शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षण विभागानेच दाखविला शालेय योजनांना ठेंगा

By admin | Updated: March 23, 2015 00:30 IST

जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाकडून जिल्हा परिषदेने सुरू केलेल्या अनेक योजना बंद पडल्या आहेत. त्यामुळे या शाळांचे विद्यार्थी व शिक्षक लाभांपासून वंचित असल्याची बाब पुढे आली आहे.

अमरावती : जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाकडून जिल्हा परिषदेने सुरू केलेल्या अनेक योजना बंद पडल्या आहेत. त्यामुळे या शाळांचे विद्यार्थी व शिक्षक लाभांपासून वंचित असल्याची बाब पुढे आली आहे.जिल्हा परिषद शिक्षण विभागामार्फत शाळांसाठी विविध योजना राबविण्यात येतात. यापैकीच शिक्षकांच्या मदतनिधीतून १९९७ मध्ये सावित्रीबाई फुले दत्तक योजना सुरू करण्यात आली. त्यावेळी प्रत्येक शिक्षकाने एक हजार रूपयांप्रमाणे निधी जमा केला होता. यातून लाखो रूपयांचा जमा झालेला हा निधी काही कालावधीकरिता शिक्षक बँकेत डिपॉझिट करण्यात आला होता. त्यावर मिळणाऱ्या व्याजातून गरीब व निराधार मुलींना प्रत्येकी ३०० रूपये देण्यात येत होते. याचा जिल्ह्यातील सुमारे २ हजार मुलींना लाभ मिळत होते. मागील दोन वर्षांपासून विद्यार्थ्यांना त्याचा लाभ देणे बंद आहे. सदर योजनेसाठी जमा केलेला निधी बँकेत तसाच पडून असल्याची माहिती आहे. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी स्थापन केलेली समितीसुध्दा गठित केली होती. त्यामध्ये शिक्षण सभापती, शिक्षणाधिकारी व मान्यताप्राप्त संघटनांच्या प्रतिनिधींचा समावेश होता. त्यावेळी समितीची सभाही पार पडत होती. मात्र सध्या शिक्षण विभागाने ही योजनाच बासनात गुंडाळून ठेवली आहे. याशिवाय जिल्हा परिषद शिक्षकांसाठी इयत्ता पहिलीमध्ये प्रवेश घेणाऱ्या मुलींच्या १०० टक्के पटनोंदणीला पुरस्कार दिला जात असे. याकरिता त्या शाळतील मुख्याध्यापक आणि वर्गशिक्षकास हा पुरस्कार बहाल केला जात होता. यासाठी केंद्रनिहाय प्रत्येक तालुकास्तरावरून अहवाल मागवून निकषाप्रमाणे अहवाल मागवून यासाठी शाळेची निकष पूर्ण केलेल्या शाळांसाठी हा उपक्रम सुरू आहे. मात्र एकूणच जिल्हा परिषदेच्या या दोन्हीही योजना सध्या शिक्षण विभागाच्या दुर्लक्षामुळे बंद पडल्या आहेत. परिणामी या योजनांपासून विद्यार्थी आणि शिक्षक अद्यापही वंचित आहेत. त्यामुळे या बंद पडलेल्या योजना पुन्हा सुरू करण्यासाठी जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी पालक व शिक्षक संघटनांकडून होत आहे. (प्रतिनिधी)