट, मायलेजवर काय फरक पडला? धक्का दिला की...
11
Video: सशस्त्र जवान, मॉस्किटो फ्लीट; 'होर्मुझ'मध्ये थरार, भारताचे जहाज इराणच्या लष्कराने कसे घेतले ताब्यात, पहा व्हिडीओ 
12
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
13
"ज्या राज्याचे उपमुख्यमंत्री विमान अपघातात जातात, त्याचा..."; सुप्रिया सुळेंचे सूचक विधान
14
Ganga Saptami 2026: पितरांना सद्गती मिळावी म्हणून आजच्या तिथीला आठवणीने म्हणा 'हा' श्लोक!
15
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
16
अमराठी वाहनचालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी साहित्यिकांचा पुढाकार- मंत्री प्रताप सरनाईक
17
Gen Z कडून 'जशास तसं' उत्तर; कामाच्या ठिकाणी 'सिनियर्स'वर विश्वासच नाही, वाटतात अकार्यक्षम
18
पत्नीचे फिट राहणे पतीला आवडले नाही; जिमला जाण्यावरून झाला वाद, चिडलेल्या नवऱ्याने बायकोला संपवले अन्.. 
19
लग्नाच्या १३ वर्षांनी मोडणार टीव्ही अभिनेत्रीचा संसार? पदरात १० वर्षांचा मुलगा, म्हणाली- "मला ड्रामा नकोय..."
20
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय रक्तपेढीत रक्ताचा तुटवडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2016 00:21 IST

उन्हाचा पारा ४५ ते ४६ अंश सेल्सिअसवर पोहोचत असताना रक्तदात्यांची संख्या देखील कमालीची रोडावली आहे.

रुग्णांचे जीव धोक्यात : तापमानात वाढ, रक्तदान शिबिरे मंदावलीअमरावती : उन्हाचा पारा ४५ ते ४६ अंश सेल्सिअसवर पोहोचत असताना रक्तदात्यांची संख्या देखील कमालीची रोडावली आहे. परिणामी शासकीय रक्तपेढीत रक्तसंकलन कमी तर मागणी अधिक अशी विदारक परिस्थिती निर्माण झाली आहे. शासकीय रूग्णालयात उपचारार्थ दाखल गरीब, सामान्य रूग्णांना वेळीच रक्तपुरवठा होत नसल्याने त्यांचे जीव धोक्यात आले आहेत. हल्ली ३० ते ४० टक्के रक्ताची कमतरता जाणवत आहे.जिल्ह्यात पाच रक्तपेढ्या आहेत. येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाची रक्तपेढी तर चार खासगी रक्तपेढ्या आहेत. यात येथील डॉ.पंजाबराव देशमुख वैद्यकीय रूग्णालय, बालाजी रक्तपेढी तर बडनेरा येथील संत गाडगेबाबा रक्तपेढी, अचलपूर येथील वर्मा ब्लड बँकेचा समावेश आहे. रक्तदान शिबिरांची संख्या रोडावलीअमरावती : जिल्हा सामान्य रूग्णालयाच्या रक्तपेढीतून येथील जिल्हा स्त्री रुग्णालय, दर्यापूर, अचलपूर, धारणी, चिखलदरा, चुरणी, मोर्शी व वरुड येथील उपजिल्हा रुग्णालयातील स्टोरेज केंद्रात रक्त पुरवठा केला जातो. मात्र मार्च महिन्यापासून रक्तपेढीत रक्ताची कमतरता ही नित्याचीच बाब झाली आहे. मार्च ते मे या दरम्यान रक्तदान शिबिरांची संख्या सुद्धा कमी झाली आहे. तर दुसरीकडे जिल्हा स्त्री रुग्णालयात दरदिवसाला १५ ते २० रक्ताच्या पिशव्या पुरवठा करताना शासकीय रक्तपेढीतील कर्मचाऱ्यांची दमछाक होत आहे. यावर्षी जानेवारी महिन्यात १९२४ रक्तदात्यांनी रक्तदान केले असून फेब्रुवारीत ७८४, मार्च ७३१, एप्रिल १०५० तर मे महिन्यात ७२८ जणांनी रक्तदान केल्याचे अभिलेखात नोंद आहे. यंदा फेब्रुवारी ते मे या दरम्यान रक्त संकलनाची संख्या फारच कमी आहे. मात्र, त्या तुलनेत इर्विन, डफरीन, सुपर स्पेशालिटीसह शासकीय आठ स्टोरेज केंद्रे, खासगी रुग्णालयांमध्ये रक्त पुरवठा करण्याची जबाबदारी जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या रक्तपेढीला पार पाडावी लागते. तसेच इर्विनच्या डे केअर सेंटरमध्ये उपचारासाठी येणाऱ्या सिकलसेल, हिमोफेलिया व थायलेसिला रुग्णांनाही मोफत रक्तपुरवठा करावा लागतो. गत आठ दिवसांपासून जिल्हा स्त्री रुग्णालयात रक्ताची मागणी वाढल्याने बहुतांश गर्भवती मातांना वेळेत रक्तपुरवठा करता येत नाहीे, हे वास्तव आहे. रक्तपेढीत ठेवण्यात येणाऱ्या रक्ताचे आयुष्य हे साधारणत: ४२ दिवस राहते. प्रसंगी रक्तपेढीत आवश्यक ब्लड गृ्रप उपलब्ध नसले की, नोंदी असलेल्या रक्तदात्यांना अशा वेळी बोलावून त्यांच्याकडून रक्तदान करवून घेतले जाते. मागणीनुसार रक्ताचा पुरवठा केला जातो. परंतु मार्चपासून तापमानात वाढ झाल्याने अनेकांनी रक्तदानापासून पाठ फिरवली आहे. परिणामी शासकीय रक्तपेढीत रक्ताची कमतरता जाणवू लागली आहे. (प्रतिनिधी)