शहरं
Join us  
Trending Stories
1
आकाशात संकट! एअर इंडियाच्या अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणांना 'ब्रेक'; जगभरात ६ हजारांहून अधिक उड्डाणं 'लेट' 
2
अमूलनंतर आता मदर डेअरीचाही दणका! दूध महागलं, म्हशीच्या दुधापासून फुल क्रीमपर्यंत नवे दर जाहीर; पहा संपूर्ण यादी
3
Top Marathi News Live: अमूलचं दूध महागलं! उद्यापासून खिशाला बसणार कात्री
4
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून EV वाहनाचा वापर सुरू, ताफ्यातील वाहनेही केली कमी
5
महागाईचा झटका, अमूलने दुधाचा भाव वाढवला! कधीपासून लागू होणार नवे दर? जाणून घ्या 
6
IPL All Time Record : किंग कोहलीनं रचला इतिहास; MS धोनीचा महारेकॉर्ड मोडला
7
हरियाणातील स्थानिक निवडणुकीत BJPचा दबदबा; PM मोदींनी मानले जनतेचे आभार, म्हणाले...
8
RCB vs KKR : पावसाच्या बॅटिंगचा कुणाला बसणार फटका? कट-ऑफ टाइमचा नियम काय?
9
२० कोच ‘वंदे भारत’ शानदार शो… १० दिवसात ४५ हजार प्रवाशांचा प्रवास, तुफान प्रतिसाद; पण कुठे?
10
PBKS vs MI: "विश्वास ठेवा, ट्रॉफी जिंकून दाखवू"; पंजाबच्या पराभवाच्या मालिकेनंतर प्रभसिमरनची चाहत्यांना भावनिक साद
11
"आता मुस्लिमांमध्ये राष्ट्रवादी नेता सापडणे कठीण...!"; दत्तात्रेय होसबळे यांचं मोठं विधान, कारणही सांगितलं!
12
'तुझे प्रेमसंबंध संपव'; आईच्या प्रियकराची मुलीच्या प्रियकराकडून निर्घृण हत्या, पुणे हारदरलं
13
ICC Test Rankings : या वर्षांत एकही टेस्ट न खेळता बुमराह ठरला बेस्ट! यशस्वी गिलही फायद्यात
14
आशिष नेहरा वर्षाला किती कमवतो? GT चा कोच म्हणून किती मानधन घेतो? आकडा वाचून थक्क व्हाल
15
खरा मित्र… रशियाने पुन्हा सिद्ध केले, गॅरंटी दिली, “काही होऊ दे, भारताचे नुकसान करणार नाही”
16
परदेश दौरे बंद अन् ताफा अर्ध्यावर; मुख्यमंत्र्यांचे कडक आदेश, मंत्री-अधिकारी एक दिवस बस-मेट्रोने फिरणार
17
“नेपाळ-बांगलादेशप्रमाणे GenZ ने भारतातही रस्त्यावर उतरायला हवे”; केजरीवाल असे का म्हणाले?
18
“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट
19
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
20
PM मोदींच्या आवाहनाचा परिणाम! इंधन बचतीसाठी सुवेंदू अधिकारी यांचाही पुढाकार; DGP ना दिला मोठा आदेश
Daily Top 2Weekly Top 5

गावातील योजनांच्या खर्चाची माहिती सूचना फलकांवर

By admin | Updated: May 9, 2014 23:48 IST

वाढत्या भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी शासनाने आता पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.

अमरावती : वाढत्या भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी शासनाने आता पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. यात ग्रामपंचायतीने विकासयोजनांवर केलेल्या खर्चाचाही माहिती गावातील सूचना फलकावर लिहिणे ग्रामसेवकांना सक्तीचे केले असून अशी माहिती न लिहिणार्‍या ग्रामसेवकांवर कारवाई केली जाणार आहे. गावात कोणत्या विकासाच्या योजना राबविल्या जात आहेत, त्यावर किती खर्च केला जात आहे. याची बहुतांश गावातील ग्रामस्थांना माहिती नसते. त्यामुळे सत्तेवर असलेले पदाधिकारी विकासाच्या योजनांसाठी आलेल्या निधीत गैरव्यवहार, भ्रष्टाचार करतात, असा आरोप होतो. अशा कामात पारदर्शकता यावी अािण वाढत्या भ्रष्टाचारासारख्या घटनांना आळा बसावा याकरिता ग्रामसभेला जादा अधिकाराची अंमलबजावणी करण्यात येत नसल्याने भ्रष्टाचार्‍यांवर नियंत्रण मिळविले नसल्याची बाब अनेकांनी शासनाकडे पाठविलेल्या पत्राद्वारे निदर्शनास आणून दिली होती. या अनुषंगाने राज्य शासनाने महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ मध्ये सुधारणा केली आहे. यातील कलम आठमध्ये (क) पोटकलम (एक) नंतर ग्रामपंचायत प्रत्येक सहा माहीमध्ये एकदा विकासविषयक कामावर केलेल्या खर्चाचा अहवाल ग्रामसभेपुढे ठेवेल व त्याची माहिती पंचायतीच्या सूचना फलकावर लावील हे पोटकलम (एक क) असणार आहे. अशी सुधारणा त्यात करण्यात आली आहे. त्यामुळे या पुढील काळात गावातील ग्रामसेवकांना विकास योजनांवर झालेल्या खर्चाचा अहवाल सूचना फलकावर लावण्यासाठी सक्ती करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)