शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना संसर्ग वाढीला; बॅन्ड, बाजा, बारात जोरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:17 IST

फोटो पी १६ मोर्शी पान २ चे लिड मोर्शी : आठवडाभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या धडकी भरविणारी असली तरी सर्वसामान्यांवर त्या ...

फोटो पी १६ मोर्शी

पान २ चे लिड

मोर्शी : आठवडाभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या धडकी भरविणारी असली तरी सर्वसामान्यांवर त्या संख्येचा, वाढत्या संसर्गाचा यत्किंचितही परिणाम झालेला नाही. अलीकडच्या काळात धूमधडक्यात झालेले लग्न सोहळे व त्यातील मोठ्या गर्दीमुळे कोरोनाचा ब्लास्ट झाल्याचे चित्र असताना, नागरिकांसह तालुका प्रशासनाला कोरोनाचे सोयरसुतक राहिलेले नाही. अमरावती शहरातील बोटावर मोजण्याइतपत कारवायांचा अपवाद वगळता, जिल्ह्यात कुठेही कारवाई करण्यात आलेली नाही. कोरोनाचा संसर्ग नव्याने उड्डाणे घेत असताना, बॅन्ड, बाजा, बारात जोरात सुरू आहे. प्रशासनदेखील निद्रिस्त आहे.

जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असल्याने संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे. सभा, रॅली या बाबीला मनाई करण्यात आली आहे. लग्न समारंभात फक्त ५० व्यक्तींना परवानगी दिली आहे. परंतु, मोर्शी शहरात शेकडो वरातीसह नवरदेवाची वरात वाजत-गाजत काढल्या जात असल्यावरसुद्धा पोलीस प्रशासनाकडून कोणतीही कार्यवाही होत नसल्याचे दिसून येते. त्याचबरोबर लग्न समारंभाच्या नियोजित स्थळाव्यतिरिक्त इतर ठिकाणी गर्दी होणार नाही, याची जबाबदारी घेण्यात यावी तसेच सार्वजनिक ठिकाणी गर्दी होत असल्याचे आढळून आल्यास, याबाबत पोलीस विभागाने त्यांच्या स्तरावरून नियंत्रण ठेवण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्या, असा आदेश पारित केला आहे. तरीही मोर्शी शहरात सोमवारी रात्री तीन ते चार नवरदेवांची वाजतगाजत डीजे, बँडसोबत वरात काढली गेली. विशेष म्हणजे, या वेळी शेकडो नागरिक तेथे उपस्थित होते. महिला व पुरुष नाचत असल्याने बघ्यांची मोठी गर्दी होती.

आदेशाला खो

जिल्ह्यात कलम १४४ लागू असताना शहरातील वेगवेगळ्या रस्त्यांवर रात्री उशिरापर्यंत वाजत असलेल्या डीजेचा आवाज पोलिसांच्या कानावर गेला नाही का, असा संतप्त सवाल काही नागरिक विचारत आहेत. नवरदेवाच्या वरातीत ३०० ते ४०० लोक एकत्र येत आहेत. लग्नात केवळ कागदोपत्री ५० जणांची परवानगी घेतली जात आहे. मात्र, प्रत्यक्षात लग्नात ३०० पेक्षा अधिक जण सहभागी होत आहेत. ही बाब कुणीही नाकारत नाही.

--------------------

फोटो पी १६ वरूड

लग्न प्रसंगात ५०! छे, ३०० पेक्षा कमी कमी मुळीच नाही

जमावबंदीला हरताळ : जिल्हाधिका०यांचा आदेश कागदोपत्री, समारंभात व०हाडी बिनधास्त

वरूड : जिल्ह्यात एकीकडे कोरोनाचा कहर, तर दुसरीकडे धूमधडाक्यात विवाह समारंभाची लयलूट सुरू आहे . जिल्हाधिकाºयांनी पाचपेक्षा अधिक लोक एका ठिकाणी जमण्यावर जमावबंदीचे आदेश जारी केले. मात्र, एका एका लग्न सोहळ्यात ३०० ते ४०० लोक उपस्थित असताना तालुकास्तरावर कुठलीही कारवाई नाही. अपवाद वगळता, एकाही वºहाड्याच्या चेहºयावर मास्क आढळून येत नाही. नवरदेवाच्या वरातीत २०० ते ३०० लोक सहभागी होत असून, बिनधास्त वावर सुरू आहे. बॅन्डबाजा ताकदीने वाजविला जात आहे.

तालुक्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असले तरी नागरिकांमध्ये प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा फज्जा उडाला आहे. यामुळे नागरिकांनो सावधान, कोरोना अजूनही संपलेला नाही, असे म्हणण्याची वेळ आली आहे. तीन चार महिन्यांपूर्वी तालुकास्तरावर मास्क व वापरणाºयांविरुद्ध कारवाईचा दंडुका उगारण्यात आला. मात्र, आता एका दिवशी ४५० च्या आसपास रुग्ण निघत असताना, प्रशासनाची कारवाई शून्य आहे.

आता सर्रास नागरिक विनामास्क फिरताना दिसतात, तर वाहनातून प्रवास करताना क्षमतेपेक्षा अधिक आणि विनामास्क बसून प्रवास सुरू झाला. बाजारात आणि वर्दळीच्या ठिकाणी हीच अवस्था आहे. ना मास्क, ना सॅनिटायझर, ना सोशल डिस्टन्स अशी अवस्था असून आठवडाभरात तालुक्यातही कोरोना रुग्ण वाढले आहेत. यातच विवाह सोहळे, कार्यक्रमावर बंदी असताना शेकडो लोकांच्या उपस्थित सोहळे पार पडत आहे. यातून कोरोनाची लागण होण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे. कुठेही कोरोनाची भीती उरलेली नसून, बिनधास्तपणे नागरिकांचा वावर आणि समारंभ पार पडत आहेत.

-------------