शहरं
Join us  
Trending Stories
1
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
2
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
3
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
4
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
5
मुकेश अंबानींच्या Reliance ने इतिहास रचला; असा कारनामा करणारी देशातील पहिली कंपनी...
6
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
7
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
8
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
9
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
10
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
11
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
12
IPL मध्ये अडखणाऱ्या मुंबई इंडियन्ससाठी गुडन्यूज, ‘या’ सामन्यातून रोहित शर्मा करणार कमबॅक
13
त्याच हॉटेलमध्ये राष्ट्राध्यक्षांवर ४५ वर्षांपूर्वी झालेला गोळीबार; डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले, पण...
14
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
15
संरक्षण क्षेत्रात भारताची आघाडी! रशियाच्या जुन्या भागीदाराला मिळाली साथ; पुतिनही हैराण
16
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
17
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
18
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
19
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
20
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
Daily Top 2Weekly Top 5

मार्चअखेर ४६६ गावे पाणीटंचाईच्या फेऱ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2020 05:01 IST

जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने याविषयीचा कृती आराखडा तयार केला आहे. यामध्ये प्रस्तावित ८१८ उपाययोजनांवर १२ कोटी ६७ लाख ४५ हजारांच्या निधीची आवश्यकता आहे. जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी या आराखड्याला सोमवारी मंजुरी दिली. जिल्ह्यात जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या पावसाच्या कालावधीत ८१४ मिमी सरासरी अपेक्षित असताना प्रत्यक्षात ८८९.२ मिमी पाऊस पडला.

ठळक मुद्देकृती आराखड्याला मंजुरी : १३ कोटींच्या ८१८ उपाययोजना प्रस्तावित

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : सरासरीपेक्षा अधिक पावसाळा झाला असला तरी पाच तालुक्यांत पावसाने सरासरी गाठली नाही. त्यामुळे जिल्ह्यात मार्चअखेर किमान ४६६ गावांना पाणीटंचाईची झळ पोहचणार आहे. जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने याविषयीचा कृती आराखडा तयार केला आहे. यामध्ये प्रस्तावित ८१८ उपाययोजनांवर १२ कोटी ६७ लाख ४५ हजारांच्या निधीची आवश्यकता आहे. जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी या आराखड्याला सोमवारी मंजुरी दिली.जिल्ह्यात जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या पावसाच्या कालावधीत ८१४ मिमी सरासरी अपेक्षित असताना प्रत्यक्षात ८८९.२ मिमी पाऊस पडला. ही सरासरी टक्केवारी १०९.२ आहे. यामध्ये चांदूर बाजार, धामणगाव रेल्वे, मोर्शी, अचलपूर, दर्यापूर अंजनगाव सुर्जी, धारणी व चिखलदरा तालुक्यात पावसाने १०० टक्के सरासरी पार केली. मात्र, अमरावती, भातकुली, नांदगाव खंडेश्वर, तिवसा व वरूड तालुक्यात पावसाची सरासरी माघारली. परिणामी जलपुनर्भरणाच्या कालावधीत भूजल उपसा झाल्याने भूजलस्तरात कमी येत आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील ४०० गावांमध्ये भूजलात तीन फुटांपर्यंत तूट आल्याचे भूजल सर्वेक्षण विभागाने ऑक्टोबरमध्ये विहिरींच्या केलेल्या निरीक्षणाअंती स्पष्ट झाले. साधारणत: पाणीटंचाईचे तीन टप्पे आहेत. यामध्ये ऑक्टोबर ते डिसेंबर या पहिल्या टप्यात पाणीटंचाई निरंक असली तरी जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाद्वारा कृती आराखडाच तयार नव्हता. यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी पत्र दिले. आगामी काळात पाणीटंचाई उद्भवू नये यासाठीचे प्रयत्न आवश्यक असताना जानेवारी ते मार्च या दुसºया टप्प्याचा कृती आराखडा फेब्रुवारी माहिन्यात तयार झालेला आहे. याची प्रत्यक्ष अंमलबजावणी केव्हा होणार, हा प्रश्न तितकाच महत्त्वाचा आहे. एप्रिल ते जून या अखेरच्या टप्प्यात पाणीटंचाईची तीव्रता वाढणार आहे. यासाठीचे नियोजन व अंमलबजावणी तातडीने करावी लागणार आहे. विशेष म्हणजे सरासरीपेक्षा कमी पाऊस झालेल्या पाच तालुक्यांवर विशेष लक्ष केंद्रित करावे लागणार आहे.मार्चनंतर ४१७ गावांसाठी ७५६ उपाययोजनापाणी टंचाईच्या तिसºया टप्प्यात म्हणजेच एप्रिल ते जून या कालावधीत ४१७ गावांसाठी एकूण ७५६ उपाययोजना प्रस्तावित आहेत. यासाठी ७.८२ कोटींचा निधी अपेक्षित आहे. यामध्ये १४९ विहिरी खोल करून गाळ काढण्यात येईल. यात ४४.७० लाख, २३५ खासगी विहिरींचे अधिग्रहणावर १.४१ कोटी, २१ टँकरने पाणीपुरवठ्यावर ६३ लाख, ७७ नळयोजनांच्या विशेष दुरुस्तीवर २.२६ कोटी, २३ तात्पुरत्या पूरक नळयोजना तयार करण्यासाठी ६४ लाख व २५१ नवीन विंधन विहिरीवर २.४३ कोटी रुपयांचा निधी अपेक्षित आहे.१०८ नळयोजनांची विशेष दुरुस्तीपाणीटंचाईच्या दुसºया टप्प्यात १०८ नळयोजनांची विशेष दुरुस्ती केली जाणार आहे. यावर ३.०६ कोटींचा निधी खर्च होणार आहे. १०५ विहिरींचा गाळ काढण्यात येणार आहे यावर ३१.५० लाख, २४५ खासगी विहिरींचे अधिग्रहण यावर १.९६ कोटींचा खर्च, ४५ टँकरणे पाणीपुरवठा करणे यासाठी १.८० कोटी, ४० तात्पुरत्या नळयोजनांची विशेष दुरुस्ती करण्यात येणार आहे. यावर १.३० कोटींचा निधी तसेच ३१५ नवीन विंधन विहिरी तयार करण्यात येतील. यावर ४.४३ कोटींचा निधी खर्च करण्यात येणार आहे.पर्जन्यमानातील स्थान व वेळ सापेक्ष दोलायमानता आणि पावसातील खंड, भूजलाचा सिंचनासाठी होणारा अतिउपसा, विंधन विहिरींद्वारे अतिखोल जलधारातून होणारा अति उपसा, सिंचनासाठी वापरण्यात येणारी पारंपरिक प्रवाही पद्धत व त्याद्वारे पाण्याचा होणारा अपव्यय, पाण्याचे नियोजन व व्यवस्थापनाचा अभाव यामुळे जिल्ह्यातील काही भागांत दरवर्षी पाणीटंचाई उद्भवते. यावर कायमस्वरुपी उपाययोजना होत नसल्याने नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागतो.

टॅग्स :water shortageपाणीकपात