शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कादायक! काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याचा महिला आमदाराला जबरदस्ती मिठी मारण्याचा प्रयत्न; धक्का देत केलं दूर, VIDEO व्हायरल
2
जगापासून लपवले, सॅटेलाइटने सगळे टिपले; इराण हल्ल्यात अमेरिकेची १५ तळावरील २२८ ठिकाणे बेचिराख
3
“भारत-व्हिएतनाम संबंध अधिक दृढ करण्यासाठी महाराष्ट्र कटिबद्ध”: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
4
पश्चिम बंगालमध्ये ममता राज संपुष्टात! राज्यपालांकडून मंत्रिमंडळ बरखास्त; आता होणार भाजप युगाची सुरुवात
5
मिचेल मार्शचं वादळी शतक! LSG नं २०९ धावा केल्यावर RCB ला मिळालं २१३ धावांचं लक्ष्य; कारण...
6
गुंतवणूकदारांची चांदी! देशातील सर्वात महागड्या शेअरकडून 'डिविडेंड' जाहीर, एका स्टॉकची किंमत १३००००; किती मिळणार लाभांश?
7
Mitchell Marsh Fastest Century: मिचेल मार्शचा मोठा पराक्रम; जलद शतकी खेळीसह रिषभ पंतचा विक्रम मोडला
8
“२०२९ला सुनेत्रा पवार मुख्यमंत्रीपद अन् बारामतीच्या उमेदवार असतील”; जय पवारांचा मोठा दावा
9
SSC Result 2026: दहावीच्या विद्यार्थ्यांची निकालाची प्रतीक्षा संपली! उद्या दुपारी १ वाजता जाहीर होणार रिझल्ट; 'या'वेबसाईटवर पाहा
10
“सीमावर्ती भागात जाऊ नये”; बांगलादेशचे नागरिकांना आवाहन, प. बंगालमध्ये भाजपा येताच सतर्क
11
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीनंतर हिंसाचार सुरूच! हावड्यात भाजप कार्यकर्त्यांवर बॉम्बफेक; पाच जण गंभीर
12
Bhuvneshwar Kumar: स्विंगचा किंग भुवीनं रचला इतिहास; IPL मध्ये 'हा' मैलाचा पल्ला गाठणारा ठरला पहिला
13
गोड बातमी! भारतीय T20 कर्णधार सूर्यकुमार यादवला कन्यारत्न; देविशाने दिला गोंडस मुलीला जन्म
14
Nagpur Crime : धक्कादायक ! २१ वर्षीय तरुणाकडून सावत्र आईवर बलात्कार; पीडिता चार महिन्यांची गरोदर
15
"गजब भयो रामा जुलम भयो रे..."; बंगालमध्ये 'मुर्शिद ते मोदी' अन् 'मदीना ते कृष्णा'; निकालानंतर धून तीच बोल नवीन...! - VIDEO 
16
तामिळनाडूमध्ये राज्यपाल विरोधाचा दुसरा अंक! विजय दुसऱ्यांदा माघारी परतला; कार्यकर्ते संतापले
17
कोण आहेत तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर? बहुमत असून सत्तास्थापनेत पेच; देशाचे लक्ष
18
ठाणे, कल्याण डोंबिवलीत वादळी वारे, धुळीचे लोट; DCM शिंदेंच्या हेलिकॉप्टरचे 'इमर्जन्सी लँडिंग'
19
Suvendu Adhikari : "मी भवानीपूरमध्ये ममता बॅनर्जींचा पराभव केला, म्हणूनच चंद्रनाथची हत्या झाली"; सुवेंदू अधिकारी आक्रमक
20
Mumbai Watermelon Case : ना कलिंगड, ना बिर्याणी...पायधुनीतील 'त्या' चौघांच्या मृत्यूचं खरं कारण अखेर समोर!
Daily Top 2Weekly Top 5

पाच वर्षात २०० पोलीस पाटलांवर प्राणघातक हल्ले

By admin | Updated: February 11, 2015 00:23 IST

पोलीस पाटील हा पोलीस विभागाचा अविभाज्य घटक आहे. पोलीस प्रशासनाची भूमिका व कार्यप्रणाली जनतेपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी पोलीस पाटलांवर असतांना ....

लोकमत विशेष
मोहन राऊत अमरावती
पोलीस पाटील हा पोलीस विभागाचा अविभाज्य घटक आहे. पोलीस प्रशासनाची भूमिका व कार्यप्रणाली जनतेपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी पोलीस पाटलांवर असतांना मागील पाच वर्षात २०० पोलीस पाटलांवर प्राणघातक हल्ले झाल्याची धक्कादायक माहिती आहे़
लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत अशा सर्व निवडणूका सांभाळताना पोलीस पाटलांची मोठी कसरत होते़ गावातील दोन गट एकमेकांसमोर उभे झाल्यानंतर पोलीस पाटलांना मध्यस्थी करतांना स्वत:चा जीव धोक्यात टाकावा लागतो़ तंटामुक्त गाव अभियान यशस्वी करण्यात पोलीस पाटलांची महत्वाची भूमिका आहे़ मागील शासनाने मानधन वाढविण्यासंदर्भात आश्वासन दिले होते़ परंतु हे आश्वासन हवेतच विरले आहे़ आज राज्यात तंटामुक्त ग्राम अभियान पोलीस पाटलामुळे यशस्वी झाले आहे़
पोलीस पाटलासाठी प्रत्येक गावात शासकीय कार्यालय देण्याचा ग्रामविकास विभागाने अध्यादेश काढला परंतु या अध्यादेशाची अमंलबजावणी आजपर्यंत झाली नाही़
राज्यातील प्रत्येक गावात पोलीस पाटील नियुक्त करण्याचे तथा रिक्त पदे भरण्यासाठी प्रशासनाने पाऊल टाकणे गरजेचे होते़ आजही दहा ते पंधरा गावांचा प्रभार एका पोलीस पाटलाला सांभाळावा लागतो़
अनेक गावांचा कारभार सांभाळताना पोलीस पाटील गावच्या राजकीय दुषित वातावरणाचा बळी ठरत आहे़
आजपर्यंत राज्यातील अनेक पोलीस पाटलांवर चौकशी न करता गुन्हे दाखल करण्यात आले आहे़ विशेषत: ज्या गावाचा अतिरीक्त कारभार सांभाळला त्या गावांचा वेतन स्वरूपात मोबदला मिळत नाही़ गावातील शातंता सुव्यवस्था कायम ठेवणे, अनेक कामावर आळा घालणे, चोरी व विविध घटनेकडे लक्ष ठेवून ग्रामस्थांचे सरंक्षण करण्याचे काम पोलीस पाटलावर आहे़
आपले कर्तव्य ईमानेइतबारे सांभाळत असताना आजही मानधनाचा सात हजार रूपयांचा प्रश्न, वयाच्या ६५ वर्षापर्यंत सेवा, गावातील पोलीस पाटलांची रिक्त पदे, निवृत्त वेतन, अनुकंपा मध्ये पोलीस पाटलांच्या वारसांची नियुक्ती, आजारासाठी लागणारा वैद्यकीय खर्च असे अनेक प्रश्न शासनदरबारी पडले आहेत.
आदिवासी, नक्षलग्रस्त भागातील पोलीस पाटलावर प्राणघातक हल्ले झाले त्यांची चौकशीही थंडबस्त्यात असल्याची पोलीस पाटील संघटनेची तक्रार आहे़