शहरं
Join us  
Trending Stories
1
Arvind Kejriwal : "भाजपा अमित शाहांना पंतप्रधान बनवणार, योगींना 2 महिन्यांत हटवणार"; केजरीवालांची भविष्यवाणी
2
महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरेंचे स्थान काय? फोडाफोडीच्या आरोपांवरुन पवारांची बोचरी टीका
3
दारु घोटाळ्यात १५ दिवसांसाठी जेलमधून आलेल्या अरविंद केजरीवालांवर विश्वास का ठेवायचा? - काँग्रेस
4
भारतीय फुटबॉलचा नायक सुनील छेत्रीची निवृत्तीची घोषणा; झाला भावूक
5
बाप्पाच्या मिरवणुकीत बंदुक काढली, तुम्हाला आत टाकणारच; आदित्य ठाकरेंचा सरवणकरांना इशारा
6
ना आलिया, ना दीपिका अन् नाही कतरिना..., ही आहे बॉलिवूडमधील सर्वात महागडी अभिनेत्री
7
जेट एअरवेजच्या नरेश गोयलांच्या पत्नीचे निधन; तिच्याच आजारपणामुळे मिळालेला जामीन
8
देशातील पहिला पौराणिक ओटीटी प्लॅटफॉर्म 'Hari Om' सुरु करणार, Ulluचे मालक विभू अग्रवाल यांची घोषणा
9
"मुस्लिमशी लग्न केल्यानंतर अख्खी मुंबई...", तन्वी आजमींनी सांगितली 'ती' जुनी आठवण
10
'दुनियादारी' फेम अभिनेता पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटून भारावला, म्हणाला - "आयुष्यातला मौल्यवान क्षण.."
11
धक्कादायक! कार चालवताना चालकाची अचानक तब्येत ढासळली; ड्रायव्हिंग शीटवर जीव सोडला
12
"लोकसभा निवडणुकीनंतर सर्वात आधी पाकिस्तानात जाणार मोदी"; पाकिस्तानी मीडियाचा मोठा दावा
13
'हे काय शहाणपणाचे लक्षण नाही'; पंतप्रधान मोदींच्या रोड शोवरुन शरद पवारांची टीका
14
हादरवणारी घटना! एकतर्फी प्रेमातून २१ वर्षीय युवतीची हत्या; पहाटे घरात घुसून हल्ला
15
तिरडीवर बसून निवडणूक अर्ज भरायला पोहचला उमेदवार; स्मशानभूमीत उघडलं कार्यालय
16
Income Tax विभागानं सुरू केली नवी सुविधा, कोट्यवधी लोकांना होणार 'हा' फायदा
17
४ जूननंतर पुन्हा एकदा उबाठा, शरद पवारांचा पक्ष फुटणार; भाजपा नेत्याचा दावा
18
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात, अनेक दिवसांनंतर IT शेअर्समध्ये तेजी
19
Video: ऐश्वर्या रायच्या हाताला दुखापत, तरी Cannes Film Festival मध्ये होणार सहभागी
20
TATA Sonsच्या पहिल्या महिला डायरेक्टर, ज्यांच्याकडून जेआरडी टाटाही घ्यायचे सल्ला; रतन टाटांशी 'हे' आहे नातं

गाविलगडावर नुकसान किती? 42 बैलबंड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2022 5:00 AM

मेळघाटातील गाविलगड किल्ल्यावर काही दिवसांपूर्वी लागलेल्या आगीत ४२ हेक्टर जंगल क्षेत्र जळून खाक झाले. शेकडो वर्षांपासूनची कोट्यवधीची नैसर्गिक वनसंपदा नष्ट झाली. दगडांवरील मौल्यवान मातीचा थर नष्ट झाला. असे असतानाही गाविलगडावरील आगीत केवळ ४२ बैलबंड्या पालापाचोळा व गवत जळाल्याची नोंद वन्यजीव विभागाने घेतली आहे.   

