शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

१८ शेतकऱ्यांनाच विम्याचा लाभ

By admin | Updated: September 10, 2014 23:17 IST

तालुक्यात २०१३ -१४ च्या खरीप हंगामात, स्थानिक कृषी विभागाकडून २ हजार ८५६ हेक्टर ७४ आर.क्षेत्रातील विविध पिकांचा विमा काढला होता. यात २ हजार ११ शेतकऱ्यांनी भाग घेतला.

चांदूरबाजार : तालुक्यात २०१३ -१४ च्या खरीप हंगामात, स्थानिक कृषी विभागाकडून २ हजार ८५६ हेक्टर ७४ आर.क्षेत्रातील विविध पिकांचा विमा काढला होता. यात २ हजार ११ शेतकऱ्यांनी भाग घेतला. यात विमा कंपनीने विमा संरक्षित क्षेत्राकरिता ३ कोटी ६३ लाख ९२ हजार २४९ रूपये विमा हप्ता शेतकऱ्यांकडून वसूल केला. परंतु परतावा देताना मात्र केवळ १८ शेतकऱ्यांना ३८ हजार ८१५ रूपये इतक्याच रकमेचे वाटप करण्यात आले. त्यामुळे विमाधारक शेतकऱ्यांमध्ये शासन व विमा कंपनी विषयी प्रचंड रोष निर्माण झाला आहे. खरीप हंगामात तालुक्यातील सात महसुली मंडळांत ७६४ हेक्टर कापूस, ९८३ हेक्टर सोयाबीन, २३३ हेक्टर तूर, २३ हेक्टर मूग व ८५३ हेक्टरवर ज्वारी, उडीद व इतर पिकांचा विमा काढण्यात आला होता. यात चांदूरबाजार मंडळामध्ये १११४ शेतकऱ्यांनी ५६९ हेक्टर कापूस, ४३९ हेक्टर सोयाबीन, १०३ हेक्टर तूर, ३ हेक्टर मूग पिकांचा काढला होता. तर बेलोरा मंडलमध्ये ३३४ शेतकऱ्यांनी २४५ हेक्टरवर सोयाबीन, ५८ हेक्टर तूर, २२ हेक्टर कपाशी, ८ हेक्टर मूग या पिकांचा विमा काढला होता. तसेच आसेगाव मंंडलमध्ये २९६ शेतकऱ्यांनी १८६ हेक्टर सोयाबीन, ६६ हेक्टरमध्ये तूर, ३६ हेक्टरमध्ये कापूस, ८ हेक्टरमध्ये मूग, ब्राह्मणवाडा थडी मंडलमध्ये १०९ शेतकऱ्यांनी ७५ हेक्टरमध्ये कापूस, ६ हेक्टरमध्ये तूर, २८ हेक्टरमध्ये सोयाबीनचा विमा काढला. शिरजगाव कसबा मंडळमध्ये ३३ शेतकऱ्यांनी १९ हेक्टर सोयाबीन, ८ हेक्टरमध्ये कपाशी, ४ हेक्टरमध्ये मूग तर करजगाव मंडळमध्ये ४ शेतकऱ्यांनी ५ हेक्टर कपाशी व मूग या पिकांचा विमा काढला होता. तळेगाव मोहना मंडलमध्ये ११८ शेतकऱ्यांनी ६७ हेक्टर सोयाबीन व ५० हेक्टर कपाशीचा विमा काढला होता. या सातही मंडलमध्ये २०११ शेतकऱ्यांनी पीकनिहाय क्षेत्र विविध पिकांसाठी संरक्षित केले होते. परंतु विमा कंपनीने यातील १८ शेतकऱ्यांना विम्याचा लाभ दिला. सात मंडळांपैकी चांदूरबाजार मंडळामध्ये चार शेतकऱ्यांना १२ हजार ५५८ रूपये, करजगाव मंडळात एका शेतकऱ्याला १ हजार १६६ रूपये, शिरजगाव मंडळात ४ शेतकऱ्यांना ४ हजार ८४ रूपये, बेलोरा मंडळात ९ शेतकऱ्यांना १९ हजार ६ रूपये लाभ देण्यात आला. उर्वरित तीन मंडळातील विमाधारक शेतकऱ्यांना एकही छदाम देण्यात आला नाही, हे विशेष.पीक विम्याच्या ३११ कोटी रूपयांच्या हप्त्यापोटी शेतकऱ्यांनी १ कोटी ६० लाख ८४ हजार ६७४ रूपये बँकेत भरले होते. शासनाकडून विमा कंपनीला अनुदानाचे २ कोटी ३ लाख ७ हजार ५७५ रूपये देय आहेत. वि हप्ता भरूनसुध्दा विमा कंपनीने केवळ १८ शेतकऱ्यांना ३८ हजार रूपयांचेच पीक विमा संरक्षण द्यावे, हे एक न सुटणारेच कोडे आहे. शासन व विमा कंपनीच्या एकंदरीत स्थितीवरून शेतकरी वर्गांत प्रचंड नाराजीचे वातावरण आहे. (शहर प्रतिनिधी)