शहरं
Join us  
Trending Stories
1
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
2
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
3
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
4
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
5
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
6
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
7
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
8
फिट असूनही धोनी का खेळत नाही आहे? चेन्नई सुपरकिंग्सच्या गोटातून समोर आलं असं कारण 
9
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
10
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
11
मुकेश अंबानींच्या Reliance ने इतिहास रचला; असा कारनामा करणारी देशातील पहिली कंपनी...
12
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
13
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
14
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
15
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
16
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
17
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
18
IPL मध्ये अडखणाऱ्या मुंबई इंडियन्ससाठी गुडन्यूज, ‘या’ सामन्यातून रोहित शर्मा करणार कमबॅक
19
त्याच हॉटेलमध्ये राष्ट्राध्यक्षांवर ४५ वर्षांपूर्वी झालेला गोळीबार; डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले, पण...
20
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
Daily Top 2Weekly Top 5

‘जलयुक्त’च्या १८ हजार कामांच्या चौकशींचा फार्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:12 IST

‘जलयुक्त’च्या १८ हजार कामांच्या चौकशींचा फार्स (लोगो) शासनाच्या १५ एजंन्सींद्वारा ३५० कोटी पाण्यात, त्रयस्थ संस्थांचे मूल्यांकनही ढिम्म गजानन मोहोड ...

‘जलयुक्त’च्या १८ हजार कामांच्या चौकशींचा फार्स (लोगो)

शासनाच्या १५ एजंन्सींद्वारा ३५० कोटी पाण्यात, त्रयस्थ संस्थांचे मूल्यांकनही ढिम्म

गजानन मोहोड

अमरावती : तत्कालीन मुख्यमंत्री यांनी जिल्ह्याला दिलेल्या जलयुक्त शिवार योजनेत चार वर्षात किमान १८ हजार कामे राज्य शासनाच्याच वेगवेगळ्या १५ एजन्सींनी केलेत. यावर किमान ३५० कोटींच्यावर निधी खर्च झाला. तरीही शिवार कोरडेच आहेत. या कामांचे यंदा गोंदीयाच्या एका एनजीओमार्फत होणारे मूल्यांकनदेखील केवळ फार्स ठरत आहे. या कामांच्या एसआयटीची चौकशीदेखील अहवाल सहा महिने होऊनही गेला नसल्याचे वास्तव आहे.

जिल्ह्यात सन २०१५-१६ पासून जलयुक्त शिवार अभियानाची मुुहूर्तमेढ रोवली गेली. शेतकरी आत्महत्याप्रवण जिल्ह्यासाठी तत्कालीन राज्य शासनाने ही उपलब्धी दिली. या अंतर्गत किमान १,०५२ गावे जलपरिपुर्ण झाल्याचा जावईशोध या यंत्रणांनी लावला आहे. गतवर्षीचा प्रचंड दुष्काळ व गावागावांतील पाणीटंचाई गृहीत धरता जिल्हा प्रशासनाचा हा दावा तद्दन खोटा ठरला आहे. त्यामुळेच जलयुक्तची ३५० कोटींवर रकमेत झालेली १८ हजार कामे कुठे, हा प्रश्न निर्माण झालेला आहे.

तत्कालीन जिल्हाधिकारी किरण गित्ते यांच्या कार्यकाळात या अभियानात अधिकाधिक कामे झालेती व त्यांना यासाठी देशाच्या पंतप्रधानाकडून गौरविण्यातही आले. या सर्व कामांची चौकशी पथकाद्वारे व्हायला पाहिजे. या कामांत शेतकºयांची झालेली फसवणूक पाहता जलयुक्त शिवार हे अभियान हे प्रशासकीय यंत्रंणासाठी केवळ कुरण ठरले होते. यावर झालेला ३५० कोटींवर खर्च केवळ गाळात फसला व पहिला पाऊस आल्यावर सर्व काही झाकल्या गेल्याची वस्तुस्थिती आहे.

जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनूूसार चार वर्षात जिल्ह्यात १,०५२ गावांमध्ये १८,०९६ कामे या जलयुक्त अभियानातंर्गत करण्यात आलेली आहे.यावर हा सर्व खर्च करण्यात आलेला आहे. विशेष म्हणजे सर्वाधिक कामे कृषी विभागाने केलेली आहे. अतांत्रिक विभागामार्फत झालेल्या तांत्रिक कामांमुळेच जलयुक्त शिवार अभियान पार गाळात बुडाले आहे.

बॉक्स

एसआयटीच्या तपासावरच प्रश्नचिन्ह

राज्यातील महाआघाडी सरकारने या अभियानातील भष्ट्राचार निखंदून काढण्यासाठी विशेष तपास पथकाचे (एसआयटी) गठण सहा महिन्यापूर्वी केले. मात्र या पथकाद्वारा झालेल्या जिल्ह्यात झालेल्या कामांचा अहवाल मागण्यात आला. याशिवाय या पथकाद्वारा कुठलीही चौकशी झालेली नाही. त्यामुळे शासनच याविषयी गंभीर नसल्याचा आरोप होत आहे.

बॉक्स

आता गोंदियाच्या एनजीओद्वारा ‘थर्ड पार्टी आॅडीट’

जिल्ह्यात झालेल्या जलयुक्त अभियानाचे कामाचे मुल्यमापन त्रयस्त संस्थेमार्फत करण्यात येणार आहे. ई-निविदेनूसार गोंदिया येथील एका एनजीओला काम मिळाले आहे. यापूर्वीचे मुल्यमापन बडनेरा येथील अभियांत्रिकी महाविद्यालयाद्वारा करण्यात आले होते. या मूल्यमापनाची माहिती बाहेर आलीच नाही.

बॉक्स

जिल्ह्यात ही कामे झालीत

जलयुक्त शिवार अभियानात जलसंधारणाचे माध्यमातून पाणलोटची कामे झालेली आहेत. यामध्ये सिमेंट साखळी नाला बांधकामे, जुने अस्तित्वातील नाल्यावर सिंमेटचे बांधकाम, के.टी. वेअरची दुरुस्ती व नुतनीकरण, जलस्त्रोतातील गाळ काढणे, जलस्त्रोत बळकटीकरण, विहिर पुनर्भरण, उपलब्ध पाण्याचा कार्यक्षम वापर व नाले जोडकामे करण्यात आलेली आहेत.

पार्इंटर

* सन २०१५-१६

२५३

गावांचा समावेश

१३०.१९ कोटी खर्च

* सन २०१६-१७

२५३

गावांचा समावेश

१४०.२२ कोटी खर्च

* सन २०१७-१८

२५२

गावांचा समावेश

६५ कोटींचा खर्च

* सन २०१८-१९

२९४ गावांचा समावेश

२४ कोटींचा खर्च

* ७१,४७०

हेक्टर सिंचन

पार्इंटर

१८,०१६

चार वर्षातील कामे

८३,११६

टीएमसी जलसाठा

बॉक्स

७१ हजार हेक्टरमध्ये सिंचन कुठे?

जिल्ह्यात जलयुक्त अभियानामुळे ८३ हजार ११६ टीएमसी जलसाठा निर्माण झाल्याचा दावा यंणत्रांद्वारा करण्यात आलेला आहे व याद्वारे पिकांना एकवेळ पाण्याची पाळी दिल्यास चार वर्षात ७१ हजार ४७७ हेक्टरमध्ये सिंचन होणार आसल्याचे त्यावेळी जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले होते. जिल्ह्याची एकूण पिकस्थिती पाहता हा दावा खोटा असल्याचे स्पष्ट झाले आहे.

बॉक्स

आता ‘मुख्यमंत्री जलसंवर्धन कार्यक्रम’ नामानिधान

तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्वाकांक्षी प्रकल्प असलेला जलयुक्त शिवार अभियान याचे आता ४ फेब्र्रुवारीला नव्याने नावानिधान करण्यात आलेले आहे. आता ‘मुख्यमंत्री जलसंवर्धन कार्यक्रम’ या नावाने कार्यक्रम राज्यात राबविण्यात येणार आहे. तसी मंजूरी गुरुवारच्या मंत्रिमंडळ बैठकीत देण्यात आलेली आहे.