अनिल कडू लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : मेळघाट व्याघ्र प्रकल्पांसह वन व वन्यजीव विभागांतर्गत येणाऱ्या मेळघाटातील जंगलाला यावर्षी मोठ्या प्रमाणात सर्वाधिक आगी लागल्या आहेत. यात हजारो हेक्टर जंगल क्षेत्र काळवंडले आहे. कोट्यवधी रुपयांची मौल्यवान वनसंपदा जळून खाक झाली आहे. जैवविविधता धोक्यात आली आहे. असे असूनही वन व वन्यजीव विभागाच्या रेकॉर्डला केवळ पालापाचोळा व गवत जळाल्याची नोंद घेतली गेली आहे. ही नोंद  बैलबंडीत मोजली गेली आहे. इंग्रजांपासून ही बैलबंडीची पद्धत असून,  ती आजही वन व वन्यजीव विभागात कायम आहे.मेळघाटातील गाविलगड किल्ल्यावर काही दिवसांपूर्वी लागलेल्या आगीत ४२ हेक्टर जंगल क्षेत्र जळून खाक झाले. शेकडो वर्षांपासूनची कोट्यवधीची नैसर्गिक वनसंपदा नष्ट झाली. दगडांवरील मौल्यवान मातीचा थर नष्ट झाला. असे असतानाही गाविलगडावरील आगीत केवळ ४२ बैलबंड्या पालापाचोळा व गवत जळाल्याची नोंद वन्यजीव विभागाने घेतली आहे.   गाविलगडासह लगतच्या अन्य कम्पार्टमेंटमध्ये लागलेल्या आगीच्या अनुषंगाने वन्यजीव विभागाने अज्ञात आरोपींविरुद्ध दोन वन गुन्हे दाखल केले आहेत. या प्रकरणात आरोपी शोधून काढले जातात की पुन्हा तपासाची कारवाई अंतिम निर्णयाविना होते, याची चर्चा मेळघाटसह अचलपूर तालुक्यात होत आहे. 

शेकडो वनगुन्हे; आरोपी अज्ञात जंगलाला लागलेल्या आगीच्या अनुषंगाने वनगुन्हा नोंदविल्या जातो हा वन गुन्हा अज्ञात आरोपीविरुद्ध दाखल केला जातो. पण, आगीच्या अनुषंगाने त्या अज्ञात आरोपींचा शोध घेणारी सक्षम यंत्रणा वन व वन्यजीव विभागाकडे अस्तित्वातच नाही. एक-दोन अपवादवगळता आगीच्या मेळघाटातील शेकडो वनगुन्ह्यातील आरोपी आजही बेपत्ता आहेत.

पुरातत्त्व विभागाचे दुर्लक्षगाविलगड किल्ल्याकडे पुरातत्व विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष आहे. १७ किलोमीटर आवार भिंतीला सतरा ठिकाणी भगदाड पडली आहे. यात किल्ल्यात जायला चोर मार्ग निर्माण झाले आहेत. पण, याकडे पुरातत्व विभाग लक्ष द्यायला तयार नाही. केवळ मुख्य प्रवेशद्वारावर पर्यटकांकडून प्रवेश फी वसूल करण्याचा धंदा तेवढा  पुरातत्व विभाग करीत आहे. 

गाविलगडाचे वाटपगाविलगड किल्ल्याच्या बाहेरील दगडी १७ किलोमीटर लांबीच्या आवार भिंतीसह गाविलगडावरील ऐतिहासिक वास्तू व वस्तूंची देखभाल व दुरुस्ती मालकी हक्काने केंद्रीय पुरातत्व विभागाकडे आहे, तर  आतील वनक्षेत्र हे वन्यजीव विभागाच्या मालकीचे आहे. या जंगल क्षेत्राची निगा राखण्याची जबाबदारी वन्यजीव विभागाकडे जाते.

 

टॅग्स :Melghat Tiger Reserve Forestमेळघाट व्याघ्र प्रकल्पforestजंगल