शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-रशियाचा करार! पाकिस्तानची झोप उडाली! ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
2
Top Marathi News LIVE Updates: विधान परिषदेची निवडणूक उद्धव ठाकरेंनीच लढावी, शरद पवारांच्या राष्ट्रवादीची मागणी
3
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
4
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
5
सीझफायर कसा वाढवला...! इराणी दूतावासाकडून 'AI' फिरकी; Video केला व्हायरल
6
भारत बनला जगातील ६ वा सर्वात श्रीमंत देश; १९,८७७ जण अल्ट्रा रिच लिस्टमध्ये, 'या' शहरात सर्वाधिक श्रीमंत
7
अयान अहमदचा 'स्वॅग', पण झटका राजेश प्रजापतीला! रीलमधील महागड्या कार अन् दोन पिस्तूल जप्त
8
बंगालमध्ये मतदानादरम्यान भाजपा उमेदवार अग्निमित्रा पॉल यांच्या कारवर हल्ला, जमावाने फोडल्या काचा
9
तैवान राष्ट्रपतींच्या विमानाला 'या' देशांच्या एअरस्पेसमध्ये नो एन्ट्री; अमेरिका चीनवर भडकला
10
"ममता बॅनर्जी यांनी स्वच्छ सरकार चालवलं असतं तर..."; खुद्द राहुल गांधींनीच  करून टाकली भाजपच्या विजयाची भविष्यवाणी!
11
“भारताला ‘नरक’ म्हणणे १४० कोटी भारतीयांचा अपमान, पण PM मोदी गप्प आहेत”; काँग्रेसची टीका
12
१५० युद्धनौका, पाणबुड्या बुडाल्या तरी होर्मुझवर इराणचे वर्चस्व...; कशाच्या जोरावर अमेरिकेला आव्हान देतोय...
13
’शिवीगाळ प्रकरणी आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करा,  प्रकाशकांना सुरक्षा द्या’, काँग्रेसची मागणी  
14
पैसा, घर गेले, मातृछत्रही हरवले; 'त्या' शहीदपुत्राची हृदयद्रावक गोष्ट, नोकरीसाठी २ कोटींची फसवणूक
15
Monalisa Bhosle : Video - “माझ्या मुलीसोबत असं काही घडेल याची...”; मोनालिसाचे आई-वडील ढसाढसा रडले
16
'कोलकाता पॅटर्न'ने मुंबईतील कंपन्यांना लुटले; फ्रेट व्यवसायाच्या नावाखाली कोट्यवधीचा गैरव्यवहार
17
केवळ ५ सेकंद! चिंतेच्या गर्तेतून बाहेर पडत झपाट्याने कामाला लागण्याचा सर्वात प्रभावी 'माईंड हॅक'!
18
"मराठीचा सन्मान हवाच, पण सक्ती नको"; रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी सरकारविरोधात संजय निरुपम रस्त्यावर उतरणार
19
इराण युद्ध आणि ८५% इथेनॉलचा धोरणात्मक धक्का; आता 'इलेक्ट्रिक' गाडी घेणे ठरणार का शहाणपणाचे?
20
पश्चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान राडा, CPMच्या एजंटवर हल्ला, हाताची बोटं कापल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

अस्वस्थ पदाधिकाऱ्यांकडून पक्ष बदलाची चाचपणी

By admin | Updated: September 8, 2016 00:18 IST

महापालिका निवडणूक जवळ येवून लागल्याने सर्वच राजकीय पक्षांमध्ये घडामोडींना वेग येवू लागला आहे.

अंतर्गत वाद धुमसत : निवडणुकीचे वारेअमरावती : महापालिका निवडणूक जवळ येवून लागल्याने सर्वच राजकीय पक्षांमध्ये घडामोडींना वेग येवू लागला आहे. सर्वात मोठा पक्ष म्हणून लैकिक असलेल्या काँग्रेसमध्ये मात्र अस्वस्थता पसरली आहे. संघटनात्मक पातळीवर सर्व आॅलवेल असल्याचा दावा काँग्रेसजनकरीत असले तरी कोण कोणाच्या गोटात हे सर्वविदित झाले आहे. शहराध्यक्षपदाच्या वादावरुन काँग्रेसमधील नगरसेवक आणि इच्छुकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. ती दूर करण्यासाठी थेट प्रदेशाध्यक्षांनी कानपिचक्याही घेतल्या. मात्र अंतर्गत वादाचे धुमारे अजुनही तप्त आहेत. पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झालेली अस्वस्थता दूर करण्यासाठी प्रयत्न सुरू असले तरी त्यात कितपत यश येते, यावर महापालिका निवडणुकीत काँग्रेसची वाटचाल अवलंबून असेल. सभागृहात सर्वाधिक २५ नगरसेवक असलेल्या काँग्रेसला फुटाफुटीचे राजकारणाचीही भीती लागून राहयली आहे. एका ज्येष्ठ नगरसेवकाची स्थानिक आमदाराशी वाढलेली जवळीक पाहता काँग्रेसला त्यांच्यासह अन्य काही जण सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत असल्याची खास सुत्रांची माहिती आहे. तर काही आपल्या जुन्या नेत्यांकडे जावून तिकीटाचे चाचपणी करीत आहेत. एकंदरीत शहर काँग्रेसमध्ये पडलेले तीन फाड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचंड उलथापालथीचे राहणार आहे. माजी आमदार शेखावत यांच्या वाढदिवसाला दांडी मारणारे चव्हाणांच्या बैठकीला आवर्जून उपस्थित होते. सगळे काही आॅलवेल दाखविण्याचा तो खटाटोप होता. सभागृह नेते बबलू शेखावत तर असा कुठला वादच मानत नाहीत. आम्ही काँग्रेसशी बांधिल आहोत. अकर्तेच सध्या शहराध्यक्ष आहेत. त्यामुळे शहराध्यक्ष पदाचा वाद असण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे सांगत आता मिशन महापालिकाच असल्याचे ते ठासून सांगतात. दुसरीकडे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण येवून गेल्यावर शहराध्यक्षपदाच्या वादावर पडदा पडला असला तरी कोण कुणाच्या मागे, हे केव्हाचेच स्पष्ट झाले आहे. महापालिका निवडणुकीत मोठी झेप घेण्याची उमेद बाळगून असलेल्या काँग्रेसमधील ही अस्वस्थता दूर करण्याचे आव्हान माजी आमदार शेखावतांसह प्रदेश महासचिव संजय खोडके यांच्यापुढे आहे. विद्यमान शहराध्यक्ष अलिकडे वाड्याऐवजी बरेचदा बबलू शेखावतांच्या दालनात दिसतात. त्यामुळे ते बबलू शेखावत गटाकडे झुकल्याचे बोलले जाते. या प्रचंड अस्वस्थतेने तीन नगरसेवक काँग्रेसला सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत आहेत. प्रत्येक राजकीय पक्षात गट तर असतातच. मोठा पक्ष म्हणून काँग्रेसही त्याला अपवाद नाही. आगामी महापालिका निवडणुकीचा विचार करता अकर्तेच शहराध्यक्ष, अशी ठाम भूमिका प्रदेशाध्यक्षांनी घेतली. मात्र शहराध्यक्ष कुणीही होवो, वादंगाचे रुपांतर पक्ष बदलात होण्याचे स्पष्ट संकेत आहेत. (प्रतिनिधी)अकर्तेंना संधी मुळात शहराच्या राजकारणाचा विचार केला तर अजुनही प्रत्येक वॉर्डात कार्यकर्ते असलेला काँग्रेस हा एकमेव पक्ष आहे. या पक्षाचे पाळेमुळे तळागाळात रोवली गेली आहेत. परंतु वाद - प्रतिवादामुळे, पक्षातील चैतन्य हरविले आहे. संजय अकर्ते हेच निवडणुकीपर्यंत शहराध्यक्ष असतील तर त्यांना पुन्हा एकदा आश्वासक सुरूवात करायला पुरेशी संधी आहे. निरव शांतता अंतर्गत सुदोपसुंदीमुळे शहर काँग्रेसमध्ये निरव शांतता पसरली आहे. चौबळवाड्यात तर चर्चा करतानाही कुणी दिसत नाही. बबलू शेखावतांचे दालनात काँग्रेसी नगरसेवकांची ये-जा तेवढी दिसते तर महापालिका निवडणुकीची ज्वर हळूहळू तापू लागला असताना काँग्रेसमधील निरव शांतता अस्वस्थतेला खतपाणी घालणारी ठरु लागली आहे.