शहरं
Join us  
Trending Stories
1
शेजारच्या बाईने माझ्याविषयी अफवा पसरवली;पर्वती प्रकरणात आजोबांचा दावा; कोर्टात नेमकं काय घडलं ?
2
पराभव होताच ममतांच्या निकटवर्तीयांचे 'एक्झिट'! ज्या IAS अधिकाऱ्यासाठी घेतली होती PM मोदींशी टक्कर; त्यांनीही दिला राजीनाम!
3
पश्चिम बंगालमध्ये भाजप देणार महिला मुख्यमंत्री? 'या' नावांची जोरदार चर्चा, ९ मे रोजी शपथविधी
4
“११८ आमदारांचा पाठिंबा असलेले पत्र घेऊन या”; राज्यपाल-विजय भेटीत काय घडले? TVKचे तोंडी बहुमत!
5
युद्धाचे ढग विरणार? अमेरिका आणि इराणमध्ये ऐतिहासिक कराराची तयारी; पुढच्या ४८ तासांत होणार मोठा फैसला!
6
मध्य रेल्वेवरील पहिल्या नॉन-AC लोकलची चाचणी मुंबईत होणार नाही, थेट उत्तर प्रदेशात! कारण काय?
7
IPL 2026, SRH vs PBKS: पंजाब किंग्सचे खेळाडू 'काळ्या फिती' बांधून का उतरले मैदानात? जाणून घ्या त्यामागचं कारण
8
तामिळनाडूमध्ये काँग्रेसची 'दिल्ली'सारखी चूक? विजयला पाठिंबा देण्याच्या निर्णयावरून 'त्या' पुनरावृत्ती भीती
9
West Bengal Violence : २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई
10
“पंजाब स्फोटाबाबत भगवंत मान पाक ISIला क्लीन चिट का देतात, भाजपाशी एवढे वैर का?”: राघव चड्ढा
11
IPL 2026 : ...तर MS धोनीला फेअरवेल मॅचही मिळणार नाही? रविचंद्रन अश्विनचा मोठा दावा
12
आता पाकिस्तान कुणापुढे हात पसरणार? आधी तेल-पीठ झाले महाग, आता 'ही' जीवनावश्यक वस्तू मिळेना! 
13
प्रेमाचं नाटक, लग्नाचं आमिष आणि त्यानंतर...; मोहम्मद शमीच्या भावावर गंभीर आरोप
14
"माझ्या स्वतःच्याच बापाने माझ्या मुलीवर..., त्याला फाशी द्या', पुण्यातील चिमुकलीच्या आईचा आक्रोश
15
फक्त पाण्याने हात धुणं पुरेसं नाही; आजारांचं धक्कादायक वास्तव समजल्यावर नक्कीच बदलाल सवय
16
५ राज्यांत एकूण किती मुस्लीम उमेदवार निवडणूक जिंकले? बंगालमध्ये सर्वाधिक; भाजपचा एकही नाही!
17
ऑनलाईन शॉपिंगमध्ये फसवणूक झालीय? घाबरू नका, 'या' सोप्या ट्रिकने तुमचे पैसे परत मिळणार!
18
Top Marathi News LIVE: मुंबई हायकोर्टाकडून बेकायदा फेरीवाल्यांबाबत नाराजी, अहवाल सादर करण्याचे दिले निर्देश
19
कुत्र्यापासून वाघांना धोका; कान्हा व्याघ्र प्रकल्पात ‘T-141’ वाघिणीसह तिच्या चार बछड्यांचा मृत्यू
20
अजितदादांच्या कार्याला सलाम, २१० किमी पोहायचा विक्रम; आर्यनसिंह यांनी घेतली सुनेत्रा पवारांची भेट
Daily Top 2Weekly Top 5

कागदोपत्री चालणाऱ्या सहकारी संस्थांवर टाच

By admin | Updated: July 4, 2015 00:46 IST

केवळ कागदोपत्री चालत असलेल्या सहकारी संस्थांचा शोध घेऊन त्या तातडीने बंद करण्यासाठी आता सहकार विभागाने कडक पावले उचलली आहेत.

सहकार विभागाचा निर्णय : १ जुलै ते ३० सप्टेंबरपर्यंत सर्वेक्षण
जितेंद्र दखने अमरावती
केवळ कागदोपत्री चालत असलेल्या सहकारी संस्थांचा शोध घेऊन त्या तातडीने बंद करण्यासाठी आता सहकार विभागाने कडक पावले उचलली आहेत. त्यानुसार १ जुलै ते ३० सप्टेंबर या कालावधीत थेट गावागावांत जाऊन सहकारी संस्थांचे सर्वेक्षण केले जाणार आहे. त्यामुळे बंद संस्थांवर टाच येणार आहे.
जिल्ह्यात सहकारी संस्थांचे जाळे पसरलेले आहेत. काहीतरी उद्देश ठेवून अनेक सहकारी संस्थांची स्थापना झाली. पण उद्देश सफल झाल्यावर या संस्थांकडे संचालक व संस्थापकांनीही पूर्ण दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे. काही ठिकाणी कर्ज घेतले. मात्र कर्जाची परतफेडच करण्यात आले नाही. त्यामुळे संस्था अडचणीत आल्यात. यामध्ये पतसंस्थांचा सर्वाधिक समावेश आहे. गृहनिर्माण संस्था आणि पाणी वापर संस्था नेमक्या कुठे आहे, याचा शोध घेणेही अवघड झालेले आहे.
या सर्व परिस्थितीत सहकार विभागाकडून वारंवार सहकारी संस्थांना आॅडिट करून घेण्याच्या सूचना करूनही बऱ्याच संस्थांचे आॅडिट झालेले नाहीत, तसेच संस्था आॅनलाईन करताना अनेक संस्थांची माहितीच उपलब्ध नसल्याचे निदर्शनास आले आहे. काही संस्था केवळ कागदोपत्रीच असल्याचे दिसून आले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सहकारी संस्थांची नेमकी स्थिती काय, याचे सर्वेक्षण प्रत्येक गावात जाऊन करण्याचा निर्णय सहकार विभागाने घेतला आहे. त्यासाठी येत्या १ जुलै ते ३० सप्टेंबर या कालावधीत सहकार विभागाचे अधिकारी व कर्मचारी गावागावांत जाऊन नोंदणी झालेल्या प्रत्येक संस्थांची माहिती घेणार आहेत. ज्या संस्था सुरू आहेत त्यांच्याकडून फॉर्म भरून घेतला जाणार आहे. ज्या संस्थांचा ठावठिकाणाच नाही अशा संस्था तातडीने बंद केल्या जाणार आहेत.
यासाठी सहकार विभागाचे अधिकारी व कर्मचारी एक जुलैपासून सर्वेक्षण व शोध मोहिमेत सहभागी होणार आहेत. ज्या संस्थांचे कामकाजच सुरू नाही त्यांनी पुन्हा संस्था चालविण्याची तयारी दर्शविल्यास एकवेळ संधी दिली जाणार आहे.
या सर्वेक्षणांती आजपर्यंत कागदोपत्री सुरू असलेल्या संस्था बंद होणार असून जिल्ह्यातील सहकारी संस्थांची स्वच्छताच या मोहिमेतून होणार आहे. (प्रतिनिधी)

सर्वेक्षणातून काय
उघड होणार?
जिल्ह्यात सध्या २५४९ सहकारी संस्था असून २ हजार ३५० संस्था आॅनलाईन सुरू आहेत, असे सहकार विभागाचे म्हणणे आहे. उर्वरित संस्था एकतर बंद किंवा कागदोपत्री असणार आहेत. त्यापैकी पाणी वापर संस्था आणि गृहनिर्माण संस्था शोधणे सहकार विभागाला अडचणीचे वाटत आहे. या सर्वेक्षणातून चांगल्या सहकारी संस्था नेमक्या किती ही माहिती उघड होणार आहे.

जिल्ह्यातील सहकारी संस्थांचे सर्वेक्षण येत्या १ जुलै ते ३० सप्टेंबरपर्यंत केले जाणार आहे. यासाठी सहकार विभागाने तयारी सुरू केली असून प्रत्येक तालुका उपनिबंधक यांना सर्वेक्षणासंदर्भात आवश्यक सूचना दिल्या आहेत. यामधून चांगल्या सहकारी संस्था व बंद असलेल्या संस्था याची खरी माहिती या सर्वेक्षणातून स्पष्ट होणार आहे.
- प्रेम राठोड,
सहायक जिल्हा उपनिबंधक, अमरावती.