शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांनीच फिरविले सोयाबीनवर रोटावेटर

By admin | Updated: October 3, 2015 00:03 IST

नगदी पीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोयाबीन पीकाला गरजेच्या वेळी पावसाने दगा दिला.

सुमित हरकुट अमरावतीनगदी पीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोयाबीन पीकाला गरजेच्या वेळी पावसाने दगा दिला. कीड व रोगांचा प्रार्दुभावाने खरीपाचे सोयाबीन नष्ट झाले. तर काही पिकांचे उत्पादन खर्च तर दूर मळणीचा खर्चही निघणे कठीण असल्याने काही शेतकऱ्यांद्वारा सोयाबीनच्या उभ्या पिकात रोटावेटर फिरवल्या जात असल्याचे विदारक चित्र आहे. खरीप पिकातील शेतकऱ्यांसाठी अति महत्वाचे समजल्या जाणारे सोयाबीन हे पीक जिल्हातील शेतकऱ्यासाठी ‘कॅश क्रॉप’ पीक आहे. परंतु पावसाने दगा दिला अन् बळीराजाला मोठ्या आर्थिक नुकसानीच्या खाईत लोटल्याचे चित्र उभे ठाकले आहे. या पिकावर अवलंबूनच शेतकरी आपल्या शेती खर्चासह दिवाळी आणि दसरा साजरा करण्याचे नियोजन आखतात. त्यानुसार मोठ्या प्रमाणात सोयाबीनची पेरणी केली जाते. मात्र यावर्षी पावसाने वेळीच दांडी मारल्याने तसेच पीक फुलोरला आल्यावर पावसाने हुलकावणी दिली. जवळजवळ एक महिना पावसाने दांडी मारली. त्यामुळे सोयाबीनला आलेला फुलोर गळू लागला होता. मात्र शेतकऱ्यांना काही प्रमाणात का होईना पीक हातात येणार ही आशा होती. मात्र, आता पीके काढण्याचा वेळी सोयाबीनच्या शेंगाच भरल्या नाही तर ज्या सोयाबीनच्या शेंगा भरल्या त्यांचा दाणा वाढला नाही. पीक उत्पन्नाची सरासरी एकरी दीड ते दोन क्विंटल प्रति उत्पन्न होवू लागले. त्यामुळे जिल्ह्यासह चांदुरबाजार तालुक्यातील अनेक गावातील शेतकऱ्यांनी सोयाबीनच्या उभ्या पिकावर ‘रोटावेटर’ फिरवून स्वत: पीक उद्धवस्त केले. पूर्वीच कर्जाचे डोंगर घेवून शेतकऱ्यांनी यंदा पेरणी केली. यावेळेस तरी पीक चांगले येणार या आशेवर पेरण्या केल्या. मात्र पावसाने शेतकऱ्यांना निराशाच दिली. शेकडो हेक्टर पीक उद्धवस्त : सोयाबीन काढणे परवडत नाहीमुख्यमंत्री देणार लक्ष !शेतकऱ्यांनी समस्या सांगव्यात, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी वरुड येथे झालेल्या कृषी व संत्रा महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी केले. सोयाबीन उत्पादन खर्चही निघणे कठीण असल्याने शेतकरी उभ्या पिकावर नांगर फिरवित आहे. या वेदनेकडे मुख्यमंत्री लक्ष देणार का, याकडे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. आसेगाव भागातील एका शेतशिवारात शेतकऱ्याने आपल्या शेतात रोटावेटर फिरविले असल्याची माहिती आहे. शेतकऱ्यांना सोयाबीन पिकाची सरासरी पीक एकरी १ ते २ क्विंटल प्रति एकर पीक निघाल्याने शेतकऱ्यांच्या हाती निराशा येत आहे.- राजीव मेश्रामतालुका कृषी अधिकारी